शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या सात गाड्या अपघातामुळे रद्द

By admin | Updated: October 7, 2014 23:41 IST

रेल्वेच्या मदतीला एस. टी. धावली

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर कामथेजवळ झालेल्या मालगाडीच्या दुर्घटनेमुळे वाहतूक ठप्प झाली असून, यामुळे आज लांब पल्ल्याच्या सहा गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. सात गाड्या रद्द करण्यात आल्या, तर तीन गाड्यांमधील प्रवाशांची कामथे-चिपळूण स्थानकांदरम्यान बसद्वारे ने-आण करण्यात आली. अपघातामुळे वाहतूक ठप्प झाल्याने रत्नागिरीसह सर्वच स्थानकांवर प्रवाशांचे मोठे हाल झाले. गाड्याच नसल्याने प्रवाशांना घरचा रस्ता धरावा लागला. रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये सावंतवाडीकडे जाणारी मांडवी, जनशताब्दी, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर तसेच मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी, जनशताब्दी व सावंतवाडी-दिवा पॅसेंजरचा समावेश आहे. ज्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले त्यात मुंबईकडे जाणारी नेत्रावती एक्सप्रेस, वेरावळ एक्सप्रेस, हापा एक्सप्रेस तसेच मडगावकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, कोचुवेली एक्सप्रेसचा समावेश होता. कामथे व चिपळूण स्थानकांदरम्यान ज्या गाड्यांमधील प्रवाशांची दुसऱ्या गाड्यांमध्ये व्यवस्था करण्यासाठी ने-आण करण्यात आली त्यामध्ये केरळा संपर्क क्रांती, गोवा संपर्क क्रांती व मंगला एक्सप्रेसचा समावेश होता. आजच्या गाड्या रद्द झाल्याने तिकिटांचे पैसे परत घेण्यासाठी स्थानकातील तिकीट कक्षात प्रवाशाची झुंबड उडाली होती, तर ज्यांच्या दुपारनंतर सुटणाऱ्या गाड्या होत्या, त्यांनीही दुपारी तिकिटे परत करून आपला तिकीट परतावा स्वीकारला. ज्यांना तातडीने बाहेरगावी जायचे होते, त्यांनी मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे पसंत केल्याचेही दिसून आले. (प्रतिनिधी)रेल्वेच्या मदतीला एस. टी. धावलीरत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण ते कामथे रेल्वेस्थानकाच्या मध्ये मालगाडीचे डबे घसरून झालेल्या अपघातामुळे रेल्वेवाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या अडकून पडलेल्या प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी एस. टी. धावली असून, ३० गाड्यांव्दारे प्रवासी वाहतूक सुरू आहे.कोकण रेल्वे मार्गावर मालगाडी घसरून होणाऱ्या अपघातात वाढ होत आहे. पूर्वी पावसाळ्यात दरड रूळावर कोसळल्याने वाहतूक ठप्प होत होती. मात्र, आता मालगाड्या घसरत असल्याने त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होत आहे. एकेरी मार्ग असल्याने रो-रो, मालगाडी व प्रवासी वाहतूक सुरू असते. सकाळी ७.४५च्या दरम्यान घडलेल्या अपघातामुळे प्रवासी वाहतूक कोलमडली. त्याचदरम्यान मुंबईकडून आलेल्या गाड्या चिपळुणात, तर मडगाव कडून आलेल्या गाड्या रत्नागिरी स्थानकात थांबवण्यात आल्या. काही गाड्या रत्नागिरीतून मडगावकडे, तर काही चिपळुणातून मुंबईकडे सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यामुळे रत्नागिरी ते चिपळूण व परत अशा दुहेरी प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेने परिवहन महामंडळाकडून तीस गाड्यांची मदत घेतली आहे. तीस गाड्यांतून प्रवासी वाहतूक सुरू आहे. (प्रतिनिधी)