शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भजनाच्या जागराने उत्साहाला उधाण

By admin | Updated: September 27, 2015 00:38 IST

युवा वर्गाचा सहभाग : नवीन चाली ठरताहेत ‘सुपरहिट’

सिद्धेश आचरेकर, मालवण : कोकणवासीयांचा महाउत्सव म्हणजे लाडक्या बाप्पाचा सण. गणेश चतुर्थी कालावधीत कोकणात प्रामुख्याने सिंधुदुर्गात भजन कलेला वेगळेच महत्त्व आहे. त्यामुळे भजनाच्या जागर गणेशोत्सवाच्या धामधूमीत महत्वाची भूमिका बजावतो. तसेच जिल्ह्यात भजन संप्रदाय आणि गणेशोत्सवाचे वेगळेच नाते कित्येक वर्षे चिरकाल टिकून आहे. जिल्ह्यात गेले दहा दिवस भजनांच्या जागराने सर्वत्र वातावरण मंगलमय बनले आहे. प्रासादिक भजन मंडळांना गणेश चतुर्थी सणात मोठी मागणी असते. त्यामुळे जिल्ह्यात भजनच्या स्वरांनी गणेश भक्त न्हाऊन गेले आहेत. १७ ते २७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवाची धामधूम जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सुरु आहे. याच धामधुमीत भजन खरी रंगत आणते. भजनाची गोडी अबाल-वृद्धांपर्यंत असल्याने भजनाला वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. गणपतीचे ११ दिवस भजनाच्या जागरांनी हरएक रात्र स्वरमय आहे. या अहोरात्र जागराने बाप्पाच्या उत्साहाला उधाण प्राप्त झाले आहे. गणरायाची मनोभावे सेवा करण्यासाठी आतुरलेली भजन मंडळे तन-मन-धन विसरून हरिनामाच्या जपात तल्लीन झाल्याचे सर्वत्र चित्र आहे. इंटरनेट, सोशल मीडियाच्या जाळ्यात भरकटत गेलेला युवा वर्गही भक्तीरसात गुंतला आहे. शास्त्रोक्त संगीत शिक्षण घेतलेले बुवा अशा या गणेशोत्सवातून उदयास येत आहेत. उदयोन्मुख बुवांसाठी नव्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांच्या हटके चाली तर भजनावर अधिराज्य गाजवत आहे. तरुण कोरसना नव्या दमाच्या गाण्याच्या चालीतून गाणी गायल्यास अथवा म्हटल्यास भजनालाही वेगळाच साज चढतो. देवा तुझ्या सेवेसाठी गणेश चतुर्थीपासून खऱ्या अर्थाने भजनाला सुरुवात होते. भगवंतांचे नामस्मरण मनोभावे करण्यासाठी भजन मंडळे आणि त्यांचे सहकरी कोणतीही अपेक्षा न ठेवता भजनातून देवाच्या चरणी लीन होतात. आताच्या घडीला डिझेल, पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले असले तरी बाप्पाच्या सेवेसाठी तत्परता दाखवून प्रासादिक भजन मंडळे कमी किमतीचीही सुपारी घेतात. भजनातून देवाचे नामस्मरण करून भक्ती केली जाते. खाद्य संस्कृतीचा मिलाप अलीकडील काही वर्षात भजन संपल्यानंतर खाद्यप्रकारांची रेलचेल चाखायला मिळते. विविध खाद्य पदार्थ बनविण्याची स्पर्धा घरोघरी रंगल्याचे गणेशोत्सवात चित्र असते. मिसळ पाव, कांदा-पोहे, भजी, वडे, एवढेच नव्हे तर व्हेज राईस आदी इतर फास्टफूडचे पदार्थ भजनप्रेमीना चाखायला मिळत आहे. पूर्वी भजन म्हटलं की लाडू दिला जायचा. कित्येक वर्षे लाडवाने आपली जागा सोडली नव्हती. मात्र गेल्या सात-आठ वर्षात लाडू हळूहळू नामशेष होत चालला आहे. आजच्या युवाईला जीभेवर रेंगाळणारी चव हवी असते. ग्रामीण भागात भजन संपल्यावर तर शहरी भागात अगदी आरतीच्या वेळी सुद्धा नाविन्यपूर्ण पदार्थ दिले जातात.