शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी नगरपालिकेतही राजकीय ‘घटस्फोटा’ची तयारी सुरु ?

By admin | Updated: November 11, 2014 22:20 IST

प्रथमच राष्ट्रवादीने व्हीप बजावून भाजपला शहर विकासासाठी साथ देण्याचे ठरवल्याने

रत्नागिरी : राज्यात सत्तारूढ झालेले भाजप सरकार आता कोणाच्या बळावर ‘विश्वास’ जिंकतं, हे जरी भविष्याच्या कप्प्यात बंद असलं तरी शिवसेनेला बाजूला सारून राष्ट्रवादीशी सलगी करण्याची भाजपची नवी खेळी ही रत्नागिरी पालिकेपर्यंत येऊन पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत प्रथमच राष्ट्रवादीने व्हीप बजावून भाजपला शहर विकासासाठी साथ देण्याचे ठरवल्याने राज्याची समीकरणेही अशीच असणार की काय? अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करत भाजपने शिवसेनेकडून नगराध्यक्षपद पदरात पाडून घेतले. निवडणूक मतदानाच्या काही दिवस अगोदर राज्यातील युतीचे धागे तुटले आणि विधानसभा निवडणूक भाजपने स्वबळावर लढवण्याचे ठरवले. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची पीछेहाट झाली असली तरी रत्नागिरी पालिकेत भाजपने नशिबाच्या वा खेळीच्या जोरावर असेल यश मिळवले आहे. नगराध्यक्षपद शिवसेनेकडून गोड बोलून काढून घेणाऱ्या भाजपविरोधात आता अविश्वास ठराव मांडणेही शिवसेनेला तेवढे सोपे राहिलेले नाही. कोणत्याही नगराध्यक्षावर सहा महिन्यांशिवाय अविश्वास ठराव मांडता येत नाही. त्यामुळे शिवसेनेची गोची झाली आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी खेळलेल्या खेळीमुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपने उपनगराध्यक्ष निवडणुकीतही शिवसेनेला पदापासून दूर ठेवण्याचे कारस्थान केले खरे; मात्र काही दिवसांपूर्वीच सेनागृही परतलेल्या माजी राज्यमंत्री उदय सामंत यांच्या पालिकेतील समर्थकांनी शिवसेनेची लाज राखली. सामंत यांच्या चार समर्थकांनी राष्ट्रवादीची साथ सोडत वेगळा गट स्थापन केला आणि शिवसेनेला साथ दिली. वेगळा गट स्थापनेची ‘आयडिया’ या चार समर्थकांनी केली नसती, तर रत्नागिरी पालिकेत मंगळवारी भाजपचाच उपनगराध्यक्ष दिसला असता आणि सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेनेला दोन्ही पदांपासून लांब राहावे लागले असते. कारण उपनगराध्यक्षपद निवडणुकीत शहर विकासासाठी भाजपला साथ देण्याचा व्हीप राष्ट्रवादीने बजावला होता. हा व्हीप थोडा लवकर बजावला असता तरीही शिवसेनेची गोची झाली असती.या संपूर्ण प्रकरणात भाजपला राष्ट्रवादीने साथ द्यावी आणि तीही शहर विकासाच्या नावाखाली द्यावी, हे एक न उलगडणारे कोडे आहे. भाजप जवळ करो वा न करो. मात्र, राष्ट्रवादी भाजपच्या अगदी निकट जाऊ पाहातेय, हेच चित्र सध्या रत्नागिरीत पाहायला मिळत आहे. भाजप आपल्या जुन्या मित्राला विसरून नव्या पक्षाशी मैत्री करत आहे आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीने राज्यस्तरावर भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरच रत्नागिरीत या घडामोडी घडल्या आहेत. त्यामागे उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचा त्याग केल्याने शिवसेनेला पाठिंबा नाही, ही राष्ट्रवादीची भूमिका असू शकते. मात्र, त्याहीपेक्षा राज्यस्तरावर भाजप-राष्ट्रवादी संबंधांची किनार जास्त आहे, हेही तेवढेच निश्चित.विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भाजप प्रवक्ते बाळ माने यांनी यापुढे जिल्ह्यात भाजप शिवसेनेची साथ न घेता स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढेल, असे म्हटले होते, त्याचीच ही सुरूवात असू शकते. भाजपने पहिल्या खेळीत शिवसेनेला कोंडीत पकडले, तर दुसऱ्या खेळीत शिवसेनेने राष्ट्रवादीतील फुटीर गटाच्या मदतीने भाजपला धडा शिकवला. सामना बरोबरीत सुटलाय. पण, आगामी राजकारणात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता यापुढच्या प्रत्येक निवडणुकीत असेल. (प्रतिनिधी)