शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांकडून ऊस तोडणीचा घोडेबाजार !

By admin | Updated: May 11, 2015 23:26 IST

शेतकऱ्यांची अडवणूक : चिपाड झालेला ऊस तोडण्यासाठी उकळले जातायत पैसे; एकरी तीन ते चार हजारांचा भुर्दंड

कार्वे : कऱ्हाड तालुक्यातील शिवारात ठिकठिकाणी अद्यापही ऊस उभा आहे. उसाला तोड मिळविण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. मात्र, मजुरांनी शेतकऱ्यांना अक्षरश: जेरीस आणले आहे. ऊस तोडणीसाठी कारखान्याचे मजूर शेतकऱ्यांकडून पैसे उकळत असल्याने ‘तोड नको; पण मजुरांना आवरा,’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.तालुक्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, कार्वेसह परिसरातील शिवारात अद्यापही ऊस उभा असल्याचे दिसते. मध्यंतरी झालेला पाऊस व मजुरांचा तुटवडा यामुळे ऊसतोडणी रखडल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊसतोडणीची वाट न पाहता गुऱ्हाळांना ऊस घातला आहे. कोणत्याही पद्धतीने लवकर उसाला तोड मिळावी व शेत मोकळे व्हावे, यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असते. सध्याही शेतकरी त्यासाठीच धावपळ करीत आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी पुन्हा वळवाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे उर्वरित उसाचे फड भुईसपाट झाले आहेत. परिणामी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काहीही करून उसाला लवकर तोड मिळावी, व मशागतीसाठी शेत लवकरात लवकर मोकळे व्हावे, असे शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे ते कारखान्यांच्या गट कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. मात्र, मजुरांच्या टोळ्या कमी असल्याने शेतकऱ्यांना फक्त तारखा दिल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी अक्षरश: धायकुतीला आले आहेत.काही दिवसांपासून ऊसतोड मजुरांनी शेतकऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालविला आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या उसाला तोड मिळालीच तरी त्याला सुरुवातीला मजुरांची फर्माईश पूर्ण करावी लागत आहे. मजूर शेतकऱ्यांकडून पैसे उकळत आहेत. बैलगाडीस २०० ते ४०० रुपये तर ट्रॅक्टरला प्रतिटन १०० ते २०० असा मजुरांनी दर ठरविला आहे. शेतकऱ्याकडून पैसे घेतल्याशिवाय उसाला कोयता लावणार नसल्याची मजुरांची अडेलतट्टू भूमिका असते. अगोदरच उसाचे चिपाड झाल्याने शेतकरी नुकसानीत आहेत. त्यातच या चिपाडाची तोड करण्यासाठी मजूर पैसे मागत असल्याने शेतकऱ्यांना ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाईलाजास्तव मजुरांची ही मागणी शेतकऱ्यांना पूर्ण करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला प्रतिएकरी तीन ते चार हजारांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.शेतकऱ्यांना कारखान्याकडून प्रतिटनास १ हजार ९०० रुपये पहिली उचल दिली जाते. ते पैसे एका महिन्यांनी मिळतात. मात्र, तोडणी मजूर शेतकऱ्यांकडून पैसे उकळून शेतकऱ्यांना वेठीस धरीत आहेत. या गंभीर बाबीचा कारखान्याने विचार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर) उसाच्या फडाला आधी काडी, मग तोडउन्हाच्या तडाख्यामुळे शिवारातील उरलेले सर्वच ऊसक्षेत्र वाळले आहे. चिपाड झालेल्या उसाचे वाढेही वैरणीयोग्य राहिलेले नाही. तसेच पाला वाळल्याने फडात मोठी अडचण निर्माण झाली आहे. परिणामी, काही शेतकरी स्वत:च ऊस पेटवून देत आहेत. जळीत ऊस कारखान्याकडून अग्रक्रमाने तोडला जातो. त्यामुळे काही शेतकरी ही क्लृप्ती लढवतात. तर काही ठिकाणी ऊसतोड मजूरच तोडणी सोपी व्हावी म्हणून आधी काडी टाकून; मगच उसाला कोयता लावत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.यावर्षी उसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कालावधी उलटून गेला तरी तोडी मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कोणत्याही मार्गाने उसाची तोड करून घेऊन शेत रिकामे करण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. याचाच गैरफायदा ऊसतोडणी मजूर घेत आहेत. - माणिकराव थोरात, शेतकरी, कार्वे