शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

उत्कृष्ट काम करणाºया महिलांनी राजकारणात यावं : अंजली आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 1:19 PM

वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ व भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने सोलापुरात महिला मेळावा

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणाला धम्माची जोड दिली - अंजली आंबेडकरमहिलांनी केवळ चूल आणि मूल या संकल्पनेत न राहता, स्वत:च्या कक्षा व्यापक करण्याची गरज - अंजली आंबेडकर प्रत्येक महिलेने आपल्या सुना-बाळा,मुलींच्या मागे जिजाऊंप्रमाणे उभे रहावे - अंजली आंबेडकर

सोलापूर : महिलांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे; मात्र त्या जर पदावर आल्या तर उत्कृष्ट काम करू शकतात. वंचित बहुजन आघाडीत महिला सुरक्षित असून, त्यांनी राजकारणात यावे, असे आवाहन वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रमुख नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केले. 

डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यानिमित्त त्या आंबेडकर या सोलापुरात आल्या असता त्यांच्याशी ‘लोकमत’ च्या प्रतिनिधींनी संवाद साधला.

अंजली आंबेडकर बोलताना म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणाला धम्माची जोड दिली आहे. महिलांनी केवळ चूल आणि मूल या संकल्पनेत न राहता, स्वत:च्या कक्षा व्यापक करण्याची गरज आहे. प्रत्येक महिलेने आपल्या सुना-बाळा,मुलींच्या मागे जिजाऊंप्रमाणे उभे रहावे. वैचारिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक चळवळ महिलांनी उभी करावी.  

वंचित बहुजन आघाडीमधील वंचित या शब्दाचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा या शब्दाचा अर्थ उलगडेल तेव्हा समाजातील सर्व जातीधर्मातील लोक जोडले जातील. 

लोकसभा निवडणुकीच्यावेळी आपण आपल्या उत्साहातच राहिलो; मात्र अपयशाने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागले पाहिजे. वंचित शब्दाचा अर्थ समजून घ्या, कोण कोण वंचित आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचा, आपापल्या परिसरातील मूलभूत प्रश्न उचलून धरा, सोलापुरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो उचलून धरा, सच्चा कार्यकर्ता म्हणून स्वत:ला घडवा असेही प्रा. अंजली प्रकाश आंबेडकर यांनी महिलांना सांगितले. 

संघाकडून संविधान बदलण्याचे षडयंत्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला एकसंध ठेवण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती केली. समतेवर आधारित भारतीय संविधान बदलण्याचे षडयंत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केले जात आहे. आजच्या युगात महिला शिक्षणासह राजकीयदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. शिवबाला जसे जिजाऊंने घडवले, डॉ. बाबासाहेबांच्या पाठीशी रमाई खंबीरपणे उभी राहिली त्यामुळे समाजात परिवर्तन झाले. त्यांचा आदर्श आजच्या महिलांनी घेण्याची गरज आहे. महिलांनी राजकारणात येऊन बदल घडवावा, महिलांनी महिलांचा मान राखला पाहिजे, असे मत वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर