शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

सोलापुरात पाण्यासाठी ५०० फुटांपर्यंत खोदाई; बोअरवेल्सच्या संख्येमुळे भेंगाळते भूई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 12:24 IST

कोणाची नाही नियंत्रण?,शहराची भूजल पातळी घटली

सोलापूर : सोलापूर शहर परिसरातील भूजल पातळी प्रचंड प्रमाणात घसरली असून बोअरवेलकरिता खोदाई करताना तब्बल चारशे ते पाचशे फुटापर्यंत भूगर्भात जावे लागत आहे. सोलापूर शहरात जलपुनर्भरणाची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे भविष्यात ८०० ते हजार फुटापर्यंत जाण्याची वेळ सोलापूरकरांवर येणार आहे.

पिण्याच्या पाण्याकरिता उजनी धरणावर सोलापूर अवलंबून आहे. कधी पाच ते सहा तर कधी आठ दिवस सोलापूर शहराला पाणीपुरवठा होतोय. हद्दवाढ भागात अद्याप काही ठिकाणी पिण्याचे पाईपलाईन नाहीत. अशा भागात बोअरवेलच्या पाण्यावर नागरिक अवलंबून आहेत. शहराला पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे बहुतांश शहरी भागातील नागरिक बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असतात. उद्योग क्षेत्रात बोअरवेलच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेल्स आहेत. जुळे सोलापूर सारख्या भागात तब्बल तीनशे ते साडेतीनशे फुटापर्यंत पाणी लागतच नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी बोअरवेल्स निरुपयोगी ठरल्या आहेत.

 

  • शहराला होणारा पाणीपुरवठा- ५-६ दिवसाआड
  • शहरातील एकूण बोअरवेल्स-२५००
  • शहराची एकूण लोकसंख्या-१२ लाख

........

प्रति माणसी पाण्याची गरज-१०५-११० लिटर प्रतिदिन

कोणत्या भागात किती फुटापर्यंत पाणी लागते

  • जुळे सोलापूर-२००-२५०
  • रेल्वे लाईन-२७५-३२५
  • मजरेवाडी-१०० -२००
  • अशोक चौक-२५०-३००
  • नीलम नगर-२००-३००
  • नवी पेठ-२५०-३००
  • साखर पेठ-१००-१५०
  • भवानी पेठ-१००-२००
  • सुनील नगर-२००-२५०
  • एमआयडीसी एरिया-२००-३००

 

परवानगी कोणीच घेत नाही

बोअरवेल्स मारताना शासकीय नियमांचे पालन होत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांचे आहे. या संबंधित आतापर्यंत प्रशासकीय पातळीवर जनजागृती नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचेही याकडे लक्ष नसते. त्यामुळे खासगी बोअरवेल्सवाले बिनधास्त पाचशे ते सहाशे फुटापर्यंत पाणी उपसा करतात. भूजल पातळी कमी होण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

 

सार्वजनिक बोअरवेल्स मारताना महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सार्वजनिक बोअर मारताना संबंधित ठेकेदार महानगरपालिकेची परवानगी घेतात. पण खासगी जागेत बोअरवेल्स मारताना कोणीच परवानगी घेत नाहीत. भूजल पातळी कमी होत असल्यामुळे कमीत कमी शंभर तर जास्तीत जास्त सहाशे-सातशे फुटापर्यंत पाणी उपसा होतोय. इलेक्ट्रॉनिक पंपाचाही मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे भूजल पातळीत घट होत आहे.

- व्यंकटेश चौबे, सहायक अभियंता

पाणीपुरवठा विभाग, महानगरपालिका सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकwater shortageपाणीकपात