शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

कर्जमाफीत कमावलं... अवकाळीनं गमावलं...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 12:08 PM

 द्राक्षासह ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे नुकसान; कडबाही काळा पडण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला

ठळक मुद्देअवकाळीने द्राक्षाचे भाव गडगडले असून, द्राक्ष काढणी व विक्री थांबलीअवकाळीच्या झटक्याने द्राक्ष भाव ३० रुपयांपर्यंत खाली आलेशहर व जिल्ह्यात शनिवारी वादळी वाºयासह मुसळधार अवकाळी पाऊस

सोलापूर : पेरणीपूर्व मशागत़़़ त्यानंतर योग्य त्यावेळी खुरपणी, फवारणी, खतांची मात्रा देऊन मोठ्या कष्टाने पिके जोमात आणली़ सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे़ काही ठिकाणी खळेही सुरू आहे. त्यातच रातोरात अवकाळी पावसाने शेतकºयांनी मोठ्या कष्टाने जोपासलेल्या या पिकांवर पाणी पाडून त्यांच्या कष्टाचे मोल शून्य केले़ या अवकाळी पावसामुळे ज्वारी, कडबा काळा पडणार तर द्राक्ष बागेतील मणी पडून शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे़ एकीकडे शनिवारीच शासनाने शेतकºयांना कर्जमाफीत कमावलं तर दुसरीकडे नैसर्गिक संकटाने शेतकºयांचा चिंतेत टाकत सर्वकाही गमावलं आहे.

शहर व जिल्ह्यात शनिवारी वादळी वाºयासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. रविवारी सायंकाळी दुसºया दिवशीही सुमारे पाऊणतास पावसाची रिपरिप होती. रविवारी रात्री साडेआठपर्यंत सात मिलिमीटर पाऊस पडला. तत्पूर्वी शनिवारी रात्री आठ मिलिमीटर पाऊस  पडला.

रविवारी दिवसभर नेहमीसारखे ऊन पडले होते. वातावरणात  उकाडा जाणवत होता. त्यामुळे पावसाची शक्यता होती.  सायंकाळी सहा वाजेपर्यंत आकाश निरभ्र होते. त्यानंतर आकाशात ढगांची गर्दी जमू लागली.  तासाभरात पावसाचे टपोरे थेंब कोसळायला सुरुवात झाली. त्याचवेळी जोरदार वारेही वाहू लागले. काहीवेळात  पावसाची रिपरिप सुरु झाली. होटगी रोड, विजापूर रोड  यासह गावठाण भागातील पांजरापोळ चौक, बाळीवेस,  चौपाड, एम्प्लॉयमेंट चौक परिसर, सिद्धेश्वर मंदिर  येथेही पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते.

अवकाळीने द्राक्षाचे भाव गडगडले असून, द्राक्ष काढणी व विक्री थांबली आहे. द्राक्ष विक्री योग्य झाल्याने व्यापाºयांनी द्राक्ष बागा चढ्या दराने घेण्यास सुरुवात केली होती. ४० ते ५० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. परंतु अवकाळीच्या झटक्याने द्राक्ष भाव ३० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. व्यापारी मात्र द्राक्ष बागा घेण्यास धजावत नसल्याने याचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे़,  अवकाळी पावसामुळे द्राक्ष घडात पाणी उतरून ते तडकलेल्या मण्यात शिरते. त्यामुळे प्रथम मणी नासण्याची क्रिया चालू होते. ते नासलेले पाणी पूर्ण द्राक्ष घडात उतरते व पूर्ण घड नासतो. औषध फवारणी करूनही त्याचा उपयोग होत नाही. परंतु द्राक्ष घडातील पाणी काढून सुकविण्यासाठी हवेची फवारणी सातत्याने करावी लागते़ हाच एकमेव पर्याय आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी