शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : भातसा प्रकल्पग्रस्ताची ३८ वर्षांपासून होरपळ, दाखलाच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:16 IST

ठाणे जिल्ह्यातील भातसा सिंचन प्रकल्पासाठी तब्बल ५४ गुंठे जमीन घालवून बसलेल्या कुटुंबाची ३८ वर्षांपासून होरपळ सुरु आहे.

ठळक मुद्देभातसा प्रकल्पग्रस्ताची ३८ वर्षांपासून होरपळ, दाखलाच मिळेनापुनर्वसन खात्याची टोलवाटोलवी; पदवीधर तरुणाचे भविष्य अंधारात

सागर गुजर / सातारा : ठाणे जिल्ह्यातील भातसा सिंचन प्रकल्पासाठी तब्बल ५४ गुंठे जमीन घालवून बसलेल्या कुटुंबाची ३८ वर्षांपासून होरपळ सुरु आहे.रफिक अहमद शेख यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन तर राहिलेच पण प्रकल्पग्रस्ताचा साधा दाखलाही देण्यास पुनर्वसन कार्यालयाने टाळाटाळकेली आहे. अपघाताने आलेल्या अपंत्वाशी सामना करत जीवन कंठणाऱ्या रफिक शेख यांच्या पदवीधर मुलाला दाखला नसल्याने नोकरीही मिळत नाही.भातसा प्रकल्पात जमीन गेली, उरलेली जमीन कुटुंबातील कर्तव्य पार पाडत असताना विकायला लागली. आता कसायला जमीन नसल्याने शेख यांचे कुटुंब ठाणे येथील शहापूर येथूने सातारा जिल्ह्यातील कोरेगावात काही वर्षांपासून राहत आहे. एका छोट्या खोलीत हे कुटुंब दिवस कंठत आहे.

१९८0 साली त्यांची जमीन भातसा प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. यानंतर प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळावा, यासाठी अर्ज, विनंत्या करण्यात ३८ वर्षे निघून गेली आहे.काँगे्रस-राष्ट्रवादीचे सरकार गेले आता सबका साथ...सबका विकास, अशी घोषणा करत भाजप सत्तेवर आले आहे. मात्र प्रशासन तेच आहे. लालफितीचा कारभार करणारे पुनर्वसन खात्याचे अधिकारी व कर्मचारी कोणतेही कारण सांगून त्यांना टाळत आहे. कसायला जमीन नाही आणि खर्चायला पैसे...अशा अवस्थेतही शेख कुटुंबीयांनी प्रशासनाकडे कागदोपत्री पाठपुरावा सुरु ठेवला आहे.वयोवृध्द असणाऱ्या रफिक शेख यांचा अपघात झाला होता. त्यात दुर्दैवाने त्यांच्या जिभेला गंभीर इजा झाली असल्याने ते धड बोलूही शकत नाहीत. भातसा प्रकल्पासाठी ५४ गुंठे जमीन संपादित केल्याचा दाखला भूमी संपादन अधिकाऱ्यांनी त्यांना दिला आहे. यानंतर पुन्हा १९९0 साली २३ गुंठे २ आर जमीन चारी काढण्यासाठी संपादित करुन घेण्यात आली.

सातबाऱ्यावर तशी नोंदही आहे. मात्र शेख यांची जमीन मूळ प्रकल्पासाठी नव्हे तर कालव्यासाठी संपादित केल्याचा जावई शोध लावणाऱ्या पुनर्वसन अधिकाऱ्यानी या प्रकल्पग्रस्ताला लाभ मिळण्याच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत.मुलगा तौसिफ शेख याला सरकारी नोकरी मिळावी, प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळावा, प्रकल्पग्रस्तांसाठी असणारे शासकीय फायदे मिळावेत, औषधोपचारासाठी दर महिना आर्थिक मदत मिळावी, मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत मिळावी, केंद्राच्या धर्तीवर (केंद्र शासनाचा २0१३ चा कायदा) लाभ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुनर्वसन मंत्र्यांनीच दखल घ्यावीप्रशासकीय यंत्रणा दाखला देण्यास टाळाटाळ करत आहे. आता पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच आपल्याला न्याय मिळवून द्यावा, यासाठी त्यांची भेट घेणार असल्याची माहिती रफिक शेख यांनी लोकमतशी बोलताना दिली.

भातसा प्रकल्पासाठी आमची कसदार जमीन गेली. आम्ही या जमिनीत भातासारखी पिके घेऊन उदरनिर्वाह करत होतो. आता कसायला जमीन नाही. सरकारकडे आम्ही पुनर्वसन नव्हे तर प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळण्याची मागणी करत आहोत. एकुलत्या एका मुलाला या दाखल्यामुळे सरकारी नोकरी तर मिळू शकते.- रफिक शेख, बाधित शेतकरी 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरण