शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाच वर्षांनंतर प्रथमच साखरेचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 22:55 IST

संजय कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळपाच्या आजवरच्या सीमा पार केल्या. मार्चअखेर ९७ लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा कारखान्यांनी पार केला आहे. गाळप हंगाम घेतलेल्या जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांपैकी पाच कारखान्यांचे गाळप बंद झाले. उरलेल्या आठ कारखान्यांचे गाळप एप्रिल अखेरपर्यंत चालणार असल्याने जिल्हा शंभर लाख क्विंटल साखर ...

संजय कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळपाच्या आजवरच्या सीमा पार केल्या. मार्चअखेर ९७ लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा कारखान्यांनी पार केला आहे. गाळप हंगाम घेतलेल्या जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांपैकी पाच कारखान्यांचे गाळप बंद झाले. उरलेल्या आठ कारखान्यांचे गाळप एप्रिल अखेरपर्यंत चालणार असल्याने जिल्हा शंभर लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा निश्चित पार करणार आहे.साखर निर्मितीत महाराष्ट्र देशात अव्वल ठरल्यानंतर या हंगामात सातारा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक गाळपाचे रेकॉर्ड या हंगामात मोडणार आहे. यामध्ये २०१४-१५ मध्ये ७५ लाख ६५ हजार ६३२ लाखमेट्रिक टन गाळप तर ८९ लाख ०६ हजार २९ लाख क्विंटल साखर उत्पादन, २०१५-१६ मध्ये ७७ लाख ६५हजार ३७८ लाख मेट्रिक टन गाळप तर ९० लाख ६६ हजार ९१८ लाख क्विंटल साखर उत्पादन, २०१६-१७ मध्ये ५४ लाख ३६ हजार ९३५ लाख मेट्रिक टन गाळप तर ६४ लाख ५१ हजार ७२ लाख क्विंटल साखर उत्पादन तर २०१७-१८ मध्ये मार्चअखेर ८१लाख ७६ हजार ९८७ लाख मेट्रिक टन गाळप तर ९७ लाख १४ हजार ९५५लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा गाळप हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. या हंगामात एकूण १४ कारखान्यांपैकी यंत्रणेअभावी प्रतापगड कारखाना सुरुवातीपासूनच बंद राहिला तर उर्वरित सर्व १३ कारखानेमार्च अखेरपर्यंत गाळपास सज्ज राहिले. यातील श्रीराम-जवाहर, फलटण, लोकनेते बाळासाहेबदेसाई पाटण, रयत कºहाड, न्यू फलटण साखरवाडी, स्वराजफलटण या पाच कारखान्यांचे गाळप आता बंद झाले आहेत. उर्वरित आठ कारखाने एप्रिलअखेर बंद होणार आहेत.एफआरपीबाबत उदासीनताएका बाजूला जिल्ह्यातील साखर उत्पादन उच्चांकी वाढले असताना दुसऱ्या बाजूला मात्र जाहीर एफआरपी देण्याबाबत बहुतांशी कारखाने उदासीन राहिले आहेत. त्यामुळे शेतकºयांचा ‘मार्च एंड’ मात्र निराशजनक राहिला. अनेक कारखाने आजही शासनाच्या एफआरपी कायद्याला कोलदांडा दाखवत आहेत. मात्र, या कारखानदाराबाबत शासन बघ्याची भूमिका घेत आहे. एफआरपी नियमाप्रमाणे १४ दिवसांत देणं सर्वच कारखानदारांना बंधनकारक असतानाही ती न दिल्यामुळे शेतकरी मात्र कारखानदारांच्या भूमिकेबाबत नाराज आहेत.