शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

भारतामधील स्मार्टफोन बाजारात १.७ टक्के घसरण; उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 06:52 IST

उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण

नवी दिल्ली : अनेक वर्षांच्या वृद्धीनंतर भारतीय स्मार्टफोन बाजारात २०२० मध्ये प्रथमच १.७ टक्क्यांची घसरण झाली आहे. २०२१ हे वर्ष मात्र स्फार्ट फोन बाजारासाठी आशादायक राहील, असा अंदाज आहे.

गेल्यावर्षी कोविड-१९ लॉकडाऊनमुळे लोक घरीच होते. तरीही वर्क फ्रॉम होम, घरूनच सुरू झालेल्या शाळा यांचा थोडा लाभ बाजाराला झाला. मात्र प्रवासावरील मर्यादा आणि वस्तू उत्पादन क्षेत्रातील टाळेबंदी याचा फटका बाजाराला बसला. लाखो लोक बेरोजगार झाल्यामुळे मागणीत मोठी घट झाली. त्याचा प्रचंड फटका स्मार्ट फोन विक्रीला बसला, अशी माहिती इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशनच्या (आयडीसी) अहवालात देण्यात आली आहे.

अहवालात म्हटले आहे की, २०२० मध्ये एकूण १५० दशलक्ष स्मार्ट फोन विकले गेले. वार्षिक आधारावर विक्रीत १.७ टक्के घसरण झाली आहे. २०२० च्या पहिल्या सहामाहीत स्मार्टफोनची मागणी २६ टक्क्यांनी घसरली. दुसऱ्या सहामाहीत मात्र मागणीत १९ टक्के सुधारणा झाली. अहवालात म्हटले आहे की, २०२० च्या शेवटी मागणीत झालेली मोठी वाढ २०२१ साठी आशेचा किरण घेऊन आली आहे. हे वर्ष स्मार्टफोन बाजारासाठी चांगले राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान