शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रोखण्याची जबाबदारी नक्की कोणाची ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:38 IST

सातारा : जिल्ह्यात आठवडी बाजार सुरू असल्याने गर्दी वाढत आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नाही, तर काही विक्रेते, ...

सातारा : जिल्ह्यात आठवडी बाजार सुरू असल्याने गर्दी वाढत आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नाही, तर काही विक्रेते, तसेच ग्राहकही विनामास्क असतात. त्यामुळे कोरोनाला निमंत्रणच मिळत आहे. यामुळे कोरोना रोखण्याची जबाबदारी नक्की कोणाची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच बाजारामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे.

जिल्ह्यात मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. सुरुवातीला किरकोळ प्रमाणात कोरोनाबाधित सापडत होते. मात्र, एप्रिल महिन्यापासून १०-२०च्या संख्येने बाधित वाढत गेले. मे महिन्यानंतर रुग्णांची संख्या खऱ्याअर्थाने वाढली. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून तर १००-२०० च्या पटीत रुग्ण सापडले. यामुळे प्रशासनासमोर चिंता निर्माण झाली. परिणामी तालुकानिहाय कोराना सेंटर उघडली गेली. त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले, तर सप्टेंबर महिन्यापर्यंत बाधित आकडा ३८ हजारांवर गेला होता. या काळात कोरोनाचा कहर होता. जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही बाधित संख्या कमी होत नव्हती.

ऑक्टोबर महिन्यानंतर मात्र, रुग्णसंख्या हळूहळू कमी झाली. जानेवारी महिन्यापर्यंत ही संख्या कमी होती. मात्र, फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे कोरोना रुग्ण, तसेच मृतांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात सध्या ६३ हजारांवर बाधित झाले आहेत, तर कोरोनामुळे एक हजार ८९२ जणांचा मृत्यू झाला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. याला कारण म्हणजे आजही बाजारपेठेत गर्दी होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. अनेकजण विनामास्क वावरत आहेत.

जिल्ह्यात आजही आठवडी बाजार सुरू आहेत. अशा बाजारात अनेक गावचे लोक येतात. त्यातच गर्दी होत असल्याने कोरोनाला निमंत्रणच मिळत आहे. काही विक्रेते, तर मास्क काढून बोलत असतात. तसेच नागरिकही मास्क हनुवटीवर आणून ठेवतात. गर्दी व नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. याला आळा घालायचा असेल तर शासन नियमांचे पालन आवश्यक ठरले आहे. मात्र, मला काय करायचे असाच अनेकांचा पवित्रा असतो. हाच धोकादायक ठरत आहे.

चौकट :

कारवाईची खरी गरज...

साताऱ्यात तर गुरुवार आणि रविवारी बाजारात मोठी गर्दी होते. साताऱ्यासह परिसरातील गावातून नागरिक येत असतात. काही शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. त्यामुळे बाजारात गर्दी वाढत आहे. अनेक विक्रेते तर नावालाच तोंडावर मास्क ठेवतात. विना मास्क त्यांचा वावर सुरू असतो. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. तरच सातारा शहरातील बाधितांचे प्रमाण कमी होईल.

....................

अन् बाजाराची जागा बदलली...

माण तालुक्यातील एका गावात आठवडी बाजार भरतो; पण कोरोनामुळे ग्रामपंचायतीने आठवडी बाजार भरणार नसल्याचे जाहीर केले. विक्रेते, शेतकऱ्यांनाही सूचना केली. पण, शेतकरी आणि विक्रेत्यांनी नेहमीच्या ठिकाणी न बसता गावापासून जवळच बाजार भरविला. अशा घटना घडत असल्याने कोरोना दूर जाण्याऐवजी आपणच त्याच्या जवळ जात असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

कोट :

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे पुन्हा चिंता वाढू लागली आहे. पूर्वीप्रमाणे अनेक समस्यांना सामोरे जायचे नसेल तर नागरिकांनी शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे तरच कोरोनाचे प्रमाण कमी होईल. तसेच प्रशासनही विविध पातळीवर उपाययोजना राबवीत आहे. पण, याला लोकांचीही साथ मिळणे आवश्यक ठरले आहे.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

फोटो २५सातारा बाजार फोटो

फोटो ओळ : सातारा येथे मंडईमध्ये विनामास्क फिरणारे अनेकजण दिसून येत आहेत.

फोटो २५सातारा वाहन फोटो

फोटो ओळ : साताऱ्यातील बाजारात शेतमाल आणल्यानंतर वाहने रस्त्यावर उभी करून माल उतरविला जातो. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. (छाया : नितीन काळेल)

.........................................................................