शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

शाळा म्हणजे संस्कार केंद्र...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 1:01 PM

शाळा ही केवळ ज्ञान देणारी इमारत नसते तर विद्यार्थ्यांवर संस्कार घडविणारे एक संस्कार केंद्र असते. मुलांची ‘पहिली शाळा’ ही ...

शाळा ही केवळ ज्ञान देणारी इमारत नसते तर विद्यार्थ्यांवर संस्कार घडविणारे एक संस्कार केंद्र असते. मुलांची ‘पहिली शाळा’ ही आईच असते. परंतु, ज्यावेळी मुलगा चार-पाच वर्षांचा होतो, तेव्हा प्रत्येक पालक आपल्या पाल्याचा एखाद्या चांगल्या शाळेत प्रवेश घ्यायचा प्रयत्न करतात. सर्वजण चांगली शाळा शोधत असतात. परंतु, चांगली शाळा म्हणजे काय हो ? मोठी इमारत, मोठे अंगण, बगिचा, पिण्याचे पाणी एवढंच? तर नाही. या तर आवश्यक आहेतच, या सर्व सोयी असल्या तर आपण त्या शाळेला चांगली शाळा म्हणू. पण आदर्श शाळा म्हणता येणार नाही.

आदर्श शाळा ही नुसती शाळा नसून ते एक विद्यार्थी घडविण्याचे केंद्र असते. आदर्श शाळेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगला, अनुभवी, प्रेमळ शिक्षक वर्ग - शिकवणारे शिक्षक आदर्श असतील तर शाळासुद्धा आदर्श बनते. आणि अशा शाळेत विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात शिकविण्याचे काम सुरू असते. चांगल्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास ज्या शाळेत होतो ती आदर्श शाळा ठरते. कारण फक्त शिक्षण घ्यायचे असेल तर ते कुठेही मिळते. पण विद्यार्थ्यांमधील खेळाडूवृत्ती, कला, संशोधक वृत्ती इ. बºयाच गुणांना वाव मिळवून देण्यासाठी मंच तयार करून देणे व त्यांना योग्य व्यक्तीकडून योग्य वेळी मार्गदर्शन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांकडे वेळच नाही, आपल्या पाल्यांसाठी. पालकांची मानसिकता बदललेली आहे. ते शिक्षकांवरच पूर्णपणे अवलंबून आहेत. चांगल्या शाळेत प्रवेश करूनसुद्धा कुठे ना कुठे कोचिंगसुद्धा लावतात. कोचिंग लावून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. एवढंच नव्हे तर कोचिंगच्या शिक्षकांऐवजी पुन्हा शाळेच्या शिक्षकांवरच त्यांच्या सर्व आशा असतात.

अशा सर्व परिस्थितीत केवळ पालकांना दोष देऊन चालणार नाही तर यावर तोडगा काढावा लागेल आणि हेसुद्धा शाळेचेच काम आहे; म्हणजे आदर्श शाळेचेच काम आहे. अशा स्थितीत ज्या शाळेतील शिक्षक हे शिक्षक व पालक अशी दुहेरी भूमिका निभावतात, ते शिक्षक व ती शाळा आदर्श शाळा ठरते.

योग्य शिक्षण मिळाले, सुप्त गुणांचा विकास झाला, पण विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये नसतील तर त्याचा काय फायदा? शिक्षण तर जीवन जगण्याची कला शिकविते, माणसाला माणूस बनविते़ आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस प्रगती तर करत आहे परंतु, त्याच्यामधील मानवता हळूहळू नष्ट होत आहे. स्वार्थी वृत्ती वाढत आहे. स्पर्धेच्या युगात चांगले-वाईट यातील फरक न समजून घेता प्रत्येक व्यक्ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशावेळी तो दुसºयांना सोबत न घेता त्यांना खाली पाडून स्वत: पुढे कसे जाता येईल याचाच विचार करत आहे आणि हे सर्व घडत आहे ते मुलांमधील मूल्य शिक्षणाच्या अभावामुळे, म्हणून मुलांना लहानपणापासूनच मूल्य शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे आणि जी शाळा विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण देण्यात यशस्वी ठरते तीच आदर्श शाळा बनते. एकंदरीत विद्यार्थ्यांना भौतिक सोयी-सुविधा देण्याबरोबर योग्य शिक्षण, योग्य संस्कार, त्यांच्यामधील सुप्त गुणांचा विकास करणारी शाळाच आदर्श शाळा ठरते.- संयोगिता सुभाष गुरुजी,(लेखिका या शिक्षणक्षेत्रात कार्यरत आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा