शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

घागरभर पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती -अंब्रुळकरवाडीत भीषण पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:02 IST

ढेबेवाडीपासून पाच किलोमीटर डोंगरावर वसलेल्या पाटण तालुक्यातील अंब्रुळकरवाडी गावातील गावकऱ्यांना चार महिन्यांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत

सणबूर : ढेबेवाडीपासून पाच किलोमीटर डोंगरावर वसलेल्या पाटण तालुक्यातील अंब्रुळकरवाडी गावातील गावकऱ्यांना चार महिन्यांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सुमारे ५३० लोकसंख्या असलेल्या लोकांना गाव परिसरातील विहिरीतून दोन दिवसांतून दोन ते तीन घागरी पाणी मिळत आहे.

यावर्षी कडक उन्हाळा पडल्यामुळे ढेबेवाडी परिसरातील डोंगरी भागातील गावात असलेल्या विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी खालावली आहे. वाडी-वस्तींसह गावामधील सर्व पाण्याचे स्त्रोत आटले असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. याकडे प्रशासनाकडून मात्र पूर्णत: दुर्लक्ष केले जात आहे.

अंब्रुळकरवाडी या गावामध्ये आडव्या पाठाचे (ग्रॅव्हिटी) पाणी पाईपद्वारे गावामध्ये आणून एका टाकीमध्ये जमा करून गावाला पाणी पुरवठा केला जातो. परंतु हे पाणी डिसेंबर महिन्यामध्ये जरवर्षी संपते. गावामध्ये बोअरवेल, आड, विहीर आहेत. परंतु त्यातून चार दिवसांमधून एकदा पिण्यासाठी दोन पाण्याचे हंडे मिळतात. ग्रामस्थांचा तात्पुरत्या स्वरुपात विहिरीतील पाण्यापासून पिण्याचा प्रश्न भागतो. परंतु जनावरांसाठी इतर खर्चासाठी पाणी टंचाईला सामोरे जावे लागतेअंब्रुळकरवाडी गावामध्ये दोन बोअरवेल आहेत. त्याचेही पाणी खोलवर गेले असल्या कारणाने तेही मिळणे गावकऱ्यांना कठीण बनले आहे. सध्या अंब्रुळकरवाडी येथील ग्रामस्थांचा एका विहिरीवरून तसेच कूपनलिकेद्वारे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसाबसा भागत आहे. परंतु जनावरांना पिण्यासाठी व खर्चासाठी पाणी कमी पडत आहे.

गावकऱ्यांकडून अनेकवेळा ग्रामपंचायतीमार्फत अधिकाºयांकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करण्यात आली आहे. मात्र संबंधित विभागातील अधिकाºयांकडून दुर्लक्ष केले जात आहे. गावासाठी पाण्याचे टँकर चालू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.पाण्यासाठी वणवण लागतंय फिरायलापाण्यासाठी आम्हाला खूप पायपीट करावी लागत असून, चार दिवसांतून चार हंडे पाणी मिळते. परंतु जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने जनावरे सोडून द्यायची वेळ आली आहे. दिवसभर पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जायचं आणि रात्री पाण्यासाठी डोंगरात भटकायचं. त्यात जंगली प्राण्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे येथील ग्रामस्थांतून सांगितले जात आहे.गावातील गावकºयांसह पाळीव जनावरांनाही दररोज पिण्यासाठी व खर्चासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यक भासते. कारण गावातील जनावरे व लोकांची संख्या पाहिल्यास गावची लोकसंख्या ५३० आहे. तसेच गाई-म्हशी १५०, शेळ्या ३०, कोंबड्यांची संख्या पाचशेहून अधिक आहे. 

ग्रामपंचायतीमार्फत डिसेंबर महिन्यांमध्येच गावास पाण्याचा टँकर मिळावा, यासाठी निवेदन दिले आहे. मार्चअखेर कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागत असून, संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत आहेत.- तानाजी अंब्रुळकर,ग्रामपंचायत सदस्य, अंब्रुळकरवाडी, ता. पाटण 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSatara areaसातारा परिसर