शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

उसाला अवकाळीचा फटका

By admin | Updated: May 19, 2015 00:33 IST

तोडी लांबल्या, फड उभाच : हंगाम पूर्ण करण्याचे कारखान्यांपुढे आव्हान

वडगाव हवेली : तालुक्यात गत काही दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. वारंवार होणाऱ्या पावसामुळे ऊसतोडीचा खोळंबा होत असून, परिणामी यावर्षीचा गळित हंगाम लांबण्याची शक्यता आहे.तालुक्यातील साखर कारखान्यांपुढे गळित हंगाम पूर्ण करण्याचे आव्हान असताना अवकाळी पावसाने गळित हंगामामध्ये अडथळा आणला आहे. शेतकऱ्यांना वेळेत ऊसतोड करून मशागत करायची गडबड असताना अवकाळीने शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. कारखान्यांच्या सुरू हंगामातील गळित पूर्ण करण्यासाठी ऊस फड पेटवून शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. परंतु, आपला ऊस तोडून जाणे महत्त्वाचे असल्यामुळे शेतकरी जाईल त्या परिस्थितीत ऊसतोड करून घेण्याच्या मन:स्थितीत आहेत.ऊसतोडणी कामगारांना कडक उन्हामध्ये ऊसतोड करावी लागत आहे. हंगाम संपेपर्यंत फड पेटवून ऊसतोडणी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. ऊस न पेटवता हंगाम पूर्ण करणे कारखान्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे पेटवून ऊस तोडणी सुरू केल्याचे पाहावयाय मिळत आहे. हंगाम कधी संपतो, असे या तोडणी कामगारांना झाले आहे. त्यांना त्यांच्या गावाकडे जाण्याची ओढ लागली आहे. परंतु अवकाळी पावसामुळे कामगारांचे गावाकडे जाण्याचे दिवस लांबणीवर जात आहेत. ऊसतोडणी हंगामाचे अखेरचे दिवस शेतकऱ्यांसाठी त्रासाचे असतात. शेतकऱ्यांना आपला ऊस तोडणीचे संकट समोर असते तर ऊस तोडणी कामगारांना कारखान्याचा गळित हंगाम आटोपण्याचे संकट समोर असते, अशा वेळी ऊस पेटवून ऊसतोड करण्याच्या सूचना कारखान्यांकडून मिळाल्याने ऊस तोडणी कामगारांना ऊसतोडणी सुलभ झाली आहे. पेटवून नेलेल्या उसाला कपात न करता बिल मिळणार असल्याने जाईल त्या परिस्थितीत ऊसतोड करून घेणे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पसंत केले आहे. (प्रतिनिधी) उसाचा घात होतोच कसा?जिल्ह्याच्या सर्वच भागातील ऊसाला आगी लागत असल्याच्या घटना अलीकडे पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीचा बारकाईने विचार करता ऊसाला आग अपघाताने लागत आहेत. की लावल्या जात आहेत, हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे वेळीच तोड करण्यासाठी कारखान्यांना योग्य नियोजन करण्याची गरज आहे