शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
7
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
8
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
11
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
12
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
13
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
14
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
15
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
16
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
17
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
18
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
19
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
20
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 20:46 IST

Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी आणि सोनम हे बेपत्ता झाल्यानंतर या दोघांच्याही कुटुंबीयांनी मेघालय सरकार आणि तेथील प्रशासनावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता या प्रकरणातील सत्य माहिती समोर आल्यानंतर राजा रघुवंशी आणि सोनम यांच्या कुटुंबीयांनी मेघालयची माफी मागावी, अशी मागणी मेघालय सरकारमधील मंत्री अलेक्झँडर लालू हेक यांनी केली आहे.

लग्नानंतर मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेले राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम हे जोडपे अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, काही दिवसांनी राजा रघुवंशी याचा मृतदेह शिलाँगजवळील वेईसाडोंग फॉल्स या ठिकाणी कुजलेल्या स्थितीत सापडला होता. तसेच राजा रघुवंशी याची हत्या ही त्याची पत्नी सोनम हिनेच सुपारी देऊन केल्याची धक्कादायक माहिती तपासामधून समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी सोनम हिला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी आता मेघालय सरकारमधील मंत्री अलेक्झँडर लालू हेक यांनी राजा रघुवंशी आणि सोनम हिच्या कुटुंबीयांना इशारा दिला आहे.

राजा रघुवंशी आणि सोनम हे बेपत्ता झाल्यानंतर या दोघांच्याही कुटुंबीयांनी मेघालय सरकार आणि तेथील प्रशासनावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता या प्रकरणातील सत्य माहिती समोर आल्यानंतर राजा रघुवंशी आणि सोनम यांच्या कुटुंबीयांनी मेघालयची माफी मागावी, अशी मागणी मेघालय सरकारमधील मंत्री अलेक्झँडर लालू हेक यांनी केली आहे. राजा आणि सोनम यांच्या कुटुंबीयांनी मेघालय राज्य आणि येथील जनतेची प्रतिमा मलिन केली आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही, तर त्यांच्याविरोधात खटला दाखल केला जाईल, असा इशारा अलेक्झँडर लालू हेक यांनी दिला आहे.

राजा रघुवंशी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. या पत्रामधून रघुवंशी कुटुंबीयांनी मेघालयमधील पोलीस आणि सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे मंत्री अलेक्झँडर लालू हेक हे नाराज झाले आहेत. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचा त्वरित तपास करून आरोपी सोनम हिच्यासह इतर आरोपींना अटक केली आहे. या कुटुंबांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, असा आरोपही मेघालयच्या मंत्र्यांनी केला. दरम्यान, हा गुन्हा मेघालयमध्ये घडला होता. त्यामुळे आरोपींना इथेच आणलं जाईल, असेही त्यांनी सांगितले.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी