शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करा

By admin | Updated: September 22, 2014 01:00 IST

मोहन केळूसकर : महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

कणकवली : कोकण रेल्वेचे अध्यक्ष भानुप्रसाद तायल यांच्या नियोजनशून्य गैरकारभारामुळे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. तरीही दक्षिणेकडील राज्यांच्या मागणीनुसार या मार्गावर अजूनही काही नवीन गाड्या सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कोकणवासियांच्या त्यागातून हा मार्ग अस्तित्वात आला आहे. त्यामुळे प्रथम कोकणवासियांना प्राधान्य द्या. या मार्गावर क्षमतेच्या बाहेर गाड्या चालवायच्या असतील तर या मार्गाचे तातडीने दुपदरीकरण करा, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळूसकर यांनी महामंडळाचे संपर्क अधिकारी करंदीकर यांच्याकडे केली आहे.कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाच्या बेलापूर येथील कार्यालयावर मोर्चा नेण्याचे कोकण विकास आघाडीने जाहीर केले होते. मात्र आचारसंहितेमुळे हा मोर्चा स्थगित झाला. मात्र, आघाडीने मोहन केळूसकर यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी करंदीकर यांच्याशी बेलापूर येथील सीबीडी पोलीस ठाण्यामध्ये चर्चा केली. यावेळी केळूसकर बोलत होते.प्रशासनाने मोर्चाला स्थगिती दिली. मात्र, आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याप्रश्नी तडक बेलापूर गाठले. त्यावेळी सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कारेकर यांनी आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यामध्ये पाचारण केले. तसेच महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यामध्येच एका कक्षामध्ये कोकण रेल्वेप्रश्नी चर्चा झाली.ते म्हणाले, कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या प्रशासनामध्ये सामंजस्य नसल्याने कोकणवासिय प्रवासी भरडला गेलाच, पण मुंबईकडे परतताना या प्रवाशांनी कोकण रेल्वेची एवढी धास्ती घेतली की त्याने एसटी आणि खासगी गाड्यांतून प्रवासाला प्राधान्य दिले. परिणामी रेल्वेला नुकसान झाले. एकीकडे काही नियमित गाड्या रद्द केल्या. मात्र हंगामी गाड्या चालू होत्या. नियमित गाड्यांतील आरक्षित प्रवाशांची सोय या रिकाम्या धावणाऱ्या गाड्यांतून केली असती तर प्रवाशांना मनस्ताप झाला नसता.या चर्चेमध्ये कोकण विकास आघाडीचे सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, उपाध्यक्ष भाऊ परब, रमाकांत जाधव, भाई चव्हाण, काका जाधव, नरेंद्र म्हात्रे, भालचंद्र तारी, चंद्रकांत फटकरे, नागेश घाडीगावकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)