शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

सोलापुरात पाण्यासाठी ५०० फुटांपर्यंत खोदाई; बोअरवेल्सच्या संख्येमुळे भेंगाळते भूई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 12:24 IST

कोणाची नाही नियंत्रण?,शहराची भूजल पातळी घटली

सोलापूर : सोलापूर शहर परिसरातील भूजल पातळी प्रचंड प्रमाणात घसरली असून बोअरवेलकरिता खोदाई करताना तब्बल चारशे ते पाचशे फुटापर्यंत भूगर्भात जावे लागत आहे. सोलापूर शहरात जलपुनर्भरणाची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे भविष्यात ८०० ते हजार फुटापर्यंत जाण्याची वेळ सोलापूरकरांवर येणार आहे.

पिण्याच्या पाण्याकरिता उजनी धरणावर सोलापूर अवलंबून आहे. कधी पाच ते सहा तर कधी आठ दिवस सोलापूर शहराला पाणीपुरवठा होतोय. हद्दवाढ भागात अद्याप काही ठिकाणी पिण्याचे पाईपलाईन नाहीत. अशा भागात बोअरवेलच्या पाण्यावर नागरिक अवलंबून आहेत. शहराला पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे बहुतांश शहरी भागातील नागरिक बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असतात. उद्योग क्षेत्रात बोअरवेलच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेल्स आहेत. जुळे सोलापूर सारख्या भागात तब्बल तीनशे ते साडेतीनशे फुटापर्यंत पाणी लागतच नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी बोअरवेल्स निरुपयोगी ठरल्या आहेत.

 

  • शहराला होणारा पाणीपुरवठा- ५-६ दिवसाआड
  • शहरातील एकूण बोअरवेल्स-२५००
  • शहराची एकूण लोकसंख्या-१२ लाख

........

प्रति माणसी पाण्याची गरज-१०५-११० लिटर प्रतिदिन

कोणत्या भागात किती फुटापर्यंत पाणी लागते

  • जुळे सोलापूर-२००-२५०
  • रेल्वे लाईन-२७५-३२५
  • मजरेवाडी-१०० -२००
  • अशोक चौक-२५०-३००
  • नीलम नगर-२००-३००
  • नवी पेठ-२५०-३००
  • साखर पेठ-१००-१५०
  • भवानी पेठ-१००-२००
  • सुनील नगर-२००-२५०
  • एमआयडीसी एरिया-२००-३००

 

परवानगी कोणीच घेत नाही

बोअरवेल्स मारताना शासकीय नियमांचे पालन होत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांचे आहे. या संबंधित आतापर्यंत प्रशासकीय पातळीवर जनजागृती नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचेही याकडे लक्ष नसते. त्यामुळे खासगी बोअरवेल्सवाले बिनधास्त पाचशे ते सहाशे फुटापर्यंत पाणी उपसा करतात. भूजल पातळी कमी होण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

 

सार्वजनिक बोअरवेल्स मारताना महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सार्वजनिक बोअर मारताना संबंधित ठेकेदार महानगरपालिकेची परवानगी घेतात. पण खासगी जागेत बोअरवेल्स मारताना कोणीच परवानगी घेत नाहीत. भूजल पातळी कमी होत असल्यामुळे कमीत कमी शंभर तर जास्तीत जास्त सहाशे-सातशे फुटापर्यंत पाणी उपसा होतोय. इलेक्ट्रॉनिक पंपाचाही मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे भूजल पातळीत घट होत आहे.

- व्यंकटेश चौबे, सहायक अभियंता

पाणीपुरवठा विभाग, महानगरपालिका सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकwater shortageपाणीकपात