शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

सोलापूर जिल्ह्यात शेतीसाठी सोलरचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 12:31 IST

महावितरणचा उपक्रम ; ३११ शेतकºयांनी भरले पैसे; ४४९६ अर्ज प्राप्त

ठळक मुद्देमार्च १८ पर्यंत कोटेशन भरलेल्या ९ हजार १८८ शेतकºयांना स्वतंत्र किंवा दोन-तीन शेतकºयांमध्ये स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम केले जाणार जिल्हाभरातून ४ हजार ४९६ शेतकºयांनी अर्ज केले होते. यातून २७८७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत

सोलापूर : मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजनेसाठी जिल्ह्यातून ४४९६ शेतकºयांनी अर्ज केले होते, त्यापैकी ३११ शेतकºयांनी कोटेशन भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात प्रथमच सोलरवर शेतीपंप सुरू होणार आहेत.

शेतीपंपासाठी वीज कनेक्शनसाठी पैसे भरूनही कनेक्शन मिळत नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. अशातच मार्च २०१८ पर्यंत पैसे भरलेल्या शेतकºयांना कनेक्शन देण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेतून ठेकेदाराला काम दिले आहे. मार्च १८ पर्यंत कोटेशन भरलेल्या ९ हजार १८८ शेतकºयांना स्वतंत्र किंवा दोन-तीन शेतकºयांमध्ये स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम केले जाणार आहे. याची निविदा कंपनीला दिली असल्याचे सांगण्यात आले.

मात्र ज्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्यासाठी अधिक पोलची आवश्यकता आहे किंवा शेतीपंपाला वीज देण्यासाठी जवळपास लाईन नाही, अशा ठिकाणी व गरजेनुसार सोलर यंत्रणा बसविण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. यासाठी शेतकºयांकडून अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हाभरातून ४ हजार ४९६ शेतकºयांनी अर्ज केले होते. यातून २७८७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये क्षेत्र चुकीचे असणे, गटनंबर चुकीचा टाकणे, १०० मीटरपेक्षा अधिक खोलीचा बोअर असणे, अतिशोषित (पाणी उपसा बंद असलेला भाग) सामाईक क्षेत्र असलेल्यांनी संमतीपत्र दिले नाही, असे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. पात्र असलेल्यांपैकी ५४५ शेतकºयांना कोटेशनपत्र दिले होते. 

पत्र दिलेल्यांमधील ३११ शेतकºयांनी प्रत्यक्षात पैसे भरले असल्याचे महावितरण कार्यालयातून सांगण्यात आले. उर्वरित पात्र शेतकºयांनाही शेतकरी हिस्सा भरण्यासाठी पत्र दिले जाणार असून, जे शेतकरी पैसे भरतील त्यांना सोलर कृषी पंप बसवून दिला जाईल. तीन एचपीसाठी साधारण १८ हजार व ५ एचपीसाठी साधारण २६ हजार रुपये शेतकºयांनी भरावयाचे असून, सोलरसाठीचा संपूर्ण खर्च वीज महामंडळ करणार आहे.

३९ सोलरपंप बसविले- मागील वर्षीपासून जिल्ह्यात सौरवर चालणारे शेतीपंप बसविण्याचे काम सुरू आहे. अटल सोलर कृषी पंप योजनेतून मागील वर्षभरात ३९ शेतीपंप बसविले असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले. नव्याने अर्ज करणाºयांना व ज्या ठिकाणी शेतीपंपाला वीज देण्यासाठी यंत्रणा नाही, अशा ठिकाणी सोलर कनेक्शन दिले जात असल्याचे पडळकर यांनी सांगितले. 

ज्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्यासाठी अडचणीचे आहे, अशा ठिकाणी सोलर कनेक्शन दिले जाणार आहे. तीन व पाच हॉर्सपॉवरचे पंप बसविले जाणार आहेत. यासाठी शेतकरी हिस्सा भरलेल्यांना कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. पात्र असलेल्यांकडून पैसे भरून घेऊन कनेक्शन दिले जाणार आहेत.- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणagricultureशेतीFarmerशेतकरीPower Shutdownभारनियमन