शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीर पेंडी शेतकऱ्याकडून दहाला तीन; ग्राहकाच्या पदात दहाला एक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पिके आणि भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला भाव कमीच मिळत असतो. कारण, सध्या शेतकऱ्यांकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पिके आणि भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला भाव कमीच मिळत असतो. कारण, सध्या शेतकऱ्यांकडून कोथिंबिरीच्या दहा रुपयांना तीन पेंड्या घेऊन विक्रेते पुढे दहाला एकच विकत असल्याचे दिसून येत आहे. यात विक्रेत्यांचा फायदाच होत आहे, तर दर कमी मिळाल्यास शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही काढता येत नाही.

जिल्ह्यातील सातारा, जावळी, वाई, कोरेगाव, खटाव, माण आदी तालुक्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो. काही शेतकरी तर भाजीपाल्यावर अवलंबून आहेत. वर्षभर भाजीपालाच शेतात घेतात. उत्पादित माल हा सातारा, पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत पाठविला जातो तर काही शेतकरी जागेवरच व्यापारी, विक्रेत्यांना देतात. जागेवरच विकल्यास दर कमी मिळाला तरी चालतो. कारण वाहतूक खर्च वाचत असतो. पण, व्यापारी शेतकऱ्यांकडून कमीच दराने भाजीपाला घेतो. त्यानंतर पुढे दर वाढवून विकला जातो.

कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक भाज्यांत विक्रेते मालामाल होतात. कारण, शेतकऱ्यांकडून दहा रुपयांना कधी ३, कधी ४ पेंड्या घेतात. त्यानंतर याच पेंड्या शहराच्या ठिकाणी १०, १५ रुपयांना १ या प्रमाणे विकल्या जातात. त्यामुळे भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र पाहिजे त्या प्रमाणात मोबदला मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाचे संकट निर्माण झालेले आहे. त्यामुळे महागाई वाढली; पण शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही. कारण, भाजीपाल्याला अजूनही दर चांगला मिळत नाही; पण पुढे ग्राहकाला देताना जादा दराने विक्री होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे.

-राजेंद्र कणसे, शेतकरी

बाजार समितीत आम्ही शेतमाल नेतो; पण तेथे कमीच दर मिळतो. कारण, बाजार समितीत गेल्या सहा महिन्यांपासून कोबी, टोमॅटो, बटाट्याला दर कमीच मिळत आहे; पण बाजारात विकताना तो अधिक किमतीने जातो. यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही.

-रामचंद्र पाटील, शेतकरी

ग्राहकांना परवडेना...

कोरोना विषाणूचं संकट आल्यापासून महागाई वाढतच चालली आहे. कधी गॅस सिलिंडर टाकीचे दर वाढतात, तर कधी साहित्याचा भाव वाढतो. त्यातच भाजीपालाही आवाक्याबाहेर आहे. कोणतीही भाजी घ्या ४० रुपये किलोच्या पुढेच मिळत आहे.

-किरण पठारे, ग्राहक

...................................

मागील तीन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढलेलेच आहेत. फक्त कोबी आणि टोमॅटोचे दर आवाक्यात आहेत, तर वाटाणा ८० ते १०० रुपये किलोपर्यंत मिळतोय, तसेच इतर भाज्यांचे दरही टिकून आहेत. त्यामुळे महागाईचा सामना करण्याची वेळ आलेली आहे.

-सदाशिव काळे, ग्राहक

भावात फरक...

बाजार समितीत शेतकरी भाजीपाला आणतात. तेथे मालाचे दर कमी निघतात; पण हाच माल किरकोळ विक्रेत्यांना व्यापारी विकतात. त्यामुळे विक्रेते हे आपल्याला परवडेल अशा पद्धतीने विकत असतात. त्यामुळे भाज्यांच्या दरात शेतकऱ्यांपासून ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत दर वाढत गेलेले असतात.

...शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाचे संकट निर्माण झालेले आहे. त्यामुळे महागाई वाढली; पण शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही. कारण, भाजीपाल्याला अजूनही दर चांगला मिळत नाही; पण पुढे ग्राहकाला देताना जादा दराने विक्री होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे.

-राजेंद्र कणसे, शेतकरी

बाजार समितीत आम्ही शेतमाल नेतो; पण तेथे कमीच दर मिळतो. कारण, बाजार समितीत गेल्या सहा महिन्यांपासून कोबी, टोमॅटो, बटाट्याला दर कमीच मिळत आहे; पण बाजारात विकताना तो अधिक किमतीने जातो. यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही.

-रामचंद्र पाटील, शेतकरी

ग्राहकांना परवडेना...

कोरोना विषाणूचं संकट आल्यापासून महागाई वाढतच चालली आहे. कधी गॅस सिलिंडर टाकीचे दर वाढतात, तर कधी साहित्याचा भाव वाढतो. त्यातच भाजीपालाही आवाक्याबाहेर आहे. कोणतीही भाजी घ्या ४० रुपये किलोच्या पुढेच मिळत आहे.

-किरण पठारे, ग्राहक

कोट..

मागील तीन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढलेलेच आहेत. फक्त कोबी आणि टोमॅटोचे दर आवाक्यात आहेत, तर वाटाणा ८० ते १०० रुपये किलोपर्यंत मिळतोय, तसेच इतर भाज्यांचे दरही टिकून आहेत. त्यामुळे महागाईचा सामना करण्याची वेळ आलेली आहे.

-सदाशिव काळे, ग्राहक

चौकट..

भावात फरक...

बाजार समितीत शेतकरी भाजीपाला आणतात. तेथे मालाचे दर कमी निघतात; पण हाच माल किरकोळ विक्रेत्यांना व्यापारी विकतात. त्यामुळे विक्रेते हे आपल्याला परवडेल अशा पद्धतीने विकत असतात. त्यामुळे भाज्यांच्या दरात शेतकऱ्यांपासून ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत दर वाढत गेलेले असतात.

...

कोणत्या भाजीला काय भाव? (किलोचे दर)

भाजीपाला बाजार समिती भाव ग्राहकाला मिळणारा भाव

वांगी २० ४०

टोमॅटो ०८ २०

कोबी ०८ २०

फ्लॉवर २० ४०

दोडका १५ ४०

कारली १० ४०

बटाटा १५ ३०

मिरची २० ४०

ढबू १० ४०

भेंडी १५ ४०

वाटाणा ५० ८०

शेवगा ४० ८०

........................................................कोणत्या भाजीला काय भाव? (किलोचे दर)

भाजीपाला बाजार समिती भाव ग्राहकाला मिळणारा भाव

वांगी २० ४०

टोमॅटो ०८ २०

कोबी ०८ २०

फ्लॉवर २० ४०

दोडका १५ ४०

कारली १० ४०

बटाटा १५ ३०

मिरची २० ४०

ढबू १० ४०

भेंडी १५ ४०

वाटाणा ५० ८०

शेवगा ४० ८०

........................................................