शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

‘अवकाळी’ने १६ जणांचा मृत्यू; १०७ घरांची पडझड!

By सुरेश लोखंडे | Updated: May 23, 2025 10:00 IST

ठाणे जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत मोठ्या प्रमाणात नुकसान 

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत झालेल्या वादळ वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसामुळे इमारत दुर्घटना, वीज, झाडे पडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. गाय, म्हैस अशी तीन पशुधन दगावला आहेत. तसेच इमारतीसह १०७ घरांची पडझड हाेऊन नागरिक बेघर झाले. ३०३ शेतकऱ्यांच्या फळबागा, तृणधान्य आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार गेल्या १५ दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे. ठाण्यासह मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर  या तालुक्यांमधील नागरिकांना विविध समस्यांना ताेंड द्यावे लागले. घरांवरील पत्रे व कौले उडून रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. कल्याणला पूर्वेला इमारत काेसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी कल्याण शहरात रिक्षावर झाड पडून तीन जणांचा मृत्यू झाला होता. 

स्फोटात एक, वीज पडून तिघांचा मृत्यू

शहापूरला शाॅर्टसर्किटमुळे गॅस सिलिंडरच्या स्फाेटात एका व्यक्तीचा तर वीज पडून तीन जणांच्या मृत्यूची नाेंद झाली आहे. ठाणे शहरात झाड पडून एक जण दगावला. मुरबाड तालुक्यात दाेघांवर वीज पडून ते मरण पावले. 

८८ हेक्टरवरील फळबागा, भाजीपाल्यांचे नुकसान 

जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे अंशत: पडझड झालेल्या घरांमध्ये सर्वाधिक ७२  घरे शहापूर तालुक्यामधील आहेत. या खालाेखाल भिवंडी तालुक्यातील २५ घरांची पडझड झाली. कल्याण तालुक्यामधील पाच घरे असून, उल्हासनगर शहरातीलही पाच घरांचे माेठे नुकसान झाले. 

शहापूर तालुक्यात दाेन गायी आणि एक म्हैस दगावली. ३०३ शेतकऱ्यांना तब्बल ८८ हेक्टर शेतजमिनीवरील फळबागा, भाजीपाला, तृणधान्याच्या नुकसानीला ताेंड द्यावे लागले आहे. यामध्ये मुरबाड तालुक्यातील ५६ हेक्टरवरील आंब्याच्या बागांच्या नुकसानीचा १९४ शेतकऱ्यांना फटका बसला. 

शेती नुकसानीमुळे मुरबाडचे ३३ गावांमधील शेतकरी बाधित झाले. भिवंडी तालुक्यामधील ३२ गावांच्या १०२ शेतकऱ्यांना ३२ हेक्टरचे नुकसान झाले. कल्याणमधील चार गावांच्या सात शेतकऱ्यांना तीन हेक्टरवरील शेतीच्या नुकसानीचा फटका बसला. 

टॅग्स :Rainपाऊस