शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सत्तासंघर्षाच्या लढाईत गावनेते मग्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

खंडाळा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण खंडाळा तालुक्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी गावोगावी विविध पक्षीय ...

खंडाळा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण खंडाळा तालुक्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी गावोगावी विविध पक्षीय पॅनेलअंतर्गत लढती होत आहेत. बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध कुठे भाजपा, काँग्रेस व इतर विरोधी पक्षांचे पॅनेल दंड थोपटून उभे ठाकले आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील गावनेते सत्तासंघर्षाच्या राजकारणात मग्न आहेत.

खंडाळा तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजला होता. त्यापैकी सात ग्रामपंचायतींसह १३१ जागा बिनविरोध झाल्याने ५० ग्रामपंचायतींत ३२० जागांसाठी लढती होत आहेत. ६९८ उमेदवार मैदानात उतरले आहेत. तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर आजवर राष्ट्रवादी काँग्रेसने प्राबल्य राखले आहे. परंतु गत जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. गावोगावी राष्ट्रवादीने पुन्हा बळकटी दिली असली तरी, या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीविरोधात विरोधी पक्षही सक्षम झाले आहेत. वास्तविक, आमदार मकरंद पाटील यांच्या वैयक्तिक जनसंपर्कामुळे विधानसभा निवडणुकीत विरोधी प्रभाव जाणवला नसला तरी, ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक गटबाजीमुळे ते दिसून येण्याची शक्यता आहे. त्यातच तालुक्यातील जवळपास सर्वच ठिकाणच्या निवडणुका होत असल्याने गावनेते सक्रिय झाले आहेत.

तालुक्यातील भादे, अंदोरी, अहिरे, पारगाव, खेड बुद्रुक, पाडळी, विंग, बावडा, शिवाजीनगर, नायगाव, जवळे, शिंदेवाडी, कवठे, पिंपरे बुद्रुक या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीच्या लढती होण्याची चिन्हे आहेत, तर काही ग्रामपंचायतींमध्ये अंतर्गत मतभेदामुळे तिहेरी पॅनेल लढत देत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय घडामोडी झाल्या. स्थानिक काँग्रेसच्या मोठ्या गटाने भाजपाला साथ दिली. माजी आमदार मदन भोसले यांच्या ताकदीमुळे मुळातच वाढत चाललेल्या भाजपाला आणखी बळ मिळाले. त्यामुळे हाच गट ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात पुढे सरसावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधक चांगलं बाळसं धरण्याची शक्यता आहे. त्यातच अनेक गावांमध्ये राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटांनी एकमेकांविरुध्द दंड थोपटल्याने तेथील लढतीकडे लक्ष लागले आहे, तर ग्रामपंचायतीच्या निमित्ताने गटा-तटात चालणाऱ्या राजकारणाने घरा-घरात शिरकाव केला आहे. त्यामुळे घरा-घरात राजकीय वातावरण ढवळून निघणार हे निश्चित आहे.

खंडाळा तालुक्यात मध्यंतरीच्या काळात वंचित बहुजन आघाडीने उभारी घेतली होती. बहुतांशी गावांत त्याच्या शाखाही उघडण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत विविध पक्षांच्या स्थानिक आघाडीत वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांना संधी दिली आहे. मात्र, या आघाडीला स्वतंत्रपणे पॅनेल उभे करता आले नाही.

विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत पक्षाचे असणारे पॅनेल काही गावे वगळता कोठेही दिसून येत नाहीत. त्यामुळे हा पक्ष पुन्हा उभारी घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. याउलट गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू आणखी मजबूत करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी धावपळ करताना दिसत आहेत. मात्र, नक्की बाजी कोण मारणार, हे जनतेचा कौल आल्यानंतरच कळणार आहे.

चौकट..

बिनविरोध सत्ता....

तालुक्यातील सात गावे बिनविरोध झाली असून, यामध्ये पळशी, कराडवाडी, वाण्याचीवाडी, लिंबाचीवाडी, हरळी, कान्हवडी, घाडगेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पळशी गाव मोठे असले तरी बिनविरोध करून गावाची एकी राखली गेली. तसेच घाडगेवाडी गावाने सलग तीस वर्षे बिनविरोध निवडणुकीचा डंका वाजविला. भादवडे गावाने बिनविरोधचा प्रयत्न करूनही एका जागेची माघार झाली नसल्याने, तेथे लढत होत आहे. तसेच राजकीय संघर्षानंतर हरळी व कराडवाडी गाव एकत्रित झाले आहे.

........................

खंडाळा - ग्रामपंचायत वार्तापत्र