शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

‘योजना बंद’च्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: February 26, 2015 00:15 IST

हसोळमधील प्रकरण : गटविकास अधिकाऱ्यांची भेट--लोकमतचा दणका

राजापूर : तालुक्यातील हसोळ - लाडवाडी नळपाणी पुरवठा योजना आठ दिवस बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द करताच राजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी बुधवारी हसोळ ग्रामपंचायतीला भेट दिली असून, त्वरित खुलासा करण्याचे आदेश संबधितांना दिले आहेत. या वृत्ताची दखल घेत संबंधित ग्रामपंचायतीने आजपासूनच पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु केला आहे. शंभर टक्के पाणीपट्टी वसुली न झाल्याने तालुक्यातील हसोळ ग्रामपंचायतीने गेले आठ दिवस नळपाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. याबाबतचे सविस्तर वृत्त लोकमतने बुधवारच्या अंकात प्रसिध्द केले होते. ग्रामपंचायतीने आठ दिवस पाणी न दिल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. बुधवारी राजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी हसोळ ग्रामपंचायतीला भेट दिली व याबाबतची कारणे जाणून घेतली. काही ग्रामस्थ गेली पाच - सहा वर्षे पाणी पट्टीच भरत नव्हते. त्यामुळे लाईटबिल भरणे अवघड झाले होते. त्यानुसार तेथील सर्व ग्रामस्थांशी चर्चा करूनच ग्रामपंचायतीतर्फे हा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही योजना सार्वत्रिक असल्यामुळे कुणाचीही वैयक्तीक जोडणी बंद करता येत नव्हती. त्यामुळे सर्वानुमतेच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली आहे. मात्र, त्यांचा हा खुलासा आपण तत्काळ लेखी स्वरुपात मागवला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजपासून पुन्हा सुरळीतपणे पाणीपुरवठा सुरु करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक प्रदीप सावंत यानी लोकमतशी बोलताना दिली. (प्रतिनिधी)