शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
8
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
9
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
12
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
13
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
14
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
15
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
16
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
17
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
18
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा मृत्यूचा महामाग

By admin | Updated: November 23, 2014 23:44 IST

हायवेचा झाला डायवे : बेशिस्त वाहतूक, वाढलेल्या वाहनांमुळे निरपराधांचा बळी...र्!

श्रीकांत चाळके - खेड--मुंबई - गोवा महामार्गावर सध्या अपघातांची मालिका सुरू आहे़ ती खंडित करण्यासाठी ज्या ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे, त्यांची महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी ठोस अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे आतापर्यंत या मार्गावर ३ हजारांहून अधिक बळी गेले आहेत. अपघातात बळी जाणाऱ्यांचा हा आकडा कमी करण्यासाठी पोलीस आणि महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन तसा प्रस्ताव पाठविणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे.शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास भोस्ते घाटात झालेल्या अपघातांची भीषणता अधोरेखित झाली आहे़सद्यस्थितीत या महामार्गावर वाहनांचा मोठा भार आहे. त्यामुळे अपघातांची संख्याही लक्षणीय आहे. अपघातांची संख्या लक्षात घेता अपघाताला कारणीभूत असलेल्या वाहनचालकांचा परवाना, वाहनांची नोंदणी रद्द करण्यासंबंधी आतापर्यंत पोलिसांकडून प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे एकही प्रस्ताव गेला नाही हे विशेष! याशिवाय गाडीचा परवाना आणि नोंदणी रद्द करण्याचा अधिकार परिवहन कार्यालयाला आहे. मात्र, यासाठी पोलिसांकडून प्रस्ताव पाठवण्यात येत नाहीत. त्यामुळे वाहनचालक बिनधास्त असतात. पोलीस यंत्रणेकडून याबाबत कमालीची उदासीनता दिसून येत असल्याने अनेक वाहनचालकांचा मुजोरपणा वाढत आहे.महामार्गावर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत गेल्या १० वर्षात कमालीची वाढ झाली आहे. अपघातांची आणि त्यामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या चिंताजनक आहे. हजारो वाहने या मार्गावर धावत आहेत. यामध्ये अवजड वाहनांची संख्या लक्षणीय आहे. त्यांची देखभाल न करणे तसेच वाहनांचा अतिवेग आणि मद्यप्राशनासह वाहनचालकांचा मुजोरपणा यामुळे अवघड वळणावर अनेक अपघात झाले आहेत़ गेल्या काही दिवसात वाढलेल्या अपघातांचे प्रमाण पाहता वाहनचालकांसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे. काही वाहनचालकांचा बेशिस्तपणा निरपराध वाहनचालकाच्या जिवावर बेतत आहे. त्यामुळे मृत्यूचा महामार्ग अशी मुबई-गोवा महामार्गाची ओळख झाली आहे. गेल्या काही वर्षात शेकडो बळी घेणाऱ्या या महामार्गाने अनेकांना कायमचे जायबंदीही केले आहे. हे रोखण्याकरिता महामार्ग वाहतूक पोलीस यत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. पोलिसांनी अर्थपूर्ण व्यवहाराला आळा घालून निर्बंध लादल्यास भीषण अपघातांची संख्या नक्कीच कमी होऊ शकेल. अवजड वाहनचालकांच्या मुजोरपणामुळे अनेकवेळा दुचाकीस्वारांचा जीव जाण्याच्या प्रकारात वाढ होत आहे, हे भीषण वास्तव आहे. अपघातग्रस्तांना सरकारी तूटपुंजी मदत जाहीर करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात असल्याचे म्हटले जात आहे.अपघात-५०५ मृत्यू-७३ गंभीर-१२० किरकोळ जखमी-३७०अपघात-४८१ मृत्यू-७५ गंभीर-१९२ किरकोळ जखमी-४८२अपघात-४८७ मृत्यू-६१गंभीर-२०३ किरकोळ जखमी-२३२अपघात-४६३ मृत्यू-१२गंभीर-२०६ किरकोळ जखमी-२२९अपघात-५०० मृत्यू-७५गंभीर-२१७ किरकोळ जखमी-४१३अपघात-४३८ मृत्यू-७१गंभीर-२२१किरकोळ जखमी-४१५