शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

लोकप्रतिनिधींच्या फैऱ्यांवर प्रशासन झाले गप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 12:26 AM

भाईंदर पालिका : मनमानी कारभाराचे काढले वाभाडे

मीरा रोड : विनानिविदा दिलेले लाखो रुपयांचे कंत्राट, हॉलचालकांना पाठीशी घालण्यासह अनेक मनमानी व गैरप्रकारांच्या फैरी शिवसेना खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांसह प्रशासनावर झाडल्या. परंतु, या फैऱ्यांवर प्रशासन मात्र ठोस उत्तरच देऊ शकले नाही.

बुधवारी विचारे व सरनाईकांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यासह पालिका अधिकाºयांची झाडाझडती घेतली होती. या वेळी फेरीवाले हटवण्यासाठी विनानिविदा एस.डी. सर्व्हिसला महिना तब्बल २० लाखप्रमाणे आयुक्त ांसह प्रशासनाने काम दिले. मार्च व एप्रिलचे ३५ लाख रुपये दिले असून मे ते जुलैचे ५० लाख रुपये पालिका देणार आहे. शहरातील फेरीवाले कायम असताना नागरिकांचे लाखो रुपये नियमबाह्य काम करून कुणाच्या घशात घातले जात आहेत, असा सवाल केला. पालिकेने चक्क अत्यावश्यक बाबींसाठी असणाºया कलमाचा संदर्भ विनानिविदा काम देताना लावल्याचे अधिकाºयांनी सांगताच विचारे-सरनाईकांनी चांगलेच धारेवर धरले.नागरिकांच्या सोयीसाठी बनवलेले मीनाताई ठाकरे हॉल व प्रमोद महाजन हॉलही कंत्राटदारांच्या घशात घालून मनमानी लूट चालवली असताना आयुक्त व प्रशासनाने कंत्राटदारास न्यायालयात जाऊ देण्याची संधी दिल्याचा संताप व्यक्त केला. त्यावर आयुक्तांनी न्यायालयात सुनावणी असून चांगले वकील पाठवून स्थगिती हटवू व दोन्ही हॉल पालिका चालवेल, असे आश्वासन दिले.बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या कामाची निविदा स्थायी समितीने मंजूर केली नाही, तर ४५ दिवसांत प्रशासनाने मंजूर करून कार्यादेश देणे आवश्यक असताना प्रशासनाने ते दबावाखाली केले नव्हते. आता ते काम मार्गी लावा, असे सांगितल्यावर आयुक्तांनी ते तपासून कार्यादेश देतो, असे आश्वस्त केले. चेणे येथील रस्त्यासाठी सरकारी निधीतून पाच कोटी मंजूर असून त्याचे कामही पालिका सुरू करेल, असे आयुक्त म्हणाले.

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाच्या आड पालिकेच्या जागी बांधलेल्या मार्केटमध्ये बाहेरचे फेरीवाले आणून बसवले असून शहरातील फेरीवाल्यांना जागा दिली जात नसल्याचे सांगतानाच या कंत्राटाच्या आड भाजपचे मधुसूदन पुरोहित ५० ते ६० लाखांचा मलिदा लाटत असल्याचा गौप्यस्फोट सरनाईकांनी केला. मार्केट पालिकेने ताब्यात घेऊन चालवावे व शहरातील फेरीवाल्यांचे त्यात पुनर्वसन करावे, असे ते म्हणाले....तर तुम्हाला सोडणार नाहीउत्तन येथे कोंत्या व डिसोझा कुटुंबांची पूर्वीपासूनच्या दोन घरांमधील भिंत मागे झालेल्या बेकायदा बांधकामाच्या रस्त्यासाठी बळजबरीने तोडल्याचा संताप या वेळी व्यक्त झाला. रखडलेल्या बीएसयूपी योजनेचे काम लवकर सुरू करण्याचे सांगतानाच त्यात कोणी स्वत:चे हितसंबंध चालवत असेल, तर ते बंद करा, अन्यथा बेघर झालेल्या लोकांसाठी तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा दिला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliticsराजकारण