शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

उरूलच्या वनक्षेत्रात जाळरेषा काढण्यास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST

पाटण वनविभाग : वणवा रोखण्यासाठी केली उपाययोजना मल्हारपेठ : पाटण वनविभागामार्फत डोंगरात वणवा लागून वनसंपदा नष्ट होऊ नये, यासाठी ...

पाटण वनविभाग : वणवा रोखण्यासाठी केली उपाययोजना

मल्हारपेठ : पाटण वनविभागामार्फत डोंगरात वणवा लागून वनसंपदा नष्ट होऊ नये, यासाठी वनक्षेत्रात जाळरेषा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

डोंगरातील गवत जाळल्यामुळे चांगले गवत उगवते, असा समज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा असतो. मात्र, हा चुकीचा समज असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. कारण जेव्हा गवत जळते तेव्हा त्याच्यात नवीन तयार होणारे बीदेखील नष्ट होत असते आणि बुडाशी असणारी मुळे नष्ट होऊन त्याठिकाणचे गवत नाहीसे होते, असे मल्हारपेठ वनविभागाचे वनक्षेत्रपाल भाट यांनी सांगितले. शासन शतकोटी वृक्षलागवड करताना दिसत आहे. मात्र, या झाडांचे संगोपन होताना दिसत नाही. केवळ वन विभागाने वृक्ष संवर्धनासाठी न झटता समाजातील सर्व घटकांनी आपली जबाबदारी समजून त्याचे रक्षण केले पाहिजे असे, मतही यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

दरवर्षी वन विभागाकडून नोव्हेंबर महिन्यात जाळपट्टा काढला जातो. मात्र, यावर्षी पूर्ण हंगामच उशिरा सुरू झाल्याने गवत हिरवे राहिले. सर्वच विभागांत सध्या वन क्षेत्रातील जाळपट्टा काढला आहे. तरीही शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. वणवा लावल्यास कारवाई होणार आहे. शेतकऱ्यांनी शेतातील कचरा पेटवताना काळजी घ्यावी. वनाचे संरक्षण करावे, असे आवाहन वन क्षेत्रपाल भाट यांनी केले आहे.