शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी पर्यटकांचे रिक्षातून भारतभ्रमण

By admin | Updated: January 7, 2015 23:26 IST

ये जिंदगी ना मिलेगी दोबारा : भुर्इंजमधील मिसळचा यथेच्छ पाहुणचार

भुर्इंज : आयर्लंडमधील एक तरुण व तीन तरुणी आॅटोरिक्षातून भटकंती करत आहेत. केरळहून राजस्थानकडे जाताना या चौघांनी भुर्इंजमध्ये यथेच्छ पाहुणचार घेत आपल्या या अनोख्या रिक्षाप्रवासाची माहितीही ‘लोकमत’शी दिली. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातील मित्रांच्या भटकंतीची आठवण करून देणारी परदेश तरुण-तरुणींची भटकंती मंगळवार, दि. ६ रोजी भुर्इंजकरांनी अनुभवली. रिक्षातून भटकंती करणारे हे परदेशी पाहुणे भुर्इंज परिसरात चर्चेचा विषय ठरले.
पूर्व आयर्लंडच्या किलडेअर येथील रॉस मॅकमॅहन या तरुणासह मध्य आयर्लंडमधील आओफ डोहरसी, पूर्व आयर्लंडमधील विकलो येथील मायरेड डोहरसी, पश्चिम आयर्लंडमधील नाईम्ह फेगारसी या तीन तरुण गेली पंधरा दिवस भारतभ्रमण करत आहेत. या रिक्षातून हे चौघे केरळ, कर्नाटक आणि गोवा पाहून आता महाराष्ट्रात आले आहेत. येथून ते गुजरातमार्गे राजस्थानला जाणार आहेत. हे चौघेही इंजिनिअर असून, बीएमस, लिंक्टन, सिमेन्स, स्ट्रायकर अशा नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. हे चौघे कॉलेज जीवनातील मित्र असून, आयुष्य वाचविण्यासाठी ते भारत दौऱ्यावर पर्यटनासाठी आले आहेत.
भारत अधिक जवळून पाहता यावा, यासाठी त्यांनी रिक्षातून प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. या दौऱ्यात त्यांना भारताबद्दल अतिशय चांगले अनुभव आले आहेत. येथील अन्नपदार्थांची तर त्यांना भुरळच पडली आहे. मसाला डोसा, पनीर, आलूपालक, हैद्राबादी बिर्याणी अशी अस्सल भारतीय पदार्थांची नावे धडाधड सांगत त्यांनी भुर्इंजमधील एका हॉटेलमध्ये झणझणीत मिसळवर यथेच्छ ताव मारला. भारतीय फूड ‘स्पायसी’ असले तरी ‘डिलिशियस’ आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. रिक्षासारखी बंद पडत असल्याने प्रवासात व्यत्यय येत असला तरीही भारतातील लोक प्रेमळ असून, मदत करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)

अतिथी देवो भव :
रिक्षातून आलेल्या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती. सुरुवातीला त्यांना येथे संवाद साधताना खूपच अडचणी आल्या. काही हॉटेलमधून ते भाषेच्या अडचणीमुळे बाहेरही पडले. मात्र, राजन जाधवराव यांनी त्यांचा उडालेला गोंधळ पाहून त्यांच्याशी इंग्रजीमधून संवाद साधला आणि नंतर या परदेशी तरुणांना भुर्इंजकरांच्या अतिथी देवो भव: या भावनेची प्रचिती आली.


आओफ डोहरसी, मायरेड, नाईम्ह फेगारसी या तिघींनंी भारतीय जेवण, निसर्गसौंदर्य खूपच छान असून, येथील गाई खूपच आवडल्याचे सांगितले. रॉस याने भारताबद्दल जेवढं वाचलं होते, त्यापेक्षा भारत कितीतरी पटीने सुंदर देश असल्याचे सांगितले.