शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चोऱ्या नाहीत, अफवाच

By admin | Updated: October 2, 2015 23:19 IST

तुषार पाटील : अनुचित प्रकार नाही; सोशल मीडियामुळे अफवा

रत्नागिरी : जिल्ह्यात विशेषत: रत्नागिरी आणि लांजात चोरट्यांची टोळी आली असल्याच्या आणि त्यांनी विविध ठिकाणी लोकांवर हल्ला केल्याच्या घटना या केवळ अफवाच आहेत. सोशल मीडियामुळे या अफवा नको इतक्या पसरल्या आहेत, अशा शब्दांत रत्नागिरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी या घटनांचा इन्कार केला. हाफ पँटवाले, घोंगडीवाले परराज्यातील चोरट्यांचे टोळके जिल्ह्यात दाखल झाले आहे. हे टोळके दिवसभर जंगली भागात लपून राहते आणि रात्री गावात घुसतात. घरांवर दगडफेक करतात, दरवाजे ठोठावतात, लोकांना मारहाण करतात, अशा प्रकारची वृत्ते गेली तीन-चार दिवस रत्नागिरी आणि लांजातून चर्चिली जात आहेत. या साऱ्या प्रकारांबाबत पाटील यांनी इन्कार केला. रत्नागिरी किंवा लांजा येथे ज्या काही घटना घडल्याची चर्चा होत आहे किंवा मेसेज पसरत आहेत, त्या-त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी माहिती घेतली आहे. मात्र असा कोणताही प्रकार जिल्ह्यात कोठेही घडलेला नाही. या केवळ अफवाच आहेत आणि त्याला सोशल मीडियाच जबाबदार आहे, असे ते म्हणाले. नागरिकांनी नेहमीच सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. संशयास्पद वाटणाऱ्या लोकांबाबत पोलिसांना तत्काळ माहिती कळवायला हवी. पण सोशल मीडियावरून जे संदेश पाठवले जात आहेत, त्यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) गस्तीमध्ये वाढ लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पोलिसांनी रत्नागिरी आणि लांजा भागात गस्त वाढवली आहे. मात्र, अजूनही कोणतीही बाब संशयास्पद आढळलेली नाही. चोरट्यांच्या टोळीला पाहिलेला एकही माणूस सापडलेला नाही. या सर्व अफवाच आहेत, याचा पुनरूच्चार पाटील यांनी केला.