शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

जिल्ह्यात पाच वर्षांनंतर प्रथमच साखरेचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 22:55 IST

संजय कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळपाच्या आजवरच्या सीमा पार केल्या. मार्चअखेर ९७ लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा कारखान्यांनी पार केला आहे. गाळप हंगाम घेतलेल्या जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांपैकी पाच कारखान्यांचे गाळप बंद झाले. उरलेल्या आठ कारखान्यांचे गाळप एप्रिल अखेरपर्यंत चालणार असल्याने जिल्हा शंभर लाख क्विंटल साखर ...

संजय कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळपाच्या आजवरच्या सीमा पार केल्या. मार्चअखेर ९७ लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा कारखान्यांनी पार केला आहे. गाळप हंगाम घेतलेल्या जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांपैकी पाच कारखान्यांचे गाळप बंद झाले. उरलेल्या आठ कारखान्यांचे गाळप एप्रिल अखेरपर्यंत चालणार असल्याने जिल्हा शंभर लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा निश्चित पार करणार आहे.साखर निर्मितीत महाराष्ट्र देशात अव्वल ठरल्यानंतर या हंगामात सातारा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक गाळपाचे रेकॉर्ड या हंगामात मोडणार आहे. यामध्ये २०१४-१५ मध्ये ७५ लाख ६५ हजार ६३२ लाखमेट्रिक टन गाळप तर ८९ लाख ०६ हजार २९ लाख क्विंटल साखर उत्पादन, २०१५-१६ मध्ये ७७ लाख ६५हजार ३७८ लाख मेट्रिक टन गाळप तर ९० लाख ६६ हजार ९१८ लाख क्विंटल साखर उत्पादन, २०१६-१७ मध्ये ५४ लाख ३६ हजार ९३५ लाख मेट्रिक टन गाळप तर ६४ लाख ५१ हजार ७२ लाख क्विंटल साखर उत्पादन तर २०१७-१८ मध्ये मार्चअखेर ८१लाख ७६ हजार ९८७ लाख मेट्रिक टन गाळप तर ९७ लाख १४ हजार ९५५लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा गाळप हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. या हंगामात एकूण १४ कारखान्यांपैकी यंत्रणेअभावी प्रतापगड कारखाना सुरुवातीपासूनच बंद राहिला तर उर्वरित सर्व १३ कारखानेमार्च अखेरपर्यंत गाळपास सज्ज राहिले. यातील श्रीराम-जवाहर, फलटण, लोकनेते बाळासाहेबदेसाई पाटण, रयत कºहाड, न्यू फलटण साखरवाडी, स्वराजफलटण या पाच कारखान्यांचे गाळप आता बंद झाले आहेत. उर्वरित आठ कारखाने एप्रिलअखेर बंद होणार आहेत.एफआरपीबाबत उदासीनताएका बाजूला जिल्ह्यातील साखर उत्पादन उच्चांकी वाढले असताना दुसऱ्या बाजूला मात्र जाहीर एफआरपी देण्याबाबत बहुतांशी कारखाने उदासीन राहिले आहेत. त्यामुळे शेतकºयांचा ‘मार्च एंड’ मात्र निराशजनक राहिला. अनेक कारखाने आजही शासनाच्या एफआरपी कायद्याला कोलदांडा दाखवत आहेत. मात्र, या कारखानदाराबाबत शासन बघ्याची भूमिका घेत आहे. एफआरपी नियमाप्रमाणे १४ दिवसांत देणं सर्वच कारखानदारांना बंधनकारक असतानाही ती न दिल्यामुळे शेतकरी मात्र कारखानदारांच्या भूमिकेबाबत नाराज आहेत.