शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

आंबोलीत आणखी एक तपासणी नाका; सांगलीतील घटनेनंतर जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:31 AM

आंबोली : सांगली येथील अनिकेत कोथळेबरोबरच गडहिंग्लज येथील शिक्षकाचे खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांनी दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत आंबोली येथील दूरक्षेत्राबरोबरच कावळेसादकडे जाणाºया रस्त्यावर नवीन पोलीस तपासणी नाका उभारला आहे. या नाक्यावर दिवस-रात्र चार पोलीस कर्मचारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आंबोली दूरक्षेत्राला अतिरिक्त पोलीस कर्मचारी ...

आंबोली : सांगली येथील अनिकेत कोथळेबरोबरच गडहिंग्लज येथील शिक्षकाचे खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांनी दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत आंबोली येथील दूरक्षेत्राबरोबरच कावळेसादकडे जाणाºया रस्त्यावर नवीन पोलीस तपासणी नाका उभारला आहे. या नाक्यावर दिवस-रात्र चार पोलीस कर्मचारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आंबोली दूरक्षेत्राला अतिरिक्त पोलीस कर्मचारी देण्यात आले असून सीसीटीव्हीही सुरू करण्यात आला आहे.सांगली येथील पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याचा मृतदेह आंबोलीतील महादेवगड पॉर्इंटवर आणून जाळण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच सांगलीतील घटनेच्या तिसºया दिवशीच आंबोलीतीलच कावळेसाद पॉर्इंटवर आणखी एक मृतदेह सापडला.हा मृतदेह गडहिंग्लज येथील शिक्षकाचा होता. या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आंबोलीच्या पर्यटनाची बदनामी होत असल्याचे दिसून येत होते. राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली होती.मंत्री केसरकर यांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्रावर अतिरिक्त पोलीस बळ वाढविण्यात येणार आहे. तसेच दूरक्षेत्राची जागा चुकीची असून दूरक्षेत्र अन्यत्र हलविण्याबाबत विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. तर तात्पुरत्या स्वरुपात आणखी एक तपासणी नाका लावण्यात येणार आहे, असे जाहीर केले होते. त्यानुसार आंबोलीच्या दिशेने येणाºया कावळेसादकडे जाणाºया रस्त्यावर हा तपासणी नाका उभारण्यात आला आहे. या तपासणी नाक्यावर दिवसा चार, तर रात्रीच्यावेळी चार असे पोलीस ठेवण्यात आले आहेत. हा तपासणी नाका सोमवारी रात्रीपासून कार्यरत झाला आहे.तर आंबोली दूरक्षेत्रावर आणखी पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. तसेच दूरक्षेत्राचे बंद असलेले सीसीटीव्हीही सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे सांगलीच्या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असल्याचे यातून दिसून येत आहे.एखादी घटना घडल्यानंतर पोलीस दल जागे होते. त्याचा प्रत्यय आंबोलीला मंगळवारी आला. दीड वर्षापासून आंबोलीतील दूरक्षेत्राचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. याबाबत दूरक्षेत्राने पत्रव्यवहार करूनही त्याची दखल वरिष्ठ कार्यालयाने घेतली नव्हती. त्यामुळे हे सीसीटीव्ही बंद अवस्थेत होते. मात्र सांगलीच्या घटनेनंतर पोलीस दल जागे झाले आणि त्यांनी सीसीटीव्ही पुन्हा सुरू केले आहेत.