शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ओसाड डोंगरावरच्या रोपांना मिळतंय बाटलीतून पाणी

By admin | Updated: May 8, 2015 00:18 IST

शाहूपुरी विद्यालयाचा उपक्रम : ऐन उन्हाळ्यात विद्यालय करतेय रोपांचे जतन

सातारा : राष्ट्रीय एकात्मता विकास कार्यसंघ शाहूपुरी संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व सेवकांनी दोन वर्षांपूर्वीपासून भैरोबा डोंगर पाण्याच्या टाकी परिसरात लावलेली १००० झाडे या रणरणत्या उन्हातही जगविण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवला आहे.श्री भैरवनाथ डोंगर परिसराचा उत्तर दिशेकडील जागेत चांगदेव बागल यांनी दिलेल्या दाखलप्राप्त झालेल्या २००० झाडांमधून चिंच, कडुलिंब, पेरू, सीताफळ, आपटा अशा प्रकारातील ७५० झाडांचे वृक्षारोपण विद्यार्थ्यांनी श्री भैरवनाथ वनराई प्रकल्पांतर्गत केले असून, त्यातील २५० झाडे श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात व उर्वरित १००० विद्यार्थ्यांच्या शेतावरती, घराजवळील मोकळ्या जागेत जतन करण्यासाठी दिली आहेत. तसेच या वर्षीही सामाजिक वनीकरण विभागांमार्फत या कामाची दखल घेऊन श्री भैरोबा पाण्याची टाकी परिसरात आॅक्सिजन पार्क निर्मितीसाठी २५० लिंब या वृक्षाची लागवड केली आहे.मागील वर्षीपासून पावसाळा सोडून उन्हाळ्यापर्यंतच्या कालावधीत गरजेनुसार महिन्यातून एकदा दोनदा विद्यार्थ्यांच्या मार्फत झाडांना सातत्याने बाटलीतून पाणी दिले जात आहे. तसेच उन्हाळ्यात सुरुवातीस आठवड्यातून दोनदा तर नंतर-नंतर प्रत्येक दिवशी विद्यार्थी व शिक्षकांसहित संस्थेच्या कार्यकर्त्यांबरोबर सर्वजण बाटली व कॅनद्वारे पाणी खालून वर नेऊन घालतात. उन्हाळ्यात वणव्यापासून झाडांचे संरक्षण व्हावे म्हणून या प्रकल्पाचे समन्वयक नवनाथ कांबळे, मधुकर जाधव स्वत: शालाप्रमुख क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व इतर सेवकांच्या मदतीने झाडाभोवतीचे गवत काढून, वनखात्याच्या मार्गदर्शनानुसार जाळपट्टीही काढतात. त्यामुळे झाडापर्यंत वणव्याची आग न जाता झाडांचे संरक्षण होते. या उपक्रमात श्री भैरवनाथ मंदिर येथे येणाऱ्या काही ज्येष्ठ नागरिकांचीही मोलाची मदत होते. तेसुद्धा झाडांना पाणी घालणे, झाडाभोवती सावली करता पोती लावणे ही कामे करून मुलांचा उत्साह वाढविण्याचे काम या वयातही करतात ही बाब आमच्याकरिता खूप आधारमय बनली आहे. श्री भैरवनाथ वनराई प्रकल्पाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार नाही, याचीही दक्षता घेत झाडाबरोबर लहानांच्या भावनाही होरपळणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्याठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी आपल्या बरोबर एक छोटी पाण्याची बाटली आणून एक-एक झाड दत्तक घेतल्यास ही वनराई फुलून शाहूपुरीच्या वैभवात नक्कीच भर पडेल, असा विश्वास भारत भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)