शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी वीजवाहिन्यांचे प्रस्ताव रखडल

By admin | Updated: December 29, 2014 00:01 IST

चिपळूण शहर : लाल फितीतील कारभाराबद्दल नागरिकांचा संताप; अरूंद रस्ते वाहतुकीला अडथळे

चिपळूण : शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या बाजूला वीजखांब उभे आहेत. अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. यानुषंगाने भुयारी वीजवाहिनीचा प्रस्ताव चिपळूण महावितरण कंपनीकडे पाठवण्यात आला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत अद्याप कोणतीच हालचाल केल्याचे चित्र पाहावयास मिळत नसल्याने हा प्रस्ताव अद्याप लालफितीत अडकला आहे. शहरातील रामतीर्थ स्मशानभूमी येथे गेल्या २ वर्षांपूर्वी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका गाडीवर वीज वाहिनी तुटून पडल्याने मोठे नुकसान झाले होते. पुणे, मुंबईसारख्या धर्तीवर भुयारी वीज वाहिनीबाबतचा प्रस्ताव काँग्रेस शिष्टमंडळातर्फे उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांच्या नेतृत्त्वाखाली महावितरण कंपनीकडे पाठविण्यात आला होता. शहरातील मुख्य रस्त्यांवर होणारी वाहनांची वर्दळ यामुळे अपघात होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. शहर व परिसरातील रस्त्यावरील वीज खांबांवरील दिव्यांची देखभाल व दुरुस्ती नगर परिषद प्रशासनातर्फे केली जात आहे. यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांचे सहकार्यही घेतले जात आहे. वादळी वाऱ्यामुळे वीज वाहिनी कोसळून अपघात होण्याचीही शक्यता असल्याने यावर पर्याय म्हणून भुयारी वीज वाहिनीचा प्रस्ताव पुढे आला. याअनुषंगाने या प्रस्तावावर महावितरण कंपनीकडून योग्य ती उपाययोजना व्हावी, अशी अपेक्षा काँग्रेस शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे.शहरातील मुख्य ठिकाणी भुयारी वीज वाहिनी झाल्यास वीजखांबांचा अडथळाही वाहतुकीला निर्माण होणार नाही. याबाबत महावितरण कंपनीने सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. मात्र, प्रस्तावाबाबत संबंधित विभाग अद्यापही अनभिज्ञ असल्याने पावसाळ्याच्या दिवसात झाडांच्या फांद्या पडून वीज वाहिनी तुटण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी भुयारी वीज वाहिनी जोडणीच्या प्रस्तावाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच उपाययोजना करावी, अशी अपेक्षा शहरवासियांतून केली जात आहे. पावसात अनेकवेळा वीज वाहिनी रस्त्यावर पडून गंभीर प्रसंगाला तोंड द्यावे लागते. हा प्रकार आता टळणार आहे. (वार्ताहर)महावितरणचा उपक्रम चिपळूण शहरात भुयारी गटार योजनेची चर्चा सुरू असतानाच आता शहरातील मुख्य ठिकाणी भुयारी वीज वाहिनी झाल्यास वीज खांबांचा अडथळा वाहतुकीला निर्माण होणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे. असे झाल्यास महावितरणसाठी तो वेगळा उपक्रम असू शकेल, असे सांगण्यात येत आहे.