शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

राष्ट्रीय अन् खासगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे सरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 5:03 PM

खरीप हंगाम ; जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शंभर टक्के वाटप

सोलापूर: खरीप पीक कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर आहे. राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता घेतल्याने कर्ज वाटपाची आकडेवारी पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे.

सोलापूर जिल्हा तसा रब्बी असला तरी खरीप हंगामातही पीक कर्जाची मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून मागणी असते. यामुळे खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वरचेवर वाढत आहे. मात्र घेतलेले कर्ज भरण्यासाठी शेतकरी अनुत्सुक असल्याने बँकांही कर्ज वाटपाबाबत गंभीर नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने मात्र खरिपाचे उद्दिष्ट पूर्ण करुन आघाडी घेतली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने मागील आठवड्यापर्यंत १८ हजार ४० शेतकऱ्यांना १३२ कोटी ९० रुपये इतके कर्ज वाटप केले आहे. या बँकेला ९ हजार ९९९ शेतकऱ्यांना १३१ कोटी ७३ लाख ४७ हजार रुपये इतके कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी कर्ज वाटपाची सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.

राष्ट्रीय बँकांचे कर्ज वाटप मात्र अतिशय सावकाश सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेनंतर सर्वाधिक ५६ शाखा असलेल्या बँक ऑफ इंडियाने ६ हजार ३५४ शेतकऱ्यांना ८० कोटी ९८ लाख रुपये पीक कर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या अवघे २९.२१ टक्के कर्ज बँक ऑफ इंडियाने दिले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने दोन हजार ५३५ शेतकऱ्यांना ५४ कोटी ९० लाख रुपये म्हणजे २६.७२ टक्के कर्ज वाटप केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने दोन हजार ४०९ शेतकऱ्यांना ४९ कोटी ६१ लाख, आयसीआयसीआय बँक २९ कोटी, बँक ऑफ बडोदा २७ कोटी, कॅनरा बँक २० कोटी, एचडीएफसी बँक १९ कोटी तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने १४ कोटी इतके कर्ज शेतकऱ्यांना दिले आहे.

राष्ट्रीय, खासगी व सहकारी बँकांना खरीप हंगामासाठी

  • एक लाख २० हजार २७९ शेतकऱ्यांना १२७० कोटी ४२ लाख ६१ हजार रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. बँकांनी अडीच महिन्यात ३३ हजार १०२ शेतकऱ्यांना ४४५ कोटी ४६ लाख रुपये इतकी रक्कम वाटप केली आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या २७.५२ टक्के खातेदारांना ३५.६ टक्के रक्कम वाटप केली आहे.
  • जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील २७५ शेतकऱ्यांनी थेट कर्ज योजनेसाठी प्रस्ताव दिले आहेत. यापैकी मंगळवेढा व सांगोला तालुके वगळता इतर तालुक्यातील ४९ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. तांत्रिक बाबी पूर्ण करुन १३ शेतकऱ्यांना २२ लाख रुपये कर्ज दिले आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रagricultureशेतीFarmerशेतकरी