शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

सोलापुरात पाण्यासाठी ५०० फुटांपर्यंत खोदाई; बोअरवेल्सच्या संख्येमुळे भेंगाळते भूई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 12:24 IST

कोणाची नाही नियंत्रण?,शहराची भूजल पातळी घटली

सोलापूर : सोलापूर शहर परिसरातील भूजल पातळी प्रचंड प्रमाणात घसरली असून बोअरवेलकरिता खोदाई करताना तब्बल चारशे ते पाचशे फुटापर्यंत भूगर्भात जावे लागत आहे. सोलापूर शहरात जलपुनर्भरणाची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे भविष्यात ८०० ते हजार फुटापर्यंत जाण्याची वेळ सोलापूरकरांवर येणार आहे.

पिण्याच्या पाण्याकरिता उजनी धरणावर सोलापूर अवलंबून आहे. कधी पाच ते सहा तर कधी आठ दिवस सोलापूर शहराला पाणीपुरवठा होतोय. हद्दवाढ भागात अद्याप काही ठिकाणी पिण्याचे पाईपलाईन नाहीत. अशा भागात बोअरवेलच्या पाण्यावर नागरिक अवलंबून आहेत. शहराला पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे बहुतांश शहरी भागातील नागरिक बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असतात. उद्योग क्षेत्रात बोअरवेलच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेल्स आहेत. जुळे सोलापूर सारख्या भागात तब्बल तीनशे ते साडेतीनशे फुटापर्यंत पाणी लागतच नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी बोअरवेल्स निरुपयोगी ठरल्या आहेत.

 

  • शहराला होणारा पाणीपुरवठा- ५-६ दिवसाआड
  • शहरातील एकूण बोअरवेल्स-२५००
  • शहराची एकूण लोकसंख्या-१२ लाख

........

प्रति माणसी पाण्याची गरज-१०५-११० लिटर प्रतिदिन

कोणत्या भागात किती फुटापर्यंत पाणी लागते

  • जुळे सोलापूर-२००-२५०
  • रेल्वे लाईन-२७५-३२५
  • मजरेवाडी-१०० -२००
  • अशोक चौक-२५०-३००
  • नीलम नगर-२००-३००
  • नवी पेठ-२५०-३००
  • साखर पेठ-१००-१५०
  • भवानी पेठ-१००-२००
  • सुनील नगर-२००-२५०
  • एमआयडीसी एरिया-२००-३००

 

परवानगी कोणीच घेत नाही

बोअरवेल्स मारताना शासकीय नियमांचे पालन होत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांचे आहे. या संबंधित आतापर्यंत प्रशासकीय पातळीवर जनजागृती नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचेही याकडे लक्ष नसते. त्यामुळे खासगी बोअरवेल्सवाले बिनधास्त पाचशे ते सहाशे फुटापर्यंत पाणी उपसा करतात. भूजल पातळी कमी होण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

 

सार्वजनिक बोअरवेल्स मारताना महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सार्वजनिक बोअर मारताना संबंधित ठेकेदार महानगरपालिकेची परवानगी घेतात. पण खासगी जागेत बोअरवेल्स मारताना कोणीच परवानगी घेत नाहीत. भूजल पातळी कमी होत असल्यामुळे कमीत कमी शंभर तर जास्तीत जास्त सहाशे-सातशे फुटापर्यंत पाणी उपसा होतोय. इलेक्ट्रॉनिक पंपाचाही मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे भूजल पातळीत घट होत आहे.

- व्यंकटेश चौबे, सहायक अभियंता

पाणीपुरवठा विभाग, महानगरपालिका सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकwater shortageपाणीकपात