शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वन क्षेत्रात रत्नागिरीचा दुसरा क्रमांक

By admin | Updated: July 22, 2014 23:58 IST

पेटंट कायम : स्थानिकांना लाभ मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न

सुभाष कदम -चिपळूणजंगले वाढावीत, त्यांचे संवर्धन व्हावे, जंगलातील लहान लहान जीव सुखाने नांदावेत, जंगलातील पेटंट कायम राहून त्याचा लाभ स्थानिकांना मिळावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. राज्यात गडचिरोलीनंतर वनक्षेत्राच्या बाबतीत रत्नागिरीचा दुसरा क्रमांक लागतो. रत्नागिरी जिल्ह्यात ५२ टक्के वनक्षेत्र आहे. खेड तालुक्यात २५९४ हेक्टर, तर संगमेश्वरमध्ये २६७ हेक्टर वनक्षेत्र आहे. सर्वांत जास्त वनक्षेत्र खेडमध्ये, तर सर्वांत कमी वनक्षेत्र संगमेश्वरमध्ये आहे. येथे वन वाढवून त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होतात. दरवर्षी लाखो नवीन झाडे लावली जातात. शासनस्तरावर जंगले वाचवण्यासाठी वनसंवर्धन अधिनियम १९८० तयार झाला आहे. याअंतर्गत जंगल कसे असावे, याबाबत मार्गदर्शक तत्त्व आहे. वृक्षतोड अधिनियम १९६४ अंतर्गत वृक्षतोडीस परवानगी देणे व दंड आकारणे आदी गोष्टी येतात. या अधिनियमात १९८९मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. भारतीय वन अधिनियम १९२७नुसार तोडलेला माल वाहतुकीस परवानगी देता येते. १९६६चा जमीन महसूल अधिनियम महसूल विभागाकडे येतो. बिगर मनाई झाडांची तोड झाल्यास या अधिनियमाद्वारे कारवाई केली जाते. जैविक विविधता संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने २००८ मध्ये कायदा केला आहे.या अधिनियमानुसार जंगल संवर्धनाचा हक्क स्थानिकांना मिळतो. नैसर्गिक साधनसंपत्तीची नोंद आता ग्रामस्तरावर ठेवली जाणार आहे. ५\४रत्नागिरी जिल्ह्यात ५२ टक्के वनक्षेत्र. ४ दरवर्षी लाखो झाडांची होते लागवड. ४वन वणव्याचा कोकणाला शाप.४ फासकीचे प्रमाण घटल्याने वन्य प्राण्यांना दिलासा. ४ जैविक विविधता कायद्यामुळे वनसंरक्षणाला मिळणार गती. ४ ग्रामपातळीवर वनसंवर्धनासाठी होणार समिती स्थापन. ४ गावागावात लोकजैविक नोंदवही तयार होणार. ४ वनसंवर्धन अधिनियमाचे होतेय काटेकार पालन. कोकणात वणव्याचे प्रमाण मोठे आहे. गवत जाळल्यानंतर किंवा जमिनीची मशागत केल्यानंतर चांगले पीक येते, असा समज आहे. त्यासाठी जंगलाला दरवर्षी आग लावली जाते. त्यामुळे आंबा, काजू बागांबरोबरच दुर्मीळ जातीच्या औषधी वनस्पती आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. सरपटणारे प्राणी, मुंग्या व लहान प्राणी जळून खाक होतात. यामुळे जैविक विविधतेला धोका निर्माण झाला आहे. वणवामुक्त गाव अभियान राबवून ग्रामस्थांनी शासनाला सहकार्य करायला हवे. वनसंवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासाठी आता ग्रामस्थांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. - अमर साबळे,उपविभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण)