शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात १०० कोटींच्या रस्त्यांची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:44 IST

ठाणे : वारंवार पडणाऱ्या पावसामुळे खड्डे पडून शहरातील रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन ठाणेकरांकडून तीव्र संताप ...

ठाणे : वारंवार पडणाऱ्या पावसामुळे खड्डे पडून शहरातील रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन ठाणेकरांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहराच्या विविध मुख्य रस्त्यांवर तसेच अंतर्गत रस्त्यांवर शेकडो खड्डे असूनही महापालिकेने सध्या अवघे ११२ खड्डे असल्याचा दावा केला आहे. तर प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली गेल्या वर्षी स्थानिकांना डावलून दिल्लीतील ज्या ठेकेदारास १०० कोटींची कामे कमी दराने दिली होती, त्याच रस्त्यांना आता खड्डे पडले असून, सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील म्हणून त्यावर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नसल्याची चर्चा आहे.

दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र तरीसुद्धा जुन्या व नव्या रस्त्यांचीदेखील यंदाच्या पावसात चाळण झाली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, शहरात दोन हजार ८३६ खड्डे असून, त्यातील दोन हजार ७२४ खड्डे भरले आहेत. तर आजही ११२ खड्डे बुजविणे शिल्लक आहे.

शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या जोडीने शहरातील वाहनांची संख्याही वाढत आहे. शहरात आजघडीला २१ लाख ३८ हजार ६७ वाहने आहेत. परंतु, काही रस्त्यांचे रुंदीकरण झाले तर काहींची नव्याने बांधणी केली आहे. त्यानुसार शहरातील एकूण रस्त्यांची लांबी जी पूर्वी ३५६ किमी होती, त्यात २०१८-१९ मध्ये वाढ होऊन ती ३७० किमी एवढी झाली आहे. शहरात एकूण १४ प्रमुख रस्ते आहेत. त्यांचे क्षेत्रफळ ३०.७६ हेक्टर एवढे आहे. शहरात डांबरी रस्ते २१२.४९ किमीचे तर सिमेंट रस्ते १४६.९९ किमीचे आहेत. यातील काही रस्ते नव्याने विकसित केले आहेत.

तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खड्ड्यांमुळे होणारी कोंडी फोडण्यासाठी नव्या पद्धतीने रस्ते विकसित करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार या रस्त्यांची कामे झाली जरी असली तरी त्या रस्त्यांवरही आता खड्डेच खड्डे असे चित्र आहे. शहरातील घोडबंदर, तीनहातनाका, नितीन कंपनी, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट, घोडबंदर सेवा रस्ता, माजिवडा, कापुरबावडी, कॅसल मिल तसेच येथील उड्डाणपूल या सर्वांवरच तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही खड्डेच खड्डे आहेत.

यंदा खड्डे बुजविण्यासाठी अडीच कोटींचा खर्च महापालिकेने केला आहे. परंतु, या खड्ड्यांना तात्पुरता मुलामा लावला जात असल्याने या रस्त्यांची चाळण होत आहे. रस्ते तयार करण्यासाठी ज्या ज्या ठेकेदारांना ही कामे दिली होती त्यांच्याकडून ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे आता उघड झाले आहे. परंतु, त्यांना काळ्या यादीत टाकण्याऐवजी महापालिका पुन्हा पुन्हा त्यांनाच रस्त्यांची कामे देत आहे. त्यातही एखादा रस्ता तयार करायचा झाला तर त्या रस्त्याच्या ठिकाणी किती लेयर असणे आवश्यक आहे, डांबर कशा प्रकारे वापरले गेले पाहिजे, त्याचे निकष - नियम काय आहेत यालाही कोलदांडा दाखवून ठेकेदारांकडून काम मिळविण्यासाठी आणि टक्केवारी देण्यासाठी निकृष्ट दर्जाचे रस्ते केले जात आहेत. या रस्त्यांवर खड्डे पडू नयेत म्हणून महापालिकेकडून यू टी डब्ल्यू टी अत्याधुनिक काँक्रिट यासह विविध प्रयोग करण्यात येत आहेत. मात्र, तरीही रस्त्यांची चाळण होत आहे.

रस्ते उभारणीत कामचुकारपणा किंवा ढिलाई करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ठामपा आयुक्तांकडून देण्यात येते. परंतु, कोणावरही कारवाई केली जात नाही. याचेही आश्चर्य वाटत आहे.

......