शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

येरळा नदीपात्र आजही पावसाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:34 AM

मायणी : जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाने हाहाकार माजवला असून, परिसरातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. संपूर्ण परिसर जलमय ...

मायणी : जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाने हाहाकार माजवला असून, परिसरातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. मात्र, खटाव तालुक्याची मुख्य जलवाहिनी असलेल्या येरळा नदीचे पात्र येरळवाडी मध्यम प्रकल्पापासून दक्षिणेला कोरडे पडले आहे. त्यामुळे हा परिसर आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिसरातील सर्व ओढे-नाले, नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळत असल्याने वाहतूकही ठप्प झाली आहे, अशी विदारक परिस्थिती एका बाजूला आहे.

जिल्ह्याचा पूर्व भाग कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. खटाव तालुक्यातील अनेक गावे आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्याची मुख्य जलवाहिनी म्हणून येरळा नदीला ओळखले जाते. या नदीवर असलेले येरळवाडी व नेर हे दोन मध्यम प्रकल्प अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. त्यामुळे येरळवाडी मध्यम प्रकल्पाच्या (तलावाच्या) दक्षिण बाजूला अंबवडे, गोरेगाव, मोराळे, चितळी व सांगली जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत असलेले येरळा नदीपात्र आजही पूर्ण कोरडे आहे.

येरळा नदीच्या परिसरासह मायणी मंडलमधील मायणीसह, कलेढोण, मुळीकवाडी, पाचवड, विखळे, हिवरवाडी, कान्हरवाडी, कानकात्रे, पडळ, औतरवाडी, ढोकळवाडी, गारुडी, तरसवाडी, गारळेवाडी गावांच्या परिसरातील अनेक वाड्या-वस्त्या आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

२४ मायणी

चितळी (ता. खटाव) येथील येरळा नदीपात्र आजही पूर्ण कोरडे आहे. ( छाया : संदीप कुंभार)