शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

कल्याण शहरातील डांबरी रस्त्यांची चाळण; वाहनचालकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 12:45 AM

नागरिकांचे हाल । अंतर्गत, प्रमुख रस्ते झाले खड्डेमय; अपघात होण्याची व्यक्त होतेय भीती

कल्याण : केडीएमसी हद्दीतील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांतून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची भीती ते व्यक्त करत आहेत. कल्याण पूर्वेतून पश्चिमेला येणाऱ्या उड्डाणपुलावर तसेच वालधुनी परिसरातही रस्त्यांवर खड्डे आहेत. कल्याण बाजार समिती कार्यालयाकडे व एका मोठ्या रुग्णालयाकडे जाणाºया रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून, त्यात साचलेल्या पाण्यामुळे त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. उंबर्डे परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रिक्षाचालक, दुचाकी, टेम्पो, ट्रकचालक यांना गाडी चालविणे कठीण झाले आहे. यंदा जुलैमध्ये जास्त पाऊस पडलेला नसतानाही रस्त्यांची चाळण कशी झाली, असा सवाल वाहनचालक करत आहेत.

मागच्या वर्षी जुलै, आॅगस्टमध्ये जोरदार अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे रस्ते पाण्यात वाहून गेले होते. यंदा पावसाचा पत्ताच नव्हता. चार दिवसांपूर्वी पाऊस पडला असून, त्यात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. स्थायी समितीने खड्डे बुजवण्यासाठी जवळपास आठ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविले गेले असताना पावसाळ्यात खड्डे पडले कसे, असा प्रश्न आहे. यासंदर्भात केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी सांगितले की, चार दिवसांत पडलेल्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्याचे आदेश संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना दिले असून, ते खड्डे बुजवण्याची कामे करणार आहेत.१०० कोटींच्या निधीचा प्रस्ताव सरकारदरबारी पडूनमागच्या वर्षी पावसात २७ गावांतील रस्ते अतिवृष्टीत वाहून गेले होते. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारकडे ३२७ कोटींचा निधी मागितला होता. मात्र, तो निधी सरकारकडून मिळाला नाही. त्यात कोरोनाचे संकट सुरू झाले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत जम्बो बैठक घेतली, तेव्हा १०० कोटी रुपयांचा निधी देण्याचे सूतोवाच केले होते. शहरातील रस्ते, सुशोभीकरण, स्वच्छता यासाठी हा निधी दिला जाणार होता. कोविड आपत्तीमुळे हा प्रस्ताव सरकारदरबारी पडून आहे.

टॅग्स :kalyanकल्याण