शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

जिल्हाधिकाऱ्यांविरोधातील तक्रार मानवी हक्क आयोगाने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 5:38 PM

Dam Collacator Sindhudurg- अरुणा पाटबंधारे प्रकल्पात आपले घर व जमीन बाधित होऊनही आपल्याला नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच पुनर्वसन केले नाही आदी प्रकारची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याविरोधात वैभववाडी येथील तानाजी कांबळे यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे केलेली तक्रार आयोगाने चौकशीअंती फेटाळून लावली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांविरोधातील तक्रार मानवी हक्क आयोगाने फेटाळली अरुणा पाटबंधारे प्रकल्पातील पुनर्वसनावर प्रश्नचिन्ह

ओरोस : अरुणा पाटबंधारे प्रकल्पात आपले घर व जमीन बाधित होऊनही आपल्याला नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच पुनर्वसन केले नाही आदी प्रकारची सिंधुदुर्गजिल्हाधिकारी यांच्याविरोधात वैभववाडी येथील तानाजी कांबळे यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे केलेली तक्रार आयोगाने चौकशीअंती फेटाळून लावली आहे.अरुणा पाटबंधारे प्रकल्पात वैभववाडी येथील आखवणे, भोम व नागपवडी ही गावे बाधित झाली होती. मात्र, प्रकल्पात बाधित झालेल्या वैभववाडी तालुक्यातील तानाजी कांबळे यांनी १८ नोव्हेंबर २०१८ रोजी आपले घर या प्रकल्पात बाधित होऊनही आपल्याला नुकसान भरपाई मिळावी नाही, आपले पुनर्वसन करण्यात आले नाही, धरणाचे काम चांगले नाही, घळ भरणी योग्यरित्या करण्यात आली नसल्याचे सांगत सिंधुदुर्गजिल्हाधिकारी यांच्याविरोधात राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाने कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीमधील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येत २४, २५ व २६ डिसेंबर २०२० या कालावधीत या प्रकरणाची चौकशी केली होती. यात सर्व प्रकारच्या कागदपत्रांची या समितीने पाहणी केली. यात जिल्हाधिकारी यांच्याविरोधात काही आढळून आले नाही. उलट धरणाची पाहणी केली. यात धरणाचे काम समाधानकारक आढळून आले. तसेच घळ भरणीही पूर्ण झाल्याचे दिसून आले.बुडीत क्षेत्रातील ३ हजार लोकांचे तक्रारदार कांबळे यांना नुकसान भरपाईपोटी १४ लाख रुपये देण्यात आले आहेत. तसेच मांगवली, कुसूर, वेंगसर आणि कुंभारवाडी येथे १०६८ कुटुंबांतील ३ हजार लोकांचे पुनर्वसन करण्यात आले असल्याचे या चौकशीत स्पष्ट झाले होते. दरम्यान, या समितीने प्रत्यक्ष बाधित झालेल्या नागरिकांशी ही संपर्क साधत माहिती घेत तक्रारदार कांबळे यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा अहवाल राज्य मानवी हक्क आयोगाकडे सादर केला होता. आरोपांमध्ये तथ्य नसल्याने ही तक्रार आयोगाने फेटाळून लावली आहे.बिनबुडाचे आरोप असल्याचा आयोगाचा शेरासिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीच्या चौकशीत चौकशी समितीला काही तथ्य आढळून आले नाही. सर्व आरोप खोटे असल्याचे आढळून आले. त्यामुळे तक्रारदार कांबळे यांची तक्रार राज्य मानवी हक्क आयोगाने फेटाळून लावून हे बिनबुडाचे आरोप असल्याचा शेराही चौकशी अहवालावर मारला आहे.

टॅग्स :Damधरणcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग