शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारासाठी सेना, भाजपाकडे मुद्दाच नाही

By admin | Updated: October 12, 2014 01:00 IST

सतीश सावंत : विरोधकांकडून केवळ राणेंवर वैयक्तिक टीका

कणकवली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना तसेच भाजपाकडे कोणताही महत्वाचा मुद्दा नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नसलेल्या दहशतवादाचा मुद्दा वैभव नाईक पुढे आणत आहेत. ही जनतेची फसवणूक असून त्याला कोणीही भुलणार नाही, अशी टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केली.येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदानकेंद्र नाही. त्यामुळे विरोधकांकडून दहशतवादाच्या मुद्याचा करण्यात येणारा बाऊ निरर्थक आहे. कुडाळ मतदारसंघाचा आपण कोणत्या पद्धतीने विकास करणार याबाबत वैभव नाईक काहीच बोलत नाहीत. शिवसेनेने व्हिजन नसलेला उमेदवार उभा केला आहे. कणकवली नगरपंचायतीच्या सभागृहात जांभई देण्यापलिकडे नाईक यांनी कोणत्याही मुद्यासाठी तोंड उघडलेले नाही. नारायण राणेंवर खोटे आरोप करणे, टीका करणे एवढेच त्यांचे काम आहे. १९९५ पासून नाईक कुटुंबियांकडून नारायण राणे यांनी जमिनी लाटल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, त्यांनी हे पुराव्यानिशी सिद्ध करावे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मोदींमुळेच मते मिळाली होती. तर सन २००९ मध्ये कुडाळ-मालवण मतदारसंघातून ४७ हजार मते मिळवूनही शिवसेनेने या मतदारसंघात साधा एक रस्ताही केलेला नाही. खासदार होऊन चार महिने उलटले तरीही विनायक राऊत यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे. त्याचा फायदा नारायण राणे यांना होणार असून त्यांचे मताधिक्य वाढणार आहे. कणकवली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून नीतेश राणे यांनी जनतेशी संपर्क साधून विश्वासार्हता निर्माण केली आहे. तर याउलट आमदार प्रमोद जठार यांनी निवडून आल्यानंतर कोणतीही विकासकामे केलेली नाहीत. तसेच त्यांनी जनतेशी संपर्कही ठेवलेला नसल्याचे मतदारांच्या भेटीच्यावेळी निदर्शनास येत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींची सभा घेऊनही काँग्रेसच्या मताधिक्यावर काहीही परिणाम होणार नाही. सुरक्षा यंत्रणेकडून कासार्डे येथील सर्वसामान्यांना वेठीस धरले जात आहे. भाजपाकडून या सभेसाठी एस. टी. बुक करण्यात आल्या आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असून एस. टी. अभावी त्यांची गैरसोय झाली तर त्याबाबत एस. टी. च्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल. सावंतवाडी मतदारसंघातून बाळा गावडेंसह जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात काँग्रेसला निश्चितच विजय मिळेल, असेही सावंत यांनी सांगितले. (वार्ताहर)