शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

सातारा : भातसा प्रकल्पग्रस्ताची ३८ वर्षांपासून होरपळ, दाखलाच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 15:16 IST

ठाणे जिल्ह्यातील भातसा सिंचन प्रकल्पासाठी तब्बल ५४ गुंठे जमीन घालवून बसलेल्या कुटुंबाची ३८ वर्षांपासून होरपळ सुरु आहे.

ठळक मुद्देभातसा प्रकल्पग्रस्ताची ३८ वर्षांपासून होरपळ, दाखलाच मिळेनापुनर्वसन खात्याची टोलवाटोलवी; पदवीधर तरुणाचे भविष्य अंधारात

सागर गुजर / सातारा : ठाणे जिल्ह्यातील भातसा सिंचन प्रकल्पासाठी तब्बल ५४ गुंठे जमीन घालवून बसलेल्या कुटुंबाची ३८ वर्षांपासून होरपळ सुरु आहे.रफिक अहमद शेख यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन तर राहिलेच पण प्रकल्पग्रस्ताचा साधा दाखलाही देण्यास पुनर्वसन कार्यालयाने टाळाटाळकेली आहे. अपघाताने आलेल्या अपंत्वाशी सामना करत जीवन कंठणाऱ्या रफिक शेख यांच्या पदवीधर मुलाला दाखला नसल्याने नोकरीही मिळत नाही.भातसा प्रकल्पात जमीन गेली, उरलेली जमीन कुटुंबातील कर्तव्य पार पाडत असताना विकायला लागली. आता कसायला जमीन नसल्याने शेख यांचे कुटुंब ठाणे येथील शहापूर येथूने सातारा जिल्ह्यातील कोरेगावात काही वर्षांपासून राहत आहे. एका छोट्या खोलीत हे कुटुंब दिवस कंठत आहे.

१९८0 साली त्यांची जमीन भातसा प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. यानंतर प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळावा, यासाठी अर्ज, विनंत्या करण्यात ३८ वर्षे निघून गेली आहे.काँगे्रस-राष्ट्रवादीचे सरकार गेले आता सबका साथ...सबका विकास, अशी घोषणा करत भाजप सत्तेवर आले आहे. मात्र प्रशासन तेच आहे. लालफितीचा कारभार करणारे पुनर्वसन खात्याचे अधिकारी व कर्मचारी कोणतेही कारण सांगून त्यांना टाळत आहे. कसायला जमीन नाही आणि खर्चायला पैसे...अशा अवस्थेतही शेख कुटुंबीयांनी प्रशासनाकडे कागदोपत्री पाठपुरावा सुरु ठेवला आहे.वयोवृध्द असणाऱ्या रफिक शेख यांचा अपघात झाला होता. त्यात दुर्दैवाने त्यांच्या जिभेला गंभीर इजा झाली असल्याने ते धड बोलूही शकत नाहीत. भातसा प्रकल्पासाठी ५४ गुंठे जमीन संपादित केल्याचा दाखला भूमी संपादन अधिकाऱ्यांनी त्यांना दिला आहे. यानंतर पुन्हा १९९0 साली २३ गुंठे २ आर जमीन चारी काढण्यासाठी संपादित करुन घेण्यात आली.

सातबाऱ्यावर तशी नोंदही आहे. मात्र शेख यांची जमीन मूळ प्रकल्पासाठी नव्हे तर कालव्यासाठी संपादित केल्याचा जावई शोध लावणाऱ्या पुनर्वसन अधिकाऱ्यानी या प्रकल्पग्रस्ताला लाभ मिळण्याच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत.मुलगा तौसिफ शेख याला सरकारी नोकरी मिळावी, प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळावा, प्रकल्पग्रस्तांसाठी असणारे शासकीय फायदे मिळावेत, औषधोपचारासाठी दर महिना आर्थिक मदत मिळावी, मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत मिळावी, केंद्राच्या धर्तीवर (केंद्र शासनाचा २0१३ चा कायदा) लाभ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुनर्वसन मंत्र्यांनीच दखल घ्यावीप्रशासकीय यंत्रणा दाखला देण्यास टाळाटाळ करत आहे. आता पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच आपल्याला न्याय मिळवून द्यावा, यासाठी त्यांची भेट घेणार असल्याची माहिती रफिक शेख यांनी लोकमतशी बोलताना दिली.

भातसा प्रकल्पासाठी आमची कसदार जमीन गेली. आम्ही या जमिनीत भातासारखी पिके घेऊन उदरनिर्वाह करत होतो. आता कसायला जमीन नाही. सरकारकडे आम्ही पुनर्वसन नव्हे तर प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळण्याची मागणी करत आहोत. एकुलत्या एका मुलाला या दाखल्यामुळे सरकारी नोकरी तर मिळू शकते.- रफिक शेख, बाधित शेतकरी 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरण