शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आंबा हंगाम यावर्षी लांबणीवर पडणार, सिंधुदुर्गातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 10:48 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्यार वादळ व अवकाळी पावसाचा परिणाम पहिल्या टप्प्यात येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर झाला आहे. त्यामुळे यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे आंबा हंगाम यावर्षी लांबणीवर पडणार, सिंधुदुर्गातील स्थितीबागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण, क्यार वादळाचा फटका

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्यार वादळ व अवकाळी पावसाचा परिणाम पहिल्या टप्प्यात येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर झाला आहे. त्यामुळे यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.यावर्षी ह्यक्यारह्ण वादळाचा व अवकाळी पावसाचा फटका भातशेती व मच्छिमारी व्यवसायासह आंबा बागायतदारांना बसला. आॅक्टोबर ते नोव्हेंबर या पहिल्या टप्प्यात येणाºया मोहोरावर अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. या पहिल्या टप्प्यातील या मोहोरामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आंबा तयार होतो व बागायतदारांनाही चांगला दर मिळतो.मात्र, पावसाने बागायतदारांच्या आशेवर पाणी फेरले आहे. त्यामुळे बागायतदार चिंतातूर आहेत. या वातावरणामुळे आंबा कलमांना पालवी येण्याची शक्यता जास्त असून बागायतदारांना आंब्याला मोहोर येण्यासाठी डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या टप्प्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. मात्र, तेसुद्धा थंडीवर अवलंबून आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी म्हणावी तशी थंडी पडत नसल्याने बागायतदार चिंताग्रस्त आहेत.भातशेती नुकसानी, मच्छिमारांची नुकसानी याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. त्याच प्रकारे आंबा नुकसानीची पाहणी करून बागायतदारांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आता आंबा बागायतदारांमधून होत आहे.ज्या आशेवर आंबा बागायतदार होते तोच अवकाळी पावसाने पहिल्या टप्प्यातील मोहोर न आल्याने बागायतदारांची पुरती निराशा झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोहोर हा डिसेंबर-जानेवारी महिन्यात येतो. त्याचा आंबा एप्रिल-मे महिन्यात तयार होतो.हंगामाच्या शेवटी आंब्याचा दर गडगडत असल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसतो. तरीही दुसऱ्या टप्प्यातील मोहोराच्या प्रतीक्षेत बागायतदार आहे. मात्र, पडणाऱ्या थंडीवर सर्व अवलंबून आहे, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. त्यासाठी आता वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.आम्हांला वाली कोण ?आंबा बागायतदारांना बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. त्यामुळे त्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या नुकसानीतून सावरायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. आम्हांला कोणीच वाली नाही का? असा प्रश्न आंबा बागायतदारांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग