शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

सातारच्या एकुलत्या एक सिग्लनचे सतराशे साठ नियम.. पोलिसांनाच हवे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:04 AM

सातारा शहरामध्ये एकमेव सिग्नल सुरू असणाऱ्या पोवई नाक्यावरील सिग्नलचे सतराशे साठ नियम असल्यामुळे वाहन चालकही गोंधळात पडत आहेत. पोलिसांना प्रशिक्षण नसल्यामुळे कोणी पोलिस सिग्नल सुटण्याअगोदर वीस सेकंद तर कोणी १५ सेकंद अगोदर वाहने सोडत आहेत. त्यामुळे अचानक वाहने सोडल्यामुळे अपघाताचीही शक्यता असते. या ठिकाणी प्रशिक्षित पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी सातारकर नागरिकांच्या वतीने अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसातारकरांचे पोलिस अधीक्षकांना साकडे जीवावर बेतण्यापूर्वी उपाययोजना करण्याची माणगी

सातारा : शहरामध्ये एकमेव सिग्नल सुरू असणाऱ्या पोवई नाक्यावरील सिग्नलचे सतराशे साठ नियम असल्यामुळे वाहन चालकही गोंधळात पडत आहेत. पोलिसांना प्रशिक्षण नसल्यामुळे कोणी पोलिस सिग्नल सुटण्याअगोदर वीस सेकंद तर कोणी १५ सेकंद अगोदर वाहने सोडत आहेत. त्यामुळे अचानक वाहने सोडल्यामुळे अपघाताचीही शक्यता असते. या ठिकाणी प्रशिक्षित पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी सातारकर नागरिकांच्या वतीने अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.सातारा शहरात चार ते पाच ठिकाणी सिंग्नल यंत्रणा असली तरी केवळ पोवई नाक्यावरील सिग्नल सध्या सुरू आहे. या सिग्नलला तब्बल सात रस्ते जोडले गेले आहेत. त्यामुळे वाहनांच्या रहदारीचे प्रमाणही जास्त आहे. या सिग्नलवर अलीकडे छोटे-मोठे अपघात होत आहेत. यामध्ये वाहन चालकांचे जखमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

वाहतूक समादेशक मधुकर शेंबडे आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या सिग्नलवर कशामुळे अपघात होत आहेत, याचे निरीक्षण केले. त्यावेळी अनेक त्रुटी समोर आल्या. वाहन चालकही अपघाताला जबाबदार असल्याचे दिसून आले. सिग्नल सुटण्यापूर्वीच काही वाहनधारक घाई करून सुसाट वाहने घेऊन जात आहेत. मात्र, या ठिकाणी असलेल्या हवालदाराने हाताने पुढे जाण्याचा इशारा करणे गरजेचे असते. मात्र, पोलिसांकडून टाळाटाळ केली जाते.

येथील पोलिस केवळ पावती फाडण्यामध्ये मग्न असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक सुरळीत करण्यामध्ये कोणालाही रस नाही. केवळ सिग्नलवर असलेल्या सेकंदावरच पोलिस अवलंबून राहत आहेत. काही पोलिस कर्मचारी सिग्नल संपण्यापूर्वी १५ सेकंद अगोदर तर काही कर्मचारी २० सेकंद अगोदर वाहतूक पुढे जाऊ देण्याचा हाताने इशारा करत आहेत. त्यावेळी विशेष म्हणजे सिग्नल सुरू असतो.पोलिसच जर वाहतुकीचे नियम मोडत असतील तर नागरिकांनी कोणाचा आदर्श घ्यायचा, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

हिरवे दिवे लागेपर्यंत पादचारी रस्ता ओलांडत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. हिरवा दिवा लागल्यानंतरच थांबलेली वाहतूक सोडण्यात यावी. अशी मागणीही पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. 

शासन, जनता, चालक, पादचारी यांच्या हितार्थ व सुरक्षिततेसाठी सिग्नलवरील नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष द्यावे.-मधुकर शेंबडे (वाहतूक समादेशक)

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtraffic policeवाहतूक पोलीस