शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींच्या फैऱ्यांवर प्रशासन झाले गप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:26 IST

भाईंदर पालिका : मनमानी कारभाराचे काढले वाभाडे

मीरा रोड : विनानिविदा दिलेले लाखो रुपयांचे कंत्राट, हॉलचालकांना पाठीशी घालण्यासह अनेक मनमानी व गैरप्रकारांच्या फैरी शिवसेना खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांसह प्रशासनावर झाडल्या. परंतु, या फैऱ्यांवर प्रशासन मात्र ठोस उत्तरच देऊ शकले नाही.

बुधवारी विचारे व सरनाईकांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यासह पालिका अधिकाºयांची झाडाझडती घेतली होती. या वेळी फेरीवाले हटवण्यासाठी विनानिविदा एस.डी. सर्व्हिसला महिना तब्बल २० लाखप्रमाणे आयुक्त ांसह प्रशासनाने काम दिले. मार्च व एप्रिलचे ३५ लाख रुपये दिले असून मे ते जुलैचे ५० लाख रुपये पालिका देणार आहे. शहरातील फेरीवाले कायम असताना नागरिकांचे लाखो रुपये नियमबाह्य काम करून कुणाच्या घशात घातले जात आहेत, असा सवाल केला. पालिकेने चक्क अत्यावश्यक बाबींसाठी असणाºया कलमाचा संदर्भ विनानिविदा काम देताना लावल्याचे अधिकाºयांनी सांगताच विचारे-सरनाईकांनी चांगलेच धारेवर धरले.नागरिकांच्या सोयीसाठी बनवलेले मीनाताई ठाकरे हॉल व प्रमोद महाजन हॉलही कंत्राटदारांच्या घशात घालून मनमानी लूट चालवली असताना आयुक्त व प्रशासनाने कंत्राटदारास न्यायालयात जाऊ देण्याची संधी दिल्याचा संताप व्यक्त केला. त्यावर आयुक्तांनी न्यायालयात सुनावणी असून चांगले वकील पाठवून स्थगिती हटवू व दोन्ही हॉल पालिका चालवेल, असे आश्वासन दिले.बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या कामाची निविदा स्थायी समितीने मंजूर केली नाही, तर ४५ दिवसांत प्रशासनाने मंजूर करून कार्यादेश देणे आवश्यक असताना प्रशासनाने ते दबावाखाली केले नव्हते. आता ते काम मार्गी लावा, असे सांगितल्यावर आयुक्तांनी ते तपासून कार्यादेश देतो, असे आश्वस्त केले. चेणे येथील रस्त्यासाठी सरकारी निधीतून पाच कोटी मंजूर असून त्याचे कामही पालिका सुरू करेल, असे आयुक्त म्हणाले.

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाच्या आड पालिकेच्या जागी बांधलेल्या मार्केटमध्ये बाहेरचे फेरीवाले आणून बसवले असून शहरातील फेरीवाल्यांना जागा दिली जात नसल्याचे सांगतानाच या कंत्राटाच्या आड भाजपचे मधुसूदन पुरोहित ५० ते ६० लाखांचा मलिदा लाटत असल्याचा गौप्यस्फोट सरनाईकांनी केला. मार्केट पालिकेने ताब्यात घेऊन चालवावे व शहरातील फेरीवाल्यांचे त्यात पुनर्वसन करावे, असे ते म्हणाले....तर तुम्हाला सोडणार नाहीउत्तन येथे कोंत्या व डिसोझा कुटुंबांची पूर्वीपासूनच्या दोन घरांमधील भिंत मागे झालेल्या बेकायदा बांधकामाच्या रस्त्यासाठी बळजबरीने तोडल्याचा संताप या वेळी व्यक्त झाला. रखडलेल्या बीएसयूपी योजनेचे काम लवकर सुरू करण्याचे सांगतानाच त्यात कोणी स्वत:चे हितसंबंध चालवत असेल, तर ते बंद करा, अन्यथा बेघर झालेल्या लोकांसाठी तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा दिला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliticsराजकारण