शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकºयांना आता शेतीतील मजुरीही झाली महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 19:51 IST

श्रीपूर परिसर : आर्थिक कोंडी, मजुरांच्या वाहतुकीचा खर्चही शेतकºयांवर

ठळक मुद्देश्रीपूर (ता. माळशिरस) भागांमध्ये जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या लांबल्याबोअर व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढल्याने शेती ओलिताखाली आली खुरपणाचा खर्च वाढत चाललेला असून मजुरांचा तुटवडा निर्माण झाला

संदीप लोनकरश्रीपूर : श्रीपूर (ता. माळशिरस) भागांमध्ये जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या लांबल्या. जुलैअखेर काही प्रमाणात पडलेल्या पावसामुळे कॅनॉल व नदीला पाणी आल्यामुळे शेतातील बोअर व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढल्याने शेती ओलिताखाली आली आहे. मात्र पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण निर्माण झाले आहे. 

परिणामी खुरपणाचा खर्च वाढत चाललेला असून मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आधीच दुष्काळामुळे होरपळलेला असताना आता मंजुरीमुळे जेरीस आला आहे.

माळशिरस तालुक्यामध्ये जून महिना कोरडा गेला. जुलै-आॅगस्टच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावली. पण धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सर्व धरणे १०० टक्के भरून वाहू लागली. 

त्यामुळे तालुक्यात कॅनॉल व नद्यांना पाणी आल्यामुळे पाणीपातळी वाढली आहे. परिणामी हजारो एकर शेती ओलिताखाली आली. ऊस शेती व सर्व पिकांना भरपूर पाणी दिल्याने तर मोठ्या प्रमाणात शेतात तण वाढले आहे. पिकांमधील तण काढण्यासाठी महिला मजुरांची खुरपणीसाठी मनधरणी करावी लागत आहे.

महिला मजुरांना मागणी वाढली- तालुक्यामध्ये यावर्षी पावसामुळे सुरुवातीला लागवड उशिरा करण्यात आली. त्यातच पावसाने जून महिन्यात पाठ फिरवली. यानंतर जुलै महिन्यात शेवटच्या आलेल्या पावसामुळे शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. तर नद्यांना पाणी आल्यामुळे बोअर व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. यामुळे शेती ओलिताखाली आल्याने शेतात तण वाढले. शेतातील तण काढण्यासाठी खर्चही वाढला. खुरपणासाठी महिला मजुरांची मागणी वाढत आहे. यामुळे मजुरी वाढवून देऊन शेतकरी खुरपणाची कामे करीत आहेत.

अतिरिक्त खर्चात झाली वाढ- पूर्वी गावातून शेतमजूर पायीच चालत शेतात येत होते. मात्र गेल्या काही वर्षात मजुरांच्या वाहतुकीसाठी वाहनांची सुविधा शेतकºयांना उपलब्ध करून द्यावी लागते. त्यासाठी ३०० ते ५०० रुपये प्रती दिवस शेतकºयांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

ठेका पद्धतीने शेतीची खुरपणी- यावर्षी महिला मजुरांची मजुरी शंभर ते दीडशे रुपयांच्या घरात असून त्यांना गावापासून शेतापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहन करावे लागते. त्याच्या वाहतुकीचा अतिरिक्त खर्चही शेतकºयांनाच करावा लागत आहे. महिला मजुरांची टंचाई असल्यामुळे दहा ते पंधरा महिलांची टोळी तयार करून काही महिला ठेका पद्धतीने खुरपणीचे काम घेतात. ते शेतामध्ये तणानुसार एकरी दोन ते चार हजार रुपये घेतात.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ