शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

बंधाºयावरील पाणी अडवण्यासाठी आता फायबरची दारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:25 PM

कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयावर पाणी अडवण्यासाठी लोखंडी दरांना पर्याय म्हणून नव्या तंत्रज्ञानाचे फायबरची दारे वापरता येतात अशी माहिती सोलापुरातील उद्योजक सूर्या मल्टी प्रॉडक्टचे  दत्ताअण्णा सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देफायबरच्या दारांची तपासणी शासनाच्या नाशिक येथील मेरी संस्थेकडून सूर्या मल्टी प्रॉडक्ट इपोंर्ट एक्स्पोर्टच्या माध्यमातून विविध देशात पाहणी

सोलापूर: कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयावर पाणी अडवण्यासाठी लोखंडी दरांना पर्याय म्हणून नव्या तंत्रज्ञानाचे फायबरची दारे वापरता येतात अशी माहिती सोलापुरातील उद्योजक सूर्या मल्टी प्रॉडक्टचे  दत्ताअण्णा सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या फायबरच्या    दारांची तपासणी शासनाच्या नाशिक येथील मेरी संस्थेकडून करवून घेऊन तसे प्रमाणपत्रही घेण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

    नदीमधून वाहणारे पाणी गावोगावी थांबावे त्यातून सिंचन क्षेत्र वाढावे आणि शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आणि त्या बंधाºयावर पाणी अडवण्यासाठी लोखंडी प्लेट म्हणजेच चॅनल निडलचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येतो, परंतु पाण्यात लोखंड जास्त काळ टिकत नाही.  लोखंडी निडलमध्ये पाणी फार काळ टिकत नाही त्याचबरोबर चॅनल निडलला गंज किंवा त्याची चोरी होणे यातून सरकारला मोठे आर्थिक नुकसान तर होतेच त्याचबरोबर पाणी वाहून गेल्याने शेतकºयांचेही मोठे नुकसान होते. 

शासनस्तरावर शेतकºयांसाठी बांधण्यात येणारे बंधारे आणि त्यांचा उद्देश सफल होत नाही म्हणूनच या सर्व समस्यांवर उपाय म्हणून नवे तंत्रज्ञान वापरून बंधाºयावर पाणी अडवण्यासाठी कायमस्वरूपी टिकेल असे फायबरचे दरवाजे तयार करता येतील का याचा विचार केला आणि त्यानुसार सूर्या मल्टी प्रॉडक्ट इपोंर्ट एक्स्पोर्टच्या माध्यमातून विविध देशात पाहणी करण्यात आली त्यातून जर्मनी येथून फायबर निडलचे तंत्रज्ञान आणले जे अमेरिकेच्या स्टँर्डडप्रमाणे आहे. त्यानंतर दक्षिण कोरियातील सेऊलमध्ये हे नवे तंत्रज्ञान विकसित करून तेथेच तयार करण्यात आले.

आता सध्या त्याचा वापर आपल्या देशातील बंधाºयासाठी पर्यायाने शेतकºयांच्या हितासाठी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. त्यामुळे परिसरातील सिंचनक्षेत्र वाढून शेतकरी समृद्ध होण्यास मदत झाली असेही दत्ताअण्णा सुरवसे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राजकुमार सुरवसे उपस्थित होते.

३५0 फायबर निडल बसविले...- सोलापूर जिल्ह्यातील तिºहे, अर्जुनसोंड आणि शिंगोली येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयावर ३५0 फायबर निडल बसवण्यात आले आहेत. फायबर निडल बंधाºयावर बसवल्यानंतर या निडलमधील जोडणीमधून पाणी गळती होऊन पुढे वाहून गेले नाही. बंधाºयावर ५ मीटरपर्यंत पाणी थांबल्याने पाण्याची साठवण मोठ्या प्रमाणात झाली. पूर्वी पाणी सोडल्यानंतर अवघ्या काही दिवसातच पाणी वाहून जात होते, परंतु फायबरचे निडल बसवल्यानंतर तीन-तीन महिने पाणी बंधाºयात साठून राहू लागले असल्याचे दत्ताअण्णा सुरवसे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई