शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात शेतीसाठी सोलरचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 12:31 IST

महावितरणचा उपक्रम ; ३११ शेतकºयांनी भरले पैसे; ४४९६ अर्ज प्राप्त

ठळक मुद्देमार्च १८ पर्यंत कोटेशन भरलेल्या ९ हजार १८८ शेतकºयांना स्वतंत्र किंवा दोन-तीन शेतकºयांमध्ये स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम केले जाणार जिल्हाभरातून ४ हजार ४९६ शेतकºयांनी अर्ज केले होते. यातून २७८७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत

सोलापूर : मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजनेसाठी जिल्ह्यातून ४४९६ शेतकºयांनी अर्ज केले होते, त्यापैकी ३११ शेतकºयांनी कोटेशन भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात प्रथमच सोलरवर शेतीपंप सुरू होणार आहेत.

शेतीपंपासाठी वीज कनेक्शनसाठी पैसे भरूनही कनेक्शन मिळत नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. अशातच मार्च २०१८ पर्यंत पैसे भरलेल्या शेतकºयांना कनेक्शन देण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेतून ठेकेदाराला काम दिले आहे. मार्च १८ पर्यंत कोटेशन भरलेल्या ९ हजार १८८ शेतकºयांना स्वतंत्र किंवा दोन-तीन शेतकºयांमध्ये स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम केले जाणार आहे. याची निविदा कंपनीला दिली असल्याचे सांगण्यात आले.

मात्र ज्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्यासाठी अधिक पोलची आवश्यकता आहे किंवा शेतीपंपाला वीज देण्यासाठी जवळपास लाईन नाही, अशा ठिकाणी व गरजेनुसार सोलर यंत्रणा बसविण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. यासाठी शेतकºयांकडून अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हाभरातून ४ हजार ४९६ शेतकºयांनी अर्ज केले होते. यातून २७८७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये क्षेत्र चुकीचे असणे, गटनंबर चुकीचा टाकणे, १०० मीटरपेक्षा अधिक खोलीचा बोअर असणे, अतिशोषित (पाणी उपसा बंद असलेला भाग) सामाईक क्षेत्र असलेल्यांनी संमतीपत्र दिले नाही, असे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. पात्र असलेल्यांपैकी ५४५ शेतकºयांना कोटेशनपत्र दिले होते. 

पत्र दिलेल्यांमधील ३११ शेतकºयांनी प्रत्यक्षात पैसे भरले असल्याचे महावितरण कार्यालयातून सांगण्यात आले. उर्वरित पात्र शेतकºयांनाही शेतकरी हिस्सा भरण्यासाठी पत्र दिले जाणार असून, जे शेतकरी पैसे भरतील त्यांना सोलर कृषी पंप बसवून दिला जाईल. तीन एचपीसाठी साधारण १८ हजार व ५ एचपीसाठी साधारण २६ हजार रुपये शेतकºयांनी भरावयाचे असून, सोलरसाठीचा संपूर्ण खर्च वीज महामंडळ करणार आहे.

३९ सोलरपंप बसविले- मागील वर्षीपासून जिल्ह्यात सौरवर चालणारे शेतीपंप बसविण्याचे काम सुरू आहे. अटल सोलर कृषी पंप योजनेतून मागील वर्षभरात ३९ शेतीपंप बसविले असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले. नव्याने अर्ज करणाºयांना व ज्या ठिकाणी शेतीपंपाला वीज देण्यासाठी यंत्रणा नाही, अशा ठिकाणी सोलर कनेक्शन दिले जात असल्याचे पडळकर यांनी सांगितले. 

ज्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्यासाठी अडचणीचे आहे, अशा ठिकाणी सोलर कनेक्शन दिले जाणार आहे. तीन व पाच हॉर्सपॉवरचे पंप बसविले जाणार आहेत. यासाठी शेतकरी हिस्सा भरलेल्यांना कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. पात्र असलेल्यांकडून पैसे भरून घेऊन कनेक्शन दिले जाणार आहेत.- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणagricultureशेतीFarmerशेतकरीPower Shutdownभारनियमन