शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
2
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
3
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
4
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
5
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
6
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
7
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
8
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
9
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
10
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
11
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
15
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
16
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
17
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
18
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
19
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
20
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातबंदीमुळे साखर कारखान्यांसमोर अडचणींचा डोंगर, सातारा जिल्ह्यात किती टन होते उत्पादन.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 13:35 IST

निर्यात धोरण ठरवताना शेतकऱ्यांचा विचार करण्याची मागणी

सातारा : देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुरळीत रहावा व अन्नसुरक्षेबाबत आवश्यक उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीवर ३० सप्टेंबरपर्यंत बंदी घातली आहे. ही बंदी आणखी वाढूही शकते. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांची परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. साखर कारखानदारीवर महाराष्ट्रातील लाखो शेतकरी अवलंबून आहेत. यामुळे निर्यात धोरण ठरवताना शेतकऱ्यांचा विचार करण्याची मागणी होत आहे.

राज्यात २०० हून अधिक खासगी आणि सहकारी साखर कारखाने असून, एकूण ९ कोटी ८३ लाख १८ हजार ८३४ इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे तर सातारा जिल्ह्यात सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी मिळून १ कोटी ८ लाख ६० हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याच्या उत्पादनापैकी निर्यातीसाठी काही प्रमाणात साखरेचा कोटा निश्चित केला जातो. त्यामुळे परकीय गंगाजळी देशाला प्राप्त होते. परंतु, आता केंद्र सरकारने जवळपास पाच महिने निर्यातीला बंद घातली आहे. यामुळे साखर कारखान्यांच्या गुदामात पडून राहणार आहे.

दि. ३० एप्रिल रोजी अन्न मंत्रालयाने मे महिन्यासाठी ५८६ साखर कारखान्यांना २२.५ लाख मेट्रिक टन साखरेचा मासिक कोटा वितरित केला. यात महाराष्ट्राला ६.६६ लाख मेट्रिक टन कोटा आहे. निर्यातीसाठी कोटा कमी झाल्यास देशांतर्गतच कारखान्यांशीही स्पर्धा होणार आहे. दि. ३० सप्टेंबर २०२६ नंतरदेखील बंदी कायम ठेवली तर कारखान्यांना कारखान्यांसमोरील अडचण वाढणार आहे. त्यामुळे साखर निर्यातीचे धोरण ठरवताना शेतकरी आणि साखर कारखान्यांवरील संभाव्य परिणामांचा विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.

इथेनॉल निर्मितीचा पर्याय

सध्या निर्यातीच्या धोरणात सरकारचे धोरण सातत्याने बदलत असल्यामुळे साखर कारखाने इथेनॉल निर्मितीवर भर देण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर चढे नसल्यामुळे निर्यातीची गरज नव्हती. पण मुळात निर्यात बंदीचा शासनाला अधिकारच नाही कारण गेल्या वर्षांपासून सरकारने साखरेची एमएसपी वाढवलेली नाही. सरकारच्या धोरणामुळे साखरेचे दर पडले अन् शेतकऱ्यांची बिले थकली की कारखानदार हात वर करणार. अन् सध्या ऐंशी टक्के कारखानदार तर भाजपचेच आहे. शेवटी शेतकऱ्यांचाच बळी यात जाणार. हा निर्णय चुकीचा आहे. -राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

English
हिंदी सारांश
Web Title : Sugar Export Ban Troubles Factories; Satara's Production Details Revealed

Web Summary : The sugar export ban until September impacts factories reliant on exports. Satara district produced 10,860,850 quintals. Ethanol production is an alternative. Policy changes affect farmers.