शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

कणकवलीत १७ ऑगस्टपासुन गणेशोत्सवासाठी खास नियोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 8:45 PM

कणकवली: गणेशोत्सवाला २२ ऑगस्ट पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने कणकवली शहरात विविध साहित्य खरेदीसाठी व इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणात ...

ठळक मुद्देपार्कींगबरोबरच भाजीपाला,फळे विक्रीची व्यवस्था;नियम तोडणार्‍यांवर करणार कारवाई :समीर नलावडे यांची माहिती

कणकवली: गणेशोत्सवाला २२ ऑगस्ट पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने कणकवली शहरात विविध साहित्य खरेदीसाठी व इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

या अनुषंगाने नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून कणकवली शहरात १७ ऑगस्ट पासून पार्कींग व्यवस्था, भाजीपाला विक्री, फळेविक्री, एकदिशामार्ग अमलबजावणी यांचे नियोजन करण्यात आले असून नगगरपंचायतीने ठरवुन दिलेल्या जागेतच व्यवसाय करण्याचे बंधन विक्रेत्यांवर घालण्यात आले आहे.

कणकवलीतयेणार्‍यांची कोणतीही गैरसोय होवू नये. त्याना सहजरित्या गर्दीविना साहित्य खरेदी करता यावे. या उद्देशाने नियोजन केले असल्याची माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठकीचे आयोजन बुधवारी कऱण्यात आले होते. यावेळी नगरसेवक बंडु हर्णे, मेघा गांगण, अभिजीत मुसळे, विराज भोसले यांच्यासह महेश सावंत, बंडु गांगण, मिथुन ठाणेकर आदी उपस्थित होते.त्या बैठकीनंतर सर्वानुमते झालेल्या निर्णयाची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यानी दिली.

ते म्हणाले, गणेशोत्सवानिमित्ताने शहरात पार्कींगची व्यवस्था करण्यात आली असून लक्झरी गाड्या व ट्रक , टेम्पोसाठी मराठा मंडळ रस्ता व नरडवे रोडवर व्यवस्था करण्यात आली आहे. धान्याचा ट्रक बाजारात आणण्यास परवानगी देण्यात येईल. त्याचप्रमाणे चारचाकी गाड्यांच्या पार्कींगची व्यवस्था हॉटेल हॉर्नबील समोर त्याचप्रमाणे एस.टी.स्टँन्डसमोरील पुलाखाली करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजी,फळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरुन व्यवस्था करण्यात आली आहे.

यामध्ये अप्पासाहेब पटवर्धन चौक ते एस.टी.स्टँन्डपर्यंत पुलाखाली दोन बाजूने बसण्यास परवानगी देण्यात आली आहे . त्याचप्रमाणे गावठी बाजार हा अप्पासाहेब पटवर्धन चौक ते अभ्युदय बँक पुलाखाली पिलरच्या बाजुने भरविला जाणार आहे.

त्याचप्रमाणे फिरते व्यावसायिक, फळविक्रेते याना बाजारपेठ व डिपीरोडवर बसण्यास परवानगी दिली जाणार नाही. तेलीआळी रोडवर ते व्यवसाय करु शकतील.कणकवली आचरा रोडवर होणारी वाहतुक कोंडी व अप्पासाहेब पटवर्धन चौकात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता असल्याने आचरा रोडवरुन येणारी वाहने जर नांदगाव, तळेरे येथे जाणार असतील तर त्याना मसुरकर किनई रस्त्याने वळविण्यासाठी तेथे पोलिस ठेवण्यात येतील. असे समीर नलावडे म्हणाले.

त्याचप्रमाणे कणकवलीत व्यापारासाठी महामार्गाच्या बाजूने रेषा आखली जाणार असून त्याच्या बाहेर बसणार्‍यांवर नगरपंचायत पथकाच्या माध्यमातुन कारवाई केली जाईल असेही समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.

तसेच नियोजनात काही बदल झाल्यास नगरपंचायतीच्यावतीने नागरिकांना वेळोवेळी त्याबाबत सूचना देण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. असेही ते यावेळी म्हणाले.

अफवांवरविश्वासठेवूनका !

कणकवली बाजारपेठ सात ऑगस्टनंतर बंद ठेवणार असल्याची अफवा काही लोक पसरवित आहेत. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये . कणकवलीत काही ठिकाणी असलेले कंटेन्मेंट झोन हे दोनचार दिवसात उठतील. त्यानंतर संपुर्ण बाजारपेठ सुरु राहणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन समीर नलावडे यानी यावेळी केले.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग