शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी मानसिक तणावाखाली, तर पालक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:58 IST

पुसेगाव : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीचा दर वाढत असल्याने दहावी, बारावीचे विद्यार्थी मानसिक तणावाखाली असून, पालकांनाही चिंता सतावत आहे. ...

पुसेगाव : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीचा दर वाढत असल्याने दहावी, बारावीचे विद्यार्थी मानसिक तणावाखाली असून, पालकांनाही चिंता सतावत आहे. रुग्ण वाढतच राहिले तर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या शिक्षण क्षेत्रासमोर पुन्हा संकट येऊ शकते. दोन दिवसांपूर्वी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकवर परिणाम होऊ शकतो.

राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या शैक्षणिक वर्षातील मार्च, एप्रिल आणि चालू शैक्षणिक वर्षातील जूनपासून नोव्हेंबरपर्यंत राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांबरोबरच पदवी व पदवीव्युत्तर विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी आणि दिवाळीच्या सुटीनंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने नियम व अटी घालून परवानगी दिली. सध्या पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आणि पदवी अभ्यासक्रमाचे सुरू झालेले आहेत; परंतु आठ-दहा दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीचा दर असाच कायम राहिल्यास इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकवर संकट उद्भवण्याची भीती राज्य शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

यंदा बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. मात्र, मागील ८ ते १० दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. त्यामुळे विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये बाधित क्षेत्र जाहीर केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सुरू झालेल्या पाचवी ते आठवीपर्यंत शाळा पुन्हा बंद करून ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत.

शिक्षण मंडळाच्या परीक्षांना अजूनही दोन महिन्यांचा कालावधी असला तरी कोरोना रुग्णांच्या संख्येत अशी वाढ होत राहिल्यास लेखी परीक्षा घेणे कठीण होणार आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे बारावी, दहावीच्या परीक्षांच्या निकालास विलंब झाला होता. आतातर दहा महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये बंद होती. परिणामी २०२१ मधील परीक्षा एप्रिल-मे या कालावधीत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, पुन्हा कोरोनाबाधित रुग्णसंख्येच्या वाढीमुळे चिंतेचे ढग गडद होत आहेत.

चौकट :

अभ्यासाचे नियोजन बिघडणार

दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पुढील दिशा ठरविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वर्षे आहेत. मात्र, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने वेळापत्रकात बदल झाल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन बिघडणार आहे. शिवाय लेखी परीक्षा तीन तासांची असल्याने संक्रमणाच्या भीतीने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील वातावरणावर याचा विपरीत परिणाम होत असून, १६ ते १८ वर्षे वयोगटातील दहावी, बारावीचे विद्यार्थी मानसिक ताणतणावात असल्याच्या भावना अनेक पालकांनी व्यक्त केल्या.