शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

पर्यावरणीय विनाशात भारताचा उच्चक्रम : असीम सरोदे, ती ओळख पुसण्याची वेळ आली आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 16:06 IST

पर्यावरणीय विनाशाच्या उंबरठ्यावर भारताचा जागतिक क्रमवारीत उच्चक्रम असणे ही लाजिरवाणी गोष्ट पुसून काढण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या माध्यमातून नवीन पर्यावरणीय साक्षरता आणली जात आहे. बेताल विकास प्रक्रिया व भवताली घडणारे राजकारण यांचा विचार करणे क्रमप्राप्त झाले असल्याचे मत मानवीहक्क विश्लेषक व पर्यावरण तज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले.

ठळक मुद्देवसुंधरा सायन्स सेंटरद्वारे ५२ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनती ओळख पुसण्याची वेळ आली आहे : असीम सरोदे रामदास कोकरे, भाऊ काटदरे, संजीव करपे उपस्थित

कुडाळ : पर्यावरणीय विनाशाच्या उंबरठ्यावर भारताचा जागतिक क्रमवारीत उच्चक्रम असणे ही लाजिरवाणी गोष्ट पुसून काढण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या माध्यमातून नवीन पर्यावरणीय साक्षरता आणली जात आहे. निसर्गाची मानवाने केलेली दुरवस्था अशा बिंदूवर पोहोचली आहे की आपली जगण्याची मूल्ये, धर्मपरंपरांचे उत्सव साजरे करण्याची पद्धत, बेताल विकास प्रक्रिया व भवताली घडणारे राजकारण यांचा विचार करणे क्रमप्राप्त झाले असल्याचे मत मानवीहक्क विश्लेषक व पर्यावरण तज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले.वसुंधरा सायन्स सेंटरद्वारे आयोजित ५२ व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात अ‍ॅड. सरोदे बोलत होते. उत्कृष्ट कचरा व्यवस्थापनाचे उदाहरण घालून देणारे रामदास कोकरे, कासव प्रजाती वाचविण्यासाठी कार्यरत असलेले भाऊ काटदरे, शाश्वत निर्वाहासाठी बांबूचा वापर करणारे संजीव करपे यावेळी उपस्थित होते.सध्याची विकासाची कल्पना चंगळवाद आणि भौतिकवाद यांना केंद्रस्थानी ठेवून आखली जाते असे दिसते. शाश्वतता समाविष्ट नसेल, तर दिखाऊपणावर भर देण्यात येतो. जलसंपत्तीचा विकास नद्यांच्या संरक्षणाशिवाय शक्य नाही. पर्यावरणावर होणाऱ्या आघातांचे मूल्यांकन न करता नियोजन करण्यात येणारे अपारदर्शक विकासाचे मॉडेल नेहमीच लोकविरोधी असते, असे सांगून अ‍ॅड. सरोदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत पुरोगामी व कृतिशील पर्यावरणवादी होते. पण आज त्यांचा विचार पायदळी तुडवून छत्रपतींचा पुतळा समुद्रात उभारणे पर्यावरणाचे कायमस्वरूपी भयंकर नुकसान करणारे आहे याची जाणीवही भावनांचे राजकारण करणाऱ्यांना उरलेली नाही.पर्यावरणीय विध्वंस, जैवविविधता, अनियंत्रित वाळू उपसा, पाण्याची तस्करी, वृक्षांच्या कत्तली, समुद्री जीवांची नासधूस, समुद्र किनाऱ्यांवर अतिक्रमण, डोंगरफोड, नद्यांमधील प्रदूषण अशा विविध न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण कायदा हे एक प्रभावी अस्त्र आता लोकांसाठी उपलब्ध आहे.

पर्यावरणाचे मूलभूत प्रश्न मांडण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करणारे भारत जगातील तिसरे राष्ट्र ठरले आहे. ज्यांनी पर्यावरणाचे नुकसान केले आहे त्यांनीच पर्यावरण पूर्ववत करण्यासाठीचा भार उचलावा आणि प्रदूषण करणाऱ्यांनीच आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, हे कायद्यातील तत्त्व आहे.

पर्यावरणीय माहितीचे व यंत्रणांचे लोकशाहीकरण राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामुळे घडून येत आहे, असेही अ‍ॅड. सरोदे म्हणाले. त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण कायद्याबद्दल सोप्या भाषेत सविस्तर माहिती दिली. धारणाक्षम विकासासाठी सगळ्यांनी कार्यरत होण्याचे आवाहन करून अ‍ॅड. सरोदे म्हणाले, पर्यावरण वाचविण्यासाठी लढाई लढण्यासाठी एका एनव्हायरमेंट डिफेन्स फंड (पर्यावरणाची बाजू मांडण्यासाठी आर्थिक निधी)ची निर्मिती करण्यासाठी वसुंधरा विज्ञान केंद्राने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही सरोदे यांनी केले.धोक्याचा इशाराकिनारी व सागरी परिसंस्थांचा विध्वंस करणारे उद्योग व कारखाने भ्रष्ट मार्गाने परवानगी मिळवून सुरूच राहिले तर शेतकरी आत्महत्यांप्रमाणेच समुद्रावर अवलंबून असणारे कोळी समाजातील लोकसुध्दा आत्महत्या करण्यास सुरुवात करतील, असा धोक्याचा इशारा अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गenvironmentवातावरण