शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

त्या अत्यवस्थ महिलेचा अखेर मृत्यू, पोलीस दत्ता देसार्इंच्या प्रयत्नांना अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 3:39 PM

येथील महिलेने येथील मोती तलावात आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तेथेच वाहतुकीची व्यवस्था सांभाळणारे वाहतूक पोलीस दत्ता देसाई यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वत: तलावात उडी मारून त्या महिलेला तलावातून बाहेर काढले आणि तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. तिला अत्यवस्थ स्थितीत गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले. मात्र, सायंकाळी तिचे निधन झाले.

ठळक मुद्देत्या अत्यवस्थ महिलेचा अखेर मृत्यू, पोलीस दत्ता देसार्इंच्या प्रयत्नांना अपयशमोती तलावात उडी मारून आत्महत्या

सावंतवाडी : खाकी वर्दी म्हटली की समाजात सर्वत्र तिरस्कार केला जातो. पण खाकी वर्दीतील सर्वच माणसे वाईट नसतात. त्यांच्यात माणुसकीचा झरा असतोच. असेच काहीसे चित्र सावंतवाडीत पहायला मिळाले. शनिवारी ज्युस्तीनगर येथील महिलेने येथील मोती तलावात आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तेथेच वाहतुकीची व्यवस्था सांभाळणारे वाहतूक पोलीस दत्ता देसाई यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वत: तलावात उडी मारून त्या महिलेला तलावातून बाहेर काढले आणि तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. तिला अत्यवस्थ स्थितीत गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले. मात्र, सायंकाळी तिचे निधन झाले.सावंतवाडीतील मोती तलावात शनिवारी जिजा तुकाराम ब्राम्हणेकर (रा. ज्युस्तीनगर, सावंतवाडी) या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सर्वांसमोरच या महिलेने तलावात उडी मारली. हे अनेकांनी पाहिले. त्यानंतर आरडाओरड झाली. सध्या संचारबंदी असल्याने सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मोती तलावाच्या काठी वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी असतात.एका महिलेने तलावात उडी मारली याची माहिती वाहतूक पोलीस दत्ता देसाई यांना कळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट मोती तलावात उडी मारली. महिला पाण्यात आत जाणार असे वाटत असतानाच देसाई यांनी त्या महिलेला पाण्याच्या वर आणले.नंतर तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनीही त्या महिलेला आधार देत वर घेतले. ती महिला बेशुध्द होती. तिला तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.तेथे तिच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले पण ती बेशुध्द असल्याने तसेच तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते. मात्र, सायंकाळी या महिलेचे निधन झाल्यामुळे सर्वांनीच केलेले प्रयत्न शेवटी अपयशी ठरले.खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन मोती तलावाच्या काठावर देसार्इंसारखे पोलीस नसते तर त्या महिलेला आपला जीव गमवावा लागला असता. पाच वर्षांपूर्वीही दत्ता देसाई हे सावंतवाडीत कार्यरत होते.त्यावेळी देसाई यांनी तलावात पडणाऱ्या तसेच पडलेल्या अनेकांना वाचविले आहे. सावंतवाडीची वाहतूक व्यवस्था म्हणजे देसाई असे एक समीकरण झाले होते. देसाई यांची बदली झाली तर त्यांना पुन्हा सावंतवाडीत आणा, अशी अनेकांनी मागणी ही केली होती.मात्र, पाच वर्षांनी देसाई हे पुन्हा सावंतवाडीत आले आहे. आणि वाहतूक पोलीस असताना शनिवारी एका महिलेचा पुन्हा एकदा प्राण वाचविण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही.त्यामुळे खाकी वर्दीतील माणुसकी पुन्हा एकदा समाजासमोर आल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस