शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

साताऱ्याची संगममाहुली स्मशानभूमी पाण्याखाली; मृतांवर अंत्यसंस्कार करायचे कुठे? पालिकेपुढे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 12:46 IST

जिल्हा प्रशासनाकडून या कामाची जबाबदारी सातारा पालिकेच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

सातारा : कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने साताऱ्यातील संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमी गुरुवारी पाण्याखाली गेली. अंत्यसंस्कारासाठी पर्यायी व्यवस्थाच नसल्याने आता कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करायचे कुठे? असा प्रश्न पालिकेपुढे उभा ठाकला आहे.कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांवर साताऱ्यातील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात.

जिल्हा प्रशासनाकडून या कामाची जबाबदारी सातारा पालिकेच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. पालिकेने या कामी १९ कर्मचाºयांचे पथक नेमले असून, प्रत्येकाला कामाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षांत चार हजारांहून अधिक कोरोना मृतांवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही या स्मशानभूमीला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने कैलास स्मशानभूमीतील चौदा अग्निकुंड पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे आता कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सातारा शहरात दुसरी स्मशानभूमी नाही. पालिकेकडून विद्युत अथवा गॅस दाहिनीची व्यवस्थाही आजतागायत उपलब्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करायचे कुठे? असा प्रश्न पालिकेपुढे उभा ठाकला आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर संपूर्ण स्मशानभूमी पाण्याखाली जाऊन परिस्थिती आणखीन गंभीर बनू शकते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस