शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात पाण्यासाठी ५०० फुटांपर्यंत खोदाई; बोअरवेल्सच्या संख्येमुळे भेंगाळते भूई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 12:24 IST

कोणाची नाही नियंत्रण?,शहराची भूजल पातळी घटली

सोलापूर : सोलापूर शहर परिसरातील भूजल पातळी प्रचंड प्रमाणात घसरली असून बोअरवेलकरिता खोदाई करताना तब्बल चारशे ते पाचशे फुटापर्यंत भूगर्भात जावे लागत आहे. सोलापूर शहरात जलपुनर्भरणाची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे भविष्यात ८०० ते हजार फुटापर्यंत जाण्याची वेळ सोलापूरकरांवर येणार आहे.

पिण्याच्या पाण्याकरिता उजनी धरणावर सोलापूर अवलंबून आहे. कधी पाच ते सहा तर कधी आठ दिवस सोलापूर शहराला पाणीपुरवठा होतोय. हद्दवाढ भागात अद्याप काही ठिकाणी पिण्याचे पाईपलाईन नाहीत. अशा भागात बोअरवेलच्या पाण्यावर नागरिक अवलंबून आहेत. शहराला पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे बहुतांश शहरी भागातील नागरिक बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असतात. उद्योग क्षेत्रात बोअरवेलच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेल्स आहेत. जुळे सोलापूर सारख्या भागात तब्बल तीनशे ते साडेतीनशे फुटापर्यंत पाणी लागतच नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी बोअरवेल्स निरुपयोगी ठरल्या आहेत.

 

  • शहराला होणारा पाणीपुरवठा- ५-६ दिवसाआड
  • शहरातील एकूण बोअरवेल्स-२५००
  • शहराची एकूण लोकसंख्या-१२ लाख

........

प्रति माणसी पाण्याची गरज-१०५-११० लिटर प्रतिदिन

कोणत्या भागात किती फुटापर्यंत पाणी लागते

  • जुळे सोलापूर-२००-२५०
  • रेल्वे लाईन-२७५-३२५
  • मजरेवाडी-१०० -२००
  • अशोक चौक-२५०-३००
  • नीलम नगर-२००-३००
  • नवी पेठ-२५०-३००
  • साखर पेठ-१००-१५०
  • भवानी पेठ-१००-२००
  • सुनील नगर-२००-२५०
  • एमआयडीसी एरिया-२००-३००

 

परवानगी कोणीच घेत नाही

बोअरवेल्स मारताना शासकीय नियमांचे पालन होत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांचे आहे. या संबंधित आतापर्यंत प्रशासकीय पातळीवर जनजागृती नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचेही याकडे लक्ष नसते. त्यामुळे खासगी बोअरवेल्सवाले बिनधास्त पाचशे ते सहाशे फुटापर्यंत पाणी उपसा करतात. भूजल पातळी कमी होण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

 

सार्वजनिक बोअरवेल्स मारताना महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सार्वजनिक बोअर मारताना संबंधित ठेकेदार महानगरपालिकेची परवानगी घेतात. पण खासगी जागेत बोअरवेल्स मारताना कोणीच परवानगी घेत नाहीत. भूजल पातळी कमी होत असल्यामुळे कमीत कमी शंभर तर जास्तीत जास्त सहाशे-सातशे फुटापर्यंत पाणी उपसा होतोय. इलेक्ट्रॉनिक पंपाचाही मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे भूजल पातळीत घट होत आहे.

- व्यंकटेश चौबे, सहायक अभियंता

पाणीपुरवठा विभाग, महानगरपालिका सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकwater shortageपाणीकपात