शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट नुकसान भरपाई मिळावी, साळगावातील शेतकऱ्यांची आशिष शेलारांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 13:31 IST

अवकाळी पाऊस आणि झालेल्या वादळामुळे भातशेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे

ठळक मुद्देअवकाळी पाऊस आणि झालेल्या वादळामुळे भातशेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी साळगाव येथील शेतकऱ्यांनी आशिष शेलार यांच्याजवळ केली. क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात पडलेल्या संततधार पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

कुडाळ - अवकाळी पाऊस आणि झालेल्या वादळामुळे भातशेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी साळगाव येथील शेतकऱ्यांनी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याजवळ केली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आशिष शेलार यांनी कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल असे त्यानी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार नितेश राणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात पडलेल्या संततधार पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपाच्या कोकणातील शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार नुकसानीच्या पाहणीसाठी दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याची सुरुवात त्यांनी कुडाळ येथून केली. त्यानंतर सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, देवगड, कणकवली असा दौरा ते करणार आहेत.

‘क्यार’ वादळाचा याआधी काही दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. किनारपट्टी भागात दर्याला उधाण आल्याने किनारपट्टीलगतच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं. तसेच पावसामुळे भातशेतीचे मोठं नुकसान झालं आहे. तर किनारपट्टी भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी लगतच्या वस्तीत गेल्याने त्याठिकाणचे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली होते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तळकोकणात दोडामार्ग, वेंगुर्ले, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, कणकवलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. किनारपट्टीच्या भागात समुद्राच्या उधाणाचा फटका आचरा पिरावाडी, जामडूल बेटाला देखील बसला. खाडी किनारपट्टी लगतच्या घरांमध्ये शिरल्याने घरातील अन्न धान्यासहीत इलेक्ट्रॉनिक वस्तू भिजून गेल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतही पाणी शिरल्याने पिण्याचे पाणी देखील दूषित झालंय, तर काही मच्छिमारांच्या जाळीचेही नुकसान झाले. 

मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पसरली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने तातडीने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याची मागणी जिल्ह्यातील ग्रामस्थांतून होत आहे. सिंधुदुर्गातील प्रमुख पीक म्हणून भातशेती केली जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो एकर क्षेत्रावर ही भातशेती केली जाते. अनेक शेतकरी या भातशेतीवर अवलंबून आहेत. आता भातशेती जवळपास पूर्ण परिपक्व असून त्याची कापणी होणे गरजेचे असतानाच गेले काही दिवस मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात 10 टक्केही भातकापणी झालेली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसAshish Shelarआशीष शेलारNitesh Raneनीतेश राणे Farmerशेतकरी