शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 19:23 IST

ठाण्यात शिवसैनिकाला मारहाण करणाऱ्या दुकानदारावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली

Aditya Thackeray: राज्यात हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरुन वाद पेटलेला असताना मराठीच्या मुद्द्यावरुन मारहाणीच्या घटना घडत आहेत. मीरा रोडमध्ये दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली होती. त्यानंतर शेजारीच असलेल्या ठाण्यात हिंदी भाषिकांनी ठाकरे गटाच्या एक शिवसैनिकाला बेदम मारहाण केली. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी हिंदी भाषिकांना त्यांच्या कार्यालयात बोलवून माफी मागायला लावली. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ठाण्यातील ही घटना मराठी -अमराठी वादाची नव्हती असं आदित्य ठाकरे म्हणाले.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एका मोबाईल दुकानामध्ये ग्राहक आणि दुकानामधील कर्मचाऱ्यांमध्ये मोबाईल चार्जिंगला लावण्यावरुन वाद झाला होता. यावेळी दुकानातील हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला बेदम मारहाण केली. मारहाण झालेली व्यक्ती हा ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याचे समोर आलं. मारहाणीनंतर शिवसैनिकाने राजन विचारे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर राजन विचारे यांनी मारहाण करणाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात बोलवून जाब विचारला. यावेळी राजन विचारे यांनी कर्मचाऱ्यांना शिवसैनिकाचे पाय पकडून माफी मागायला लावली. त्यानंतर मारहाण झालेल्या शिवसैनिकाने राजन विचारेंसमोरच दुकानदाराच्या कानशि‍लात लगावली. या दोन्ही घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

या सर्व वादावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. "त्या व्हिडीओनंतर मी राजन विचारे यांना फोन करुन माहिती घेतली. त्यांनी सांगितले की हा विषय मराठी-अमराठीचा किंवा कोणत्याही जातीवादाचा नाही. ठाण्यातील आमच्या पदाधिकारी व्यक्तीला पाच सहा लोकांकडून फोन चार्जिंगवरुन मारहाण झाली. त्यावरुन बाचाबाची झाली. त्या व्यक्तीने आधी मारहाण केली. चार ते पाच जणांनी त्यांना मारहाण केली. एका महिलेने त्यांना वाचवलं. समोर हात उचलल्यानंतर प्रतिक्रिया दिली. ते वैयक्तिक भांडण होते," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

 

"यामध्ये कुठेही मराठी-अमराठीचा वाद नव्हता. मी आधीही सांगितले आहे की, जे लोक महाराष्ट्रात आले आहेत, त्यांना मराठी येत नसेल, तर त्यांच्याविरोधात काहीही भूमिका नाही. पण हिंदीसक्तीच्या विरोधात आम्ही लढत असून, त्याविरोधात आम्ही लढत राहू. प्रत्येक राज्यामध्ये त्या-त्या मातृभाषेचा मान राखलाच पाहिजे. कोणी त्याचा अपमान करू नये, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेthaneठाणेmarathiमराठीhindiहिंदी