शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सोलापूर जिल्ह्यात शेतीसाठी सोलरचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 12:31 IST

महावितरणचा उपक्रम ; ३११ शेतकºयांनी भरले पैसे; ४४९६ अर्ज प्राप्त

ठळक मुद्देमार्च १८ पर्यंत कोटेशन भरलेल्या ९ हजार १८८ शेतकºयांना स्वतंत्र किंवा दोन-तीन शेतकºयांमध्ये स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम केले जाणार जिल्हाभरातून ४ हजार ४९६ शेतकºयांनी अर्ज केले होते. यातून २७८७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत

सोलापूर : मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजनेसाठी जिल्ह्यातून ४४९६ शेतकºयांनी अर्ज केले होते, त्यापैकी ३११ शेतकºयांनी कोटेशन भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात प्रथमच सोलरवर शेतीपंप सुरू होणार आहेत.

शेतीपंपासाठी वीज कनेक्शनसाठी पैसे भरूनही कनेक्शन मिळत नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. अशातच मार्च २०१८ पर्यंत पैसे भरलेल्या शेतकºयांना कनेक्शन देण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेतून ठेकेदाराला काम दिले आहे. मार्च १८ पर्यंत कोटेशन भरलेल्या ९ हजार १८८ शेतकºयांना स्वतंत्र किंवा दोन-तीन शेतकºयांमध्ये स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम केले जाणार आहे. याची निविदा कंपनीला दिली असल्याचे सांगण्यात आले.

मात्र ज्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्यासाठी अधिक पोलची आवश्यकता आहे किंवा शेतीपंपाला वीज देण्यासाठी जवळपास लाईन नाही, अशा ठिकाणी व गरजेनुसार सोलर यंत्रणा बसविण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. यासाठी शेतकºयांकडून अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हाभरातून ४ हजार ४९६ शेतकºयांनी अर्ज केले होते. यातून २७८७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये क्षेत्र चुकीचे असणे, गटनंबर चुकीचा टाकणे, १०० मीटरपेक्षा अधिक खोलीचा बोअर असणे, अतिशोषित (पाणी उपसा बंद असलेला भाग) सामाईक क्षेत्र असलेल्यांनी संमतीपत्र दिले नाही, असे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. पात्र असलेल्यांपैकी ५४५ शेतकºयांना कोटेशनपत्र दिले होते. 

पत्र दिलेल्यांमधील ३११ शेतकºयांनी प्रत्यक्षात पैसे भरले असल्याचे महावितरण कार्यालयातून सांगण्यात आले. उर्वरित पात्र शेतकºयांनाही शेतकरी हिस्सा भरण्यासाठी पत्र दिले जाणार असून, जे शेतकरी पैसे भरतील त्यांना सोलर कृषी पंप बसवून दिला जाईल. तीन एचपीसाठी साधारण १८ हजार व ५ एचपीसाठी साधारण २६ हजार रुपये शेतकºयांनी भरावयाचे असून, सोलरसाठीचा संपूर्ण खर्च वीज महामंडळ करणार आहे.

३९ सोलरपंप बसविले- मागील वर्षीपासून जिल्ह्यात सौरवर चालणारे शेतीपंप बसविण्याचे काम सुरू आहे. अटल सोलर कृषी पंप योजनेतून मागील वर्षभरात ३९ शेतीपंप बसविले असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले. नव्याने अर्ज करणाºयांना व ज्या ठिकाणी शेतीपंपाला वीज देण्यासाठी यंत्रणा नाही, अशा ठिकाणी सोलर कनेक्शन दिले जात असल्याचे पडळकर यांनी सांगितले. 

ज्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्यासाठी अडचणीचे आहे, अशा ठिकाणी सोलर कनेक्शन दिले जाणार आहे. तीन व पाच हॉर्सपॉवरचे पंप बसविले जाणार आहेत. यासाठी शेतकरी हिस्सा भरलेल्यांना कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. पात्र असलेल्यांकडून पैसे भरून घेऊन कनेक्शन दिले जाणार आहेत.- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणagricultureशेतीFarmerशेतकरीPower Shutdownभारनियमन