शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Solapur | सोलापुरात शनिवारी हरणं मेली, रविवारी दिसला रानगवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 14:57 IST

वन विभागाकडून दुजोरा, वावर शोधण्यासाठी पथकांकडून पेट्रोलिंग

विलास जळकोटकर, सोलापूर: सोलापुरातील देशमुख-पाटील वस्ती परिसरातील सोलापूर-विजापूर पुलावरून शनिवारी तब्बल १५ हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बलदंड शरीराचा रानगवा आढळून आला. कुत्र्यांच्या पाठलागापासून तो सैरावरा पळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वन विभागाने भेट देऊन तो रानगवा असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, त्याचा वावर कुठे आहे हे शोधण्यासाठी वन विभागाकडून पेट्रोलिंग सुरू असल्याचे उपवनसंरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील यांनी सांगितले.

केगावजवळील देशमुख-पाटील वस्ती परिसरात सकाळी साडेसातच्या सुमारास म्हशीसारखा दिसणारा बलदंड शरीराचा रानगवा दिसल्याने कुत्र्यांनी या विचित्र प्राण्याचा पाठलाग सुरू केला. या आरडाओरड्याने वस्ती परिसरातील दत्ता गवळी आणि आबा घोरपडे यांनी पाहिले. त्यांनी लागलीच वाइल्ड लाइफ कॉन्झर्व्हेशन असोसिएशनच्या सदस्यांना खबर दिली. लागलीच टीमचे सदस्य सुरेश क्षीरसागर यांनी धाव घेतली. याबद्दल वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांना खबर दिली. वन विभागाचे पथकही तेथे हजर झाले. पथकाच्या निरीक्षणानंतर तो रानगवा असल्याचे सांगण्यात आले. आजूबाजूच्या परिसरातील नागिरकांना पथकाकडून सावध राहून दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

वन विभागाकडून खबरदारीच्या सूचना पाण्याचा फवारा मारणे, तसेच प्राण्याला रोखण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये अग्निशमन दलाची महत्त्वाची भूमिका असते. या विभागांमधील समन्वयातून प्राण्याला परत सुरक्षितपणे जंगलात पाठवता येऊ शकतं. सर्वसामान्य माणसांनी अशा परिस्थितीत घरी राहावं. गव्याची घाणेंद्रियं तीक्ष्ण असतात. त्यामुळे त्याला वास तीव्रतेने कळतो. गवे सहसा माणसांवर हल्ले चढवत नाहीत. मात्र, नागरिकांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्याचे वन विभागाच्या पथकांकडून सांगण्यात आले.

पश्चिम घाटात आढळतात रानगवे

पश्चिम घाट परिसरात रानगवे सर्रास आढळतात. एका रानगव्याचं वजन साधारण ७०० ते १००० किलो असू शकतं. आकारमान मोठं असलं तरी हा प्राणी लाजाळू असतो. रानगवा प्राणी मानवी वस्तीत येतात तेव्हा गोंधळून जातात. गर्दी न करता त्यांना मोकळीक दिली तर वन विभाग योग्य ती कार्यवाही करून संबंधित प्राण्याला त्याच्या अधिवासाच्या ठिकाणी किंवा जवळच्या जंगलात सोडून देतो. पश्चिम घाटात रानगवे आढळतात .

टॅग्स :Solapurसोलापूर