शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नेरुरमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: September 23, 2014 00:16 IST

पंधराजणांना तापाची लागण : पाण्याच्या टाकीत माकड कुजलेल्या अवस्थेत

कुडाळ : नेरूर- वाघचौडी येथील ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत बांधलेल्या झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत माकड कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या टाकीतील दूषित पाण्याचा पुरवठा ग्रामस्थांना करण्यात आले. हे दूषित पाणी प्यायल्यामुळे पंधरा ते वीसजणांना तापाची लागण झाली आहे. पंचायत समितीचा पाणी पुरवठा विभाग व नेरूर ग्रामपंचायतीचा दुर्लक्षामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याचे संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त होत आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, वर्षभरापूर्वी नेरूर वाघचौडी येथील सुमारे १५० कुटुुंबातील ४०० ते ४५० ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, याकरिता शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. या टाकीतून ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी पुरवठा गेल्या वर्षभरापासून केला जात होता. मात्र, पाण्याच्या टाकीच्या पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने दाखविलेला निष्काळजीपणा तसेच नेरूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यामुळे येथील लोकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागले आहे. वर्षभरापासून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या या टाकीवर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ठेकेदाराकडून झाकण बसवून घेतले नव्हते.टाकी तशीच उघडी ठेवण्यात आली होती. गेले दोन दिवस या टाकीतून येणाऱ्या पाण्याला वास कसा येतो, अशीच चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणात पाण्याला वास येऊ लागल्याने काही ग्रामस्थांनी टाकीवर चढून पाहिले असता त्यामध्ये माकड मृतावस्थेत असलेले आढळले. मृतावस्थेतील माकड कुजल्याने या टाकीत तीन ते चार दिवसांपूर्वी पडले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत कोणतीच कल्पना नसलेले ग्रामस्थ तेच पाणी पित होते. पाण्याला वास येऊ लागल्यानंतर याची शहानिशा केल्यानंतर सत्य परिस्थिती ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. दूषित पाणी दोन ते तीन दिवस पिल्याने सोमवारी येथील काही पुरुष, महिला आणि मुलांना तापाची लागण होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेले वर्षभर या टाकीवर झाकण नाही. तरीही जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्हाला या परिस्थितीला सामोरे जावे लागले, असा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला. या टाकीवर झाकण न बसविता पाणी सोडल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असून यामुळे भविष्यात ग्रामस्थ, विशेषत: लहान मुलांच्या स्वास्थ्यावर परिणाम झाल्यास याला जबाबदार कोण? पाणी पुरवठा विभाग, नेरूर ग्रामपंचायत की ठेकेदार, असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेमुळे काही ग्रामस्थांनी घरी बनविलेले जेवण टाकून दिले. तसेच परिसरात अन्य विहीर नसल्याने याठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. यावेळी रूपेश पावसकर, राजू सडवेलकर, जयेश परब, संदीप गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या दूषीत पाण्यामुळे पसरलेल्या साथीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)अहवाल वरीष्ठांकडे पाठविणार : नाईकया घटनेबाबबतची योग्य ती माहिती घेण्यात येणार आहे. तसेच या संदर्भातील अहवाल आपण वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे कुडाळचे गटविकास अधिकारी व्ही. एन. नाईक यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितले.आरोग्य तपासणी सुरू या घटनेची माहिती मिळताच त्या परिसरातील सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी सुरू के ली आहे. अजून काही दिवस दैनंदिन सर्वेक्षण सुरू ठेवणार आहे. येथील पाणी तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी आर. एम. कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.