शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण शहरातील डांबरी रस्त्यांची चाळण; वाहनचालकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 00:45 IST

नागरिकांचे हाल । अंतर्गत, प्रमुख रस्ते झाले खड्डेमय; अपघात होण्याची व्यक्त होतेय भीती

कल्याण : केडीएमसी हद्दीतील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांतून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची भीती ते व्यक्त करत आहेत. कल्याण पूर्वेतून पश्चिमेला येणाऱ्या उड्डाणपुलावर तसेच वालधुनी परिसरातही रस्त्यांवर खड्डे आहेत. कल्याण बाजार समिती कार्यालयाकडे व एका मोठ्या रुग्णालयाकडे जाणाºया रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून, त्यात साचलेल्या पाण्यामुळे त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. उंबर्डे परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रिक्षाचालक, दुचाकी, टेम्पो, ट्रकचालक यांना गाडी चालविणे कठीण झाले आहे. यंदा जुलैमध्ये जास्त पाऊस पडलेला नसतानाही रस्त्यांची चाळण कशी झाली, असा सवाल वाहनचालक करत आहेत.

मागच्या वर्षी जुलै, आॅगस्टमध्ये जोरदार अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे रस्ते पाण्यात वाहून गेले होते. यंदा पावसाचा पत्ताच नव्हता. चार दिवसांपूर्वी पाऊस पडला असून, त्यात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. स्थायी समितीने खड्डे बुजवण्यासाठी जवळपास आठ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविले गेले असताना पावसाळ्यात खड्डे पडले कसे, असा प्रश्न आहे. यासंदर्भात केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी सांगितले की, चार दिवसांत पडलेल्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्याचे आदेश संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना दिले असून, ते खड्डे बुजवण्याची कामे करणार आहेत.१०० कोटींच्या निधीचा प्रस्ताव सरकारदरबारी पडूनमागच्या वर्षी पावसात २७ गावांतील रस्ते अतिवृष्टीत वाहून गेले होते. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारकडे ३२७ कोटींचा निधी मागितला होता. मात्र, तो निधी सरकारकडून मिळाला नाही. त्यात कोरोनाचे संकट सुरू झाले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत जम्बो बैठक घेतली, तेव्हा १०० कोटी रुपयांचा निधी देण्याचे सूतोवाच केले होते. शहरातील रस्ते, सुशोभीकरण, स्वच्छता यासाठी हा निधी दिला जाणार होता. कोविड आपत्तीमुळे हा प्रस्ताव सरकारदरबारी पडून आहे.

टॅग्स :kalyanकल्याण