शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

येरळा नदीपात्र आजही पावसाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:34 IST

मायणी : जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाने हाहाकार माजवला असून, परिसरातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. संपूर्ण परिसर जलमय ...

मायणी : जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाने हाहाकार माजवला असून, परिसरातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. मात्र, खटाव तालुक्याची मुख्य जलवाहिनी असलेल्या येरळा नदीचे पात्र येरळवाडी मध्यम प्रकल्पापासून दक्षिणेला कोरडे पडले आहे. त्यामुळे हा परिसर आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिसरातील सर्व ओढे-नाले, नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळत असल्याने वाहतूकही ठप्प झाली आहे, अशी विदारक परिस्थिती एका बाजूला आहे.

जिल्ह्याचा पूर्व भाग कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. खटाव तालुक्यातील अनेक गावे आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्याची मुख्य जलवाहिनी म्हणून येरळा नदीला ओळखले जाते. या नदीवर असलेले येरळवाडी व नेर हे दोन मध्यम प्रकल्प अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. त्यामुळे येरळवाडी मध्यम प्रकल्पाच्या (तलावाच्या) दक्षिण बाजूला अंबवडे, गोरेगाव, मोराळे, चितळी व सांगली जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत असलेले येरळा नदीपात्र आजही पूर्ण कोरडे आहे.

येरळा नदीच्या परिसरासह मायणी मंडलमधील मायणीसह, कलेढोण, मुळीकवाडी, पाचवड, विखळे, हिवरवाडी, कान्हरवाडी, कानकात्रे, पडळ, औतरवाडी, ढोकळवाडी, गारुडी, तरसवाडी, गारळेवाडी गावांच्या परिसरातील अनेक वाड्या-वस्त्या आजही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

२४ मायणी

चितळी (ता. खटाव) येथील येरळा नदीपात्र आजही पूर्ण कोरडे आहे. ( छाया : संदीप कुंभार)